शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
2
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
3
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
4
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
5
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
6
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
7
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
8
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
9
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
10
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
11
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
12
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
13
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
14
'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
15
IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)
16
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
17
‘हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान भोसरीत इमारतीवर आग; स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे लागली आग
19
Nashik Municipal Corporation Election 2026 : "दोन्ही भावांमध्ये राम उरला नाही, जो राम का नहीं वो किसी काम के नहीं"; देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर साधला निशाणा
20
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
Daily Top 2Weekly Top 5

‘एलआयसी’ची निर्गुंतवणूक : कशासाठी? कोणासाठी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 08:54 IST

जगामध्ये विश्वासार्हता गमावलेल्या विदेशी विमा कंपन्यांना भारतातील वाढती विम्याची बाजारपेठ हवी आहे... या कंपन्यांच्या दबावात सरकारने येऊ नये!

ॲड. कांतीलाल तातेड, अर्थशास्त्राचे अभ्यासक -

आयुर्विमा महामंडळातील (एलआयसी) काही टक्के हिस्सा (साधारणत: ६.५ टक्के) विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. आयुर्विमा महामंडळाची निर्गुंतवणूक करण्यासाठी कोणतेही ठोस व संयुक्तिक कारण न देता प्रचंड वित्तीय ताकद असणाऱ्या, आयुर्विमा व्यवसायामध्ये नेत्रदीपक प्रगती करणाऱ्या, राष्ट्र उभारणीच्या कार्यात  मोलाचा आर्थिक सहभाग असणाऱ्या, देशाच्या आर्थिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व राष्ट्रीयीकरणाची सर्व उद्दिष्टे साध्य  करणाऱ्या आयुर्विमा महामंडळाची निर्गुंतवणूक करणे कोट्यवधी विमाधारक  तसेच देशाच्या हिताचे आहे का? - हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

आयुर्विमा महामंडळ स्थापनेच्या वेळी  सरकारने पाच कोटी रुपयांचे भांडवल गुंतविले होते. ३१ मार्च २०२५ रोजी महामंडळाची मालमत्ता ५४ लाख ५२ हजार २९७ कोटी रुपये असून जगातील सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांमध्ये आयुर्विमा महामंडळाची मालमत्ता सर्वात जास्त आहे. १९५६-५७ मध्ये विमा हप्त्यांद्वारे मिळणारी रक्कम ८८.६५ कोटी रुपये होती. त्यावेळी महामंडळाकडे केवळ ९.४१ लाख विमा पॉलिसी होत्या. आता २७ कोटींहून अधिक  वैयक्तिक विमा पॉलिसी  असून ८.४८ कोटी गट विमा पॉलिसी आहेत. २०२४-२५ या आर्थिक वर्षात विमा हप्त्यांपोटी एकूण ४ लाख ८८ हजार १४८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले  आहे. महामंडळाने राष्ट्र उभारणीच्या कामासाठी तसेच पायाभूत सुविधांसाठी ३७ लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेची गुंतवणूक केलेली आहे. कर वजा जाता महामंडळाला २०२४-२५ या आर्थिक वर्षात ४८,१५१ कोटी रुपयांचा नफा झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो १८.३८ टक्क्याने जास्त आहे.  

गेल्या ६९ वर्षात विमाधारकांचा विश्वास संपादन केल्यामुळेच आयुर्विमा महामंडळाने  २४ विमा कंपन्यांच्या तीव्र स्पर्धेला यशस्वीपणे तोंड देऊन आपले निर्विवाद श्रेष्ठत्व व वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे. परंतु  सरकार मात्र निर्गुंतवणुकीद्वारे आयुर्विमा महामंडळाची खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू करून महामंडळाचे नियंत्रण देशी व विदेशी उद्योगपतींच्या हाती सोपवू इच्छित आहे.   मुळात विमा क्षेत्र देशी व विदेशी कंपन्यांसाठी खुले करा, महामंडळाची निर्गुंतवणूक करा,  अशी मागणी देशातील विमाधारकांनी सरकारकडे कधीच केलेली नव्हती. उलट देशात  सर्व स्तरातून त्याला तीव्र विरोध होत  होता. परंतु जगामध्ये विश्वासार्हता गमावून बसलेल्या विदेशी विमा कंपन्यांना भारतातील सतत वाढत असलेली विम्याची बाजारपेठ हवी असल्यामुळे विमा क्षेत्र विदेशी कंपन्यांसाठी खुले करा, अशी  अमेरिकेसह जगातील बड्या राष्ट्रांची सातत्याची  मागणी होती. त्या  दडपणाला बळी पडून वाजपेयी सरकारने विमा क्षेत्र देशी व विदेशी कंपन्यांसाठी खुले केले होते. 

आयुर्विमा महामंडळाला  दुर्बल केल्याशिवाय आपल्या व्यवसायात वाढ करणे शक्य नाही, हा गेल्या २५ वर्षांतील देशी व विदेशी खासगी कंपन्यांचा अनुभव आहे. त्यामुळे आयुर्विमा महामंडळाची  निर्गुंतवणूक करा, विमा क्षेत्रात  परकीय  थेट गुंतवणुकीची मर्यादा ७४ टक्क्यांवरून १०० टक्के करा तसेच  विमाधारकांना देण्यात येणारी ‘सार्वभौम हमी’ काढा, यासारख्या मागण्या त्या विमा कंपन्या करीत असून त्या दडपणाखाली सरकार विमाधारकांच्या हिताला बाधक असे  बदल करीत आहे. संसदेच्या  मान्सून अधिवेशनात सरकार विमा क्षेत्रात परकीय थेट गुंतवणुकीची मर्यादा ७४ टक्क्यांवरून १०० टक्के करण्यासहित विमा क्षेत्रात अनेक व्यापक प्रमाणात  बदल सुचविणारे विमा कायदा (दुरुस्ती) विधेयक, २०२५ मांडले जाण्याची शक्यता असून आयुर्विमा महामंडळाची निर्गुंतवणूक करण्यासंबंधी सरकारने घेतलेला निर्णय हा त्याच धोरणाचा भाग आहे.

गैरप्रकाराने विकल्या जाणाऱ्या विमा पॉलिसीमुळे विमाधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेच ‘आयआरडीएआय’ यांनी आठ महिन्यांपूर्वीच सांगितले होते. असे असतानाही सरकार  विमा क्षेत्रात परकीय थेट गुंतवणुकीच्या मर्यादेत वाढ  करण्याचा व आयुर्विमा महामंडळाची निर्गुंतवणूक करण्याचा निर्णय घेत आहे. हे  विमाधारकांच्या हिताला बाधक आहे.    kantilaltated@gmail.com 

टॅग्स :LIC - Life Insurance Corporationएलआयसी