शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

ही संचारबंदी फळास जावो...

By किरण अग्रवाल | Published: April 15, 2021 9:39 AM

राज्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग एकीकडे वाढत असताना व देशात महाराष्ट्र याबाबतीत अव्वल असताना दुसरीकडे पंधरा दिवसांची संचारबंदी जाहीर करतेवेळी तळातल्या घटकांसाठी विविध तरतुदीही ठाकरे सरकारने केल्या आहेत.

- किरण अग्रवालरोजी थांबली तरी, रोटी थांबणार नाही; सरकार काळजी घेईल, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी अखेर हो ना हो ना करीत बुधवारच्या रात्रीपासून राज्यात पंधरा दिवसांची संचारबंदी लागू केली. यामुळे अनेकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे हे खरेच; परंतु अंतिमतः जीव वाचविणे महत्त्वाचे आहे. आता तरी जनतेने समजूतदारी दाखवत प्रशासनाला सहकार्य करून निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे, तसे केले तरच कोरोनाच्या संकटाला थोपवणे शक्य होईल.राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून, प्रतिदिनी सुमारे पन्नास हजारांपेक्षा अधिक नवीन रुग्णांचे निदान होत आहे, त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 35 लाखांच्या पुढे गेली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.44 टक्के एवढे झाले असले तरी मृत्युदर 1.66 टक्के इतका आहे. सर्वाधिक एक लाखापेक्षा अधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात असून, त्यापाठोपाठ मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक जिल्ह्यांचा नंबर लागतो. रुग्णसंख्या वाढत आहे तशी रुग्णालये अपुरी पडत असून, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड्सची कमतरता जाणवू लागली आहे. बेड्स मिळणेही सोडा, आता तर रेमडेसिविर इंजेक्शनचाही तुटवडा भासू लागल्याने रुग्णांचे नातेवाईक हताशपणे मेडिकलवाल्यांकडे रांगा लावताना दिसत आहेत. शासन प्रशासन आपल्यापरीने उपाययोजना करताना दिसत आहेच; पण परिस्थिती अशी काही हाताबाहेर चालली आहे की भयाचे ढग दाटून यावेत.चालू वर्षाच्या प्रारंभापर्यंत म्हणजे जानेवारीपर्यंत कोरोनाची स्थिती तशी निवळलेली दिसत होती; परंतु फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोनाने दार ठोठावले आणि गेल्या वर्षापेक्षाही भयावह रूप धारण करीत कहर माजविला आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने एकेक करून काही निर्बंध घातले खरे, परंतु त्याने कसलाही परिणाम होताना दिसून आला नाही. लोकांनीही कोरोना संपल्यात जमा झाल्याप्रमाणे आपले वर्तन ठेवले. मास्क न वापरता व फिजिकल डिस्टन्स न बाळगता सारे व्यवहार होऊ लागल्याने संसर्गाचा वेग वाढून गेला आणि अखेर नाइलाज म्हणून राज्यात कडक निर्बंध आणि पंधरा दिवसांची संचारबंदी पुकारण्याची वेळ आली. अर्थात या संचारबंदीत अत्यावश्यक वा जीवनावश्यक सेवावगळता इतर घटकांनी घरातच सुरक्षितपणे थांबणे अपेक्षित आहे, कारण कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ते गरजेचे बनले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यासाठी  ‘ब्रेक दि चेन’ असा नारा दिला असून, नागरिकांनी सहकार्य केले तर ही साखळी निश्चितच तुटू शकेल.महत्त्वाचे म्हणजे राज्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग एकीकडे वाढत असताना व देशात महाराष्ट्र याबाबतीत अव्वल असताना दुसरीकडे पंधरा दिवसांची संचारबंदी जाहीर करतेवेळी तळातल्या घटकांसाठी विविध तरतुदीही ठाकरे सरकारने केल्या आहेत. एकूण 5 हजार 476 कोटी रुपयांचे कोरोना पॅकेज घोषित करण्यात आले असून, रोजी थांबली तरी रोटी थांबणार नाही, असे स्पष्ट केले आहे. या पॅकेज अंतर्गत 7 कोटी लोकांना एक महिना मोफत गहू व तांदूळ देण्यात येणार असून, तब्बल 12 लाख नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपयांची मदत दिली जाणार आहे. शिवभोजन थाळी महिनाभर गरजूंना मोफत देण्यात येणार असून, 12 लाख परवानाधारक रिक्षाचालक व नोंदणीकृत पाच लाख फेरीवाल्यांनाही प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. ही मदत किंवा सहाय्य पुरेसे नाही व सर्वांसाठी नाही हेदेखील खरे; परंतु या संचारबंदीच्या काळात ज्यांची उदरनिर्वाहाची अडचण होऊ शकते अशा लहान घटकांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न यातून केला गेला आहे. शेवटी हे संकट सर्वांवरचे आहे त्यास सर्वांनी मिळूनच सामोरे जावे लागणार आहे. त्याचा फटका बहुसंख्य घटकांना थोड्याफार प्रमाणात बसणार असला तरी जिवाची काळजी म्हणून सर्वांनीच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घरातच सुरक्षितपणे थांबणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने ही संचारबंदी फळास जावो अशी अपेक्षा करूया...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या