शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

आयुष्याची परीक्षा महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 3:16 AM

सध्या निकाल व प्रवेशांचा ‘सीझन’ सुरू असून गुणांच्या स्पर्धेत कोण आघाडीवर आहे, याकडे सर्वांचेच लक्ष असते. परीक्षा कुठलीही असो त्यात फारच कमी जणांना अपेक्षित यश मिळते. अशा स्थितीत काही विद्यार्थी व पालकदेखील खचून जातात.

सध्या निकाल व प्रवेशांचा ‘सीझन’ सुरू असून गुणांच्या स्पर्धेत कोण आघाडीवर आहे, याकडे सर्वांचेच लक्ष असते. परीक्षा कुठलीही असो त्यात फारच कमी जणांना अपेक्षित यश मिळते. अशा स्थितीत काही विद्यार्थी व पालकदेखील खचून जातात. आपला मुलगा काही करण्यायोग्यच नाही, असा पालकांचा समज होतो तर अमूक महाविद्यालयातील प्रवेश हुकला म्हणजे स्वप्नांचा मार्ग खुंटला, असा विद्यार्थी विचार करतात. एकेका गुणांसाठी विद्यार्थी झगडताना दिसून येतात. त्यामुळे कमी गुण मिळाल्यानंतर सहाजिकच त्यांना वाईट वाटणे स्वाभाविक आहे. मात्र अशा स्थितीत विद्यार्थ्यांना दूषणं देत बसण्यापेक्षा त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही पालकांची सर्वात मोठी जबाबदारी आहे. दुर्दैवाने याचा पालकांना विसर पडतो आणि त्यातूनच खचलेले विद्यार्थी नैराश्यात जातात, तर कुणी जीव संपविण्याचादेखील विचार करतात. आजकाल परीक्षा म्हणजे एक प्रकारची शर्यत झाली आहे. ज्याप्रमाणे शर्यतीत घोडे प्राणपणाने धावतात, अगदी त्याचप्रमाणे गुण मिळविण्यासाठी विद्यार्थी वर्षभर इकडून तिकडे धावत असतात. मात्र या परिस्थितीला नेमके जबाबदार कोण याचा विचार करणे आवश्यक झाले आहे. शिक्षणाच्या घोडेबाजारात विद्यार्थी अक्षरश: भरडले जातात. दुसऱ्या अंगाने विचार केला तर काळाचीदेखील ही गरज म्हटल्या जाते. अशा स्थितीत शिक्षणाचे धडे देत असताना पालकांनी विद्यार्थ्यांना अपयश पचविण्यासाठीदेखील तयार केले पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात यश-अपयश, पास-नापास अशी वर्गवारी असते. गुणवंतांच्या कौतुकात नापासांचे अपयश समाजाच्या कुचेष्टेचा, उपेक्षेचा विषय ठरत असते. समाजात त्यांना कुठलीही प्रतिष्ठा मिळत नाही. त्यांच्या प्रतिष्ठेची वर्गवारी समाजच परस्पर ठरवून टाकतो, ही मानसिकता आता बदलायला हवी. यात आई-वडिलांनाही बदलावं लागेल. बारावीची परीक्षा म्हणजे आयुष्याची परीक्षा नव्हे हे पालकांनीदेखील समजून घेणे आवश्यक आहे. बारावीत अपयशी ठरल्यानंतरही इतिहासात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाºया अशा कितीतरी माणसांची नावे सांगता येतील. अपयशातूनच यशाचा महामार्ग गवसतो. अनेकांनी तो शोधला आहे. त्यामुळे निराश न होता आत्मविश्वासानं सामोरे जाण्याची शिकवण विद्यार्थ्यांना दिली गेली पाहिजे. केवळ एका परीक्षेतील अपयश विद्यार्थ्यांमधील कर्तृत्वाला हिरावून घेऊ शकत नाही. स्पर्धेत दुसरा हारतो म्हणूनच पहिला जिंकतो. आयुष्य प्रत्येक वळणावर परीक्षा घेत असते. त्यामुळे दहावी-बारावीपेक्षा आयुष्याच्या परीक्षेला सामोरे जाणे जास्त महत्त्वाचे ठरते.

टॅग्स :examपरीक्षा