शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

राष्ट्रहिताचा विचार करू या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 01:39 IST

आपल्या राष्ट्रीय जीवनातला गेल्या तीन दिवसांचा कालखंड हा सर्वसामान्य जनतेला वेदना देऊन गेला. आपल्या देशातल्या दोन समाजांत अथवा दोन विचार प्रवाहांत निर्माण होणा-या दुहीने राष्ट्राची कधीही भरून निघणार नाही, अशी हानी होईल, याचा विचार आज सर्वांनीच करायची वेळ आली आहे.

- दुर्गेश जयवंत परूळकरआपल्या राष्ट्रीय जीवनातला गेल्या तीन दिवसांचा कालखंड हा सर्वसामान्य जनतेला वेदना देऊन गेला. आपल्या देशातल्या दोन समाजांत अथवा दोन विचार प्रवाहांत निर्माण होणा-या दुहीने राष्ट्राची कधीही भरून निघणार नाही, अशी हानी होईल, याचा विचार आज सर्वांनीच करायची वेळ आली आहे. आपल्याला लोकशाहीचे वरदान मिळाले आहे. आपल्या मताचा, आपल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आपल्याला आहे, पण त्या स्वातंत्र्याचा अयोग्य उपयोग केला, तर देशातली शांतता, सुव्यवस्था आणि राष्ट्रीय संपत्ती धोक्यात येते. याचा अनुभव आपल्याला नवीन नाही. घटनेने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे, तसेच निवडणूक लढविण्याचाही अधिकार आहेच. त्याचा योग्य प्रकारे उपयोग करून, वैध मार्गाने आपण आपल्याला हवे असलेल्या लोकांना निवडून त्यांच्या हाती सत्ता देऊ शकतो. त्यासाठी समाजात दुही निर्माण करण्याची आवश्यकता नाही. दुही निर्माण करून आपण देशात विविध प्रकारच्या नवीन समस्या निर्माण करतो. लोकशाहीला पोषक असे वातावरण या मार्गाने निर्माण होणार नाही.शाळेत असताना सर्वांना पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर असलेली प्रतिज्ञा आठवत असेल. त्यात लिहिले आहे - सारे भारतीय माझे बांधव आहेत. गेल्या तीन दिवसांत आपल्यातला हा भ्रातृभाव दिसला नाही, याचे वाईट वाटते. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी, म्हणून मी सदैव प्रयत्न करीन, असेही त्या प्रतिज्ञेत आहे. आज विविधतेकडे आपण विषमता म्हणून का पाहात आहोत? या प्रश्नाचे आपण काय उत्तर देणार आहोत! याचा विचार करण्याची वेळ आली आहे.आज आपल्या देशाला अनेक समस्यांनी वेढले आहे. त्या समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करण्याऐवजी आपसात भांडून वातावरण कलुषित करणे हे राष्ट्रीय पाप आहे, असे आपल्याला वाटत नाही का? आज प्रत्येक व्यक्तीने शांतपणे बसून याचा विचार करायला पाहिजे. आपल्या देशातल्या दिवंगत नेत्यांची, संतांची, राष्ट्रपुरुषांची आपण जातीनिहाय वाटणी करत आहोत, हे या देशाचे सर्वात मोठे दुर्दैव आहे. समाजातली जातीव्यवस्था ज्यांनी मोडित काढली, त्यांनाच आपण त्यांच्या त्यांच्या जातीत विभागले आहे. हे सूज्ञपणाचे लक्षण आहे का? एवढा विद्वेष आपल्यात निर्माण होणे, हे राष्ट्राचा विचार करता हानिकारक आहे. हे दुहीचे वातावरण देशाच्या शत्रूसाठी अनुकूल ठरू शकते. देशात विविध मार्गाने घुसखोरी वाढत आहे. त्यात देशाच्या शत्रूंची संख्या अधिक आहे. अशा अराजकसदृश्य वातावरणाचा अपलाभ शत्रू घेतल्यावाचून राहणार नाही. याचे भान सर्वांनीच ठेवायला पाहिजे. सर्वात वाईट वाटते ते या गोष्टीचे, ज्या शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्याचा प्रारंभ ज्या पवित्र पुण्यनगरीत केला, तिथे अशी लांछनास्पद घटना घडावी, हेच दुर्दैव आहे. या घटनेमुळे शिवरायांना किती यातना झाल्या असतील, याचा आपण विचार करणार आहोत का?मी या देशाचा एक सामान्य नागरिक आहे, याची मला जाणीव आहे. मी कोणी मोठा नेता नाही. मी कोणी विचारवंत नाही. तरीही मी माझ्या सर्व देशबांधवांना नम्र विनंती करतो की, त्यांनी आपला राग आवरावा. आपल्या देशात पुन्हा असे दुही निर्माण करणारे वातावरण निर्माण होऊ नये, म्हणून आपण सर्वांनीच योग्य ती काळजी घेऊ या. केवळ राष्ट्रहिताचा विचार करून आपल्या देशाची प्रगती साधू या.दुसºयांना म्हणजे आपल्याच बांधवांना नष्ट करून आपले सामर्थ्य सिद्ध करण्याचा आत्मघातकी विचार सोडून देऊ या. कारण असे करण्यातच राष्ट्रहित आहे.

(लेखक प्रसिद्ध व्याख्याते आणि लेखक आहेत.)

टॅग्स :Indiaभारत