शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रहिताचा विचार करू या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 01:39 IST

आपल्या राष्ट्रीय जीवनातला गेल्या तीन दिवसांचा कालखंड हा सर्वसामान्य जनतेला वेदना देऊन गेला. आपल्या देशातल्या दोन समाजांत अथवा दोन विचार प्रवाहांत निर्माण होणा-या दुहीने राष्ट्राची कधीही भरून निघणार नाही, अशी हानी होईल, याचा विचार आज सर्वांनीच करायची वेळ आली आहे.

- दुर्गेश जयवंत परूळकरआपल्या राष्ट्रीय जीवनातला गेल्या तीन दिवसांचा कालखंड हा सर्वसामान्य जनतेला वेदना देऊन गेला. आपल्या देशातल्या दोन समाजांत अथवा दोन विचार प्रवाहांत निर्माण होणा-या दुहीने राष्ट्राची कधीही भरून निघणार नाही, अशी हानी होईल, याचा विचार आज सर्वांनीच करायची वेळ आली आहे. आपल्याला लोकशाहीचे वरदान मिळाले आहे. आपल्या मताचा, आपल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आपल्याला आहे, पण त्या स्वातंत्र्याचा अयोग्य उपयोग केला, तर देशातली शांतता, सुव्यवस्था आणि राष्ट्रीय संपत्ती धोक्यात येते. याचा अनुभव आपल्याला नवीन नाही. घटनेने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे, तसेच निवडणूक लढविण्याचाही अधिकार आहेच. त्याचा योग्य प्रकारे उपयोग करून, वैध मार्गाने आपण आपल्याला हवे असलेल्या लोकांना निवडून त्यांच्या हाती सत्ता देऊ शकतो. त्यासाठी समाजात दुही निर्माण करण्याची आवश्यकता नाही. दुही निर्माण करून आपण देशात विविध प्रकारच्या नवीन समस्या निर्माण करतो. लोकशाहीला पोषक असे वातावरण या मार्गाने निर्माण होणार नाही.शाळेत असताना सर्वांना पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर असलेली प्रतिज्ञा आठवत असेल. त्यात लिहिले आहे - सारे भारतीय माझे बांधव आहेत. गेल्या तीन दिवसांत आपल्यातला हा भ्रातृभाव दिसला नाही, याचे वाईट वाटते. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी, म्हणून मी सदैव प्रयत्न करीन, असेही त्या प्रतिज्ञेत आहे. आज विविधतेकडे आपण विषमता म्हणून का पाहात आहोत? या प्रश्नाचे आपण काय उत्तर देणार आहोत! याचा विचार करण्याची वेळ आली आहे.आज आपल्या देशाला अनेक समस्यांनी वेढले आहे. त्या समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करण्याऐवजी आपसात भांडून वातावरण कलुषित करणे हे राष्ट्रीय पाप आहे, असे आपल्याला वाटत नाही का? आज प्रत्येक व्यक्तीने शांतपणे बसून याचा विचार करायला पाहिजे. आपल्या देशातल्या दिवंगत नेत्यांची, संतांची, राष्ट्रपुरुषांची आपण जातीनिहाय वाटणी करत आहोत, हे या देशाचे सर्वात मोठे दुर्दैव आहे. समाजातली जातीव्यवस्था ज्यांनी मोडित काढली, त्यांनाच आपण त्यांच्या त्यांच्या जातीत विभागले आहे. हे सूज्ञपणाचे लक्षण आहे का? एवढा विद्वेष आपल्यात निर्माण होणे, हे राष्ट्राचा विचार करता हानिकारक आहे. हे दुहीचे वातावरण देशाच्या शत्रूसाठी अनुकूल ठरू शकते. देशात विविध मार्गाने घुसखोरी वाढत आहे. त्यात देशाच्या शत्रूंची संख्या अधिक आहे. अशा अराजकसदृश्य वातावरणाचा अपलाभ शत्रू घेतल्यावाचून राहणार नाही. याचे भान सर्वांनीच ठेवायला पाहिजे. सर्वात वाईट वाटते ते या गोष्टीचे, ज्या शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्याचा प्रारंभ ज्या पवित्र पुण्यनगरीत केला, तिथे अशी लांछनास्पद घटना घडावी, हेच दुर्दैव आहे. या घटनेमुळे शिवरायांना किती यातना झाल्या असतील, याचा आपण विचार करणार आहोत का?मी या देशाचा एक सामान्य नागरिक आहे, याची मला जाणीव आहे. मी कोणी मोठा नेता नाही. मी कोणी विचारवंत नाही. तरीही मी माझ्या सर्व देशबांधवांना नम्र विनंती करतो की, त्यांनी आपला राग आवरावा. आपल्या देशात पुन्हा असे दुही निर्माण करणारे वातावरण निर्माण होऊ नये, म्हणून आपण सर्वांनीच योग्य ती काळजी घेऊ या. केवळ राष्ट्रहिताचा विचार करून आपल्या देशाची प्रगती साधू या.दुसºयांना म्हणजे आपल्याच बांधवांना नष्ट करून आपले सामर्थ्य सिद्ध करण्याचा आत्मघातकी विचार सोडून देऊ या. कारण असे करण्यातच राष्ट्रहित आहे.

(लेखक प्रसिद्ध व्याख्याते आणि लेखक आहेत.)

टॅग्स :Indiaभारत