शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

या एकोप्याला नेताही हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:08 IST

२०१४ च्या निवडणुकीत भाजपाला देशातील ३१ टक्के मते मिळाली.

१९७५ ची अंतर्गत आणीबाणी मागे घेताच १९७७ मध्ये लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात देशातील सर्व काँग्रेसविरोधी पक्षांची जशी एकजूट दिल्लीच्या रामलीला मैदानावर दिसली, नेमकी तशीच सर्व भाजपविरोधी पक्षांची एकी परवा कर्नाटकात कुमारस्वामींनी घेतलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीच्या वेळी आढळली. काँग्रेसच्या सोनिया गांधी, कम्युनिस्टांचे विजयन आणि येचुरी, उत्तर प्रदेशच्या मायावती व अखिलेश, बिहारचे तपस्वी यादव, राष्ट्रवादीचे शरद पवार, आंध्रचे चंद्राबाबू नायडू, बंगालच्या ममता बॅनर्जी हे सारेच विरोधी पक्षनेते यावेळी नुसते एकत्रच आले नाहीत तर त्यांच्यात भाजपविरोधी एकवाक्यता दिसून आली. पंजाबचे अमरिंदरसिंग यात दिसले नाहीत. मात्र ते काँग्रेसचेच नेते आहेत. आश्चर्य याचे की ‘पालघरमधील पोटनिवडणुकीत अडकलो नसतो तर आम्हीही आलो असतो’ हे रालोआतील शिवसेनेनेही या मेळाव्याला कळविलेले दिसले. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाला देशातील ३१ टक्के मते मिळाली. त्या हिशेबाने कर्नाटकात परवा जमलेल्या पक्षांच्या मतांची तेव्हाची एकूण बेरीज ६५ टक्क्यांच्या पुढे जाणारी आहे. ही मते या पक्षांना अशीच राखता आली तर २०१९ च्या निवडणुकीत त्यांचे पारडे जड होण्याची शक्यता मोठी आहे. तथापि या पक्षात अजून मतभेद शिल्लक आहेत. ममता बॅनर्जींचे डाव्यांशी जुळत नाही आणि मायावती व अखिलेश एकत्र असले तरी त्यांना काँग्रेसलाही सोबत घ्यावे लागणार आहे. झालेच तर व्यापक मतैक्यासाठी ज्या राज्यात ज्या पक्षाचे पारडे भारी, वा ज्या मतदारसंघात ज्या पक्षाची मते अधिक ती राज्ये व ते संघ त्या पक्षांकडे सोपविण्याचे राजकीय औदार्यही या नेत्यांना दाखवावे लागेल. तसे समझोते होण्यात सध्या कोणत्या अडचणी मात्र नाहीत. यापैकी प्रत्येकच पक्षाला त्याची मर्यादा आता समजली आहे आणि ज्या भाजपाशी लढत द्यायची त्याचे राजकीय व आर्थिक बळही साऱ्यांच्या ध्यानात आहे. दुसरी महत्त्वाची अडचण केंद्रीय नेतृत्वाबाबतची आहे. मायावती, ममता आणि मुलायमसिंग यांच्याएवढेच पंतप्रधानपदाचे आकर्षण शरद पवारांनाही आहे. कधीकाळी देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल हे मागे फारसे पाठबळ नसताना विरोधकांच्या मतांची बेरीज जुळवून त्या पदावर आले होते. तसेच काहीसे आपणही जमवू शकू असे पवारांसह अनेकांना वाटते. यातले वास्तव हे की हे सारे नेते व त्यांचे पक्ष प्रादेशिक आहेत. त्यांना त्याच मर्यादाही आहेत. या साºयात राष्टÑीय पातळीवर समर्थ असणारा व जनतेत पाठबळ असणारा पक्ष काँग्रेस हाच आहे. त्याचमुळे सोनिया गांधी या अजूनही संयुक्त पुरोगामी दलाच्या अध्यक्ष आहेत. त्या पक्षाने राहुल गांधींची अध्यक्षपदी निवड केली आणि कर्नाटकातील निवडणुकीत सर्वाधिक परिश्रम केलेले नेतेही तेच आहेत. झालेच तर साºया देशात फिरून पक्षाची राष्टÑीय बांधणीही तेच करीत आहेत. त्यांनी पंजाब जिंकले, राजस्थानातील लोकसभेच्या तीन जागा जिंकल्या आणि त्यांच्याखेरीज आपल्या राज्याबाहेर जाणारा दुसरा नेताही या पक्षांजवळ आज नाही. त्यामुळे आताच्या एकोप्यासोबतच राष्टÑीय नेतृत्वाबाबतही त्यांच्यात एकवाक्यता होणे अवघड नाही व ती तशी लवकर होणे आवश्यकही आहे. आपला देश व समाज प्रकृतीने मध्यममार्गी आहे आणि काँग्रेस पक्ष त्या मार्गाचा म्हणून ओळखला जाणारा आहे. शिवाय त्या पक्षात नेतृत्वाबाबत वाद नाही आणि अन्य नेत्यांशी राहुल गांधींचे संबंधही सलोख्याचे आहेत. सबब पक्षीय एकोप्याला नेतृत्वाबाबतच्या एकमताची जोड लवकर मिळाली तर सारेच पक्ष तात्काळ कामाला लागू शकतील. तसे होणे गरजेचे आहे कारण सार्वत्रिक निवडणुकांना आता एक वर्षाहून कमी कालावधी उरला आहे. प्रादेशिक नेत्यांनी आपल्या महत्त्वाकांक्षांना जरा आवर घातला तर हे राष्टÑीय ऐक्य साधता येणे सहज शक्यही आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी