शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

या एकोप्याला नेताही हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:08 IST

२०१४ च्या निवडणुकीत भाजपाला देशातील ३१ टक्के मते मिळाली.

१९७५ ची अंतर्गत आणीबाणी मागे घेताच १९७७ मध्ये लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात देशातील सर्व काँग्रेसविरोधी पक्षांची जशी एकजूट दिल्लीच्या रामलीला मैदानावर दिसली, नेमकी तशीच सर्व भाजपविरोधी पक्षांची एकी परवा कर्नाटकात कुमारस्वामींनी घेतलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीच्या वेळी आढळली. काँग्रेसच्या सोनिया गांधी, कम्युनिस्टांचे विजयन आणि येचुरी, उत्तर प्रदेशच्या मायावती व अखिलेश, बिहारचे तपस्वी यादव, राष्ट्रवादीचे शरद पवार, आंध्रचे चंद्राबाबू नायडू, बंगालच्या ममता बॅनर्जी हे सारेच विरोधी पक्षनेते यावेळी नुसते एकत्रच आले नाहीत तर त्यांच्यात भाजपविरोधी एकवाक्यता दिसून आली. पंजाबचे अमरिंदरसिंग यात दिसले नाहीत. मात्र ते काँग्रेसचेच नेते आहेत. आश्चर्य याचे की ‘पालघरमधील पोटनिवडणुकीत अडकलो नसतो तर आम्हीही आलो असतो’ हे रालोआतील शिवसेनेनेही या मेळाव्याला कळविलेले दिसले. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाला देशातील ३१ टक्के मते मिळाली. त्या हिशेबाने कर्नाटकात परवा जमलेल्या पक्षांच्या मतांची तेव्हाची एकूण बेरीज ६५ टक्क्यांच्या पुढे जाणारी आहे. ही मते या पक्षांना अशीच राखता आली तर २०१९ च्या निवडणुकीत त्यांचे पारडे जड होण्याची शक्यता मोठी आहे. तथापि या पक्षात अजून मतभेद शिल्लक आहेत. ममता बॅनर्जींचे डाव्यांशी जुळत नाही आणि मायावती व अखिलेश एकत्र असले तरी त्यांना काँग्रेसलाही सोबत घ्यावे लागणार आहे. झालेच तर व्यापक मतैक्यासाठी ज्या राज्यात ज्या पक्षाचे पारडे भारी, वा ज्या मतदारसंघात ज्या पक्षाची मते अधिक ती राज्ये व ते संघ त्या पक्षांकडे सोपविण्याचे राजकीय औदार्यही या नेत्यांना दाखवावे लागेल. तसे समझोते होण्यात सध्या कोणत्या अडचणी मात्र नाहीत. यापैकी प्रत्येकच पक्षाला त्याची मर्यादा आता समजली आहे आणि ज्या भाजपाशी लढत द्यायची त्याचे राजकीय व आर्थिक बळही साऱ्यांच्या ध्यानात आहे. दुसरी महत्त्वाची अडचण केंद्रीय नेतृत्वाबाबतची आहे. मायावती, ममता आणि मुलायमसिंग यांच्याएवढेच पंतप्रधानपदाचे आकर्षण शरद पवारांनाही आहे. कधीकाळी देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल हे मागे फारसे पाठबळ नसताना विरोधकांच्या मतांची बेरीज जुळवून त्या पदावर आले होते. तसेच काहीसे आपणही जमवू शकू असे पवारांसह अनेकांना वाटते. यातले वास्तव हे की हे सारे नेते व त्यांचे पक्ष प्रादेशिक आहेत. त्यांना त्याच मर्यादाही आहेत. या साºयात राष्टÑीय पातळीवर समर्थ असणारा व जनतेत पाठबळ असणारा पक्ष काँग्रेस हाच आहे. त्याचमुळे सोनिया गांधी या अजूनही संयुक्त पुरोगामी दलाच्या अध्यक्ष आहेत. त्या पक्षाने राहुल गांधींची अध्यक्षपदी निवड केली आणि कर्नाटकातील निवडणुकीत सर्वाधिक परिश्रम केलेले नेतेही तेच आहेत. झालेच तर साºया देशात फिरून पक्षाची राष्टÑीय बांधणीही तेच करीत आहेत. त्यांनी पंजाब जिंकले, राजस्थानातील लोकसभेच्या तीन जागा जिंकल्या आणि त्यांच्याखेरीज आपल्या राज्याबाहेर जाणारा दुसरा नेताही या पक्षांजवळ आज नाही. त्यामुळे आताच्या एकोप्यासोबतच राष्टÑीय नेतृत्वाबाबतही त्यांच्यात एकवाक्यता होणे अवघड नाही व ती तशी लवकर होणे आवश्यकही आहे. आपला देश व समाज प्रकृतीने मध्यममार्गी आहे आणि काँग्रेस पक्ष त्या मार्गाचा म्हणून ओळखला जाणारा आहे. शिवाय त्या पक्षात नेतृत्वाबाबत वाद नाही आणि अन्य नेत्यांशी राहुल गांधींचे संबंधही सलोख्याचे आहेत. सबब पक्षीय एकोप्याला नेतृत्वाबाबतच्या एकमताची जोड लवकर मिळाली तर सारेच पक्ष तात्काळ कामाला लागू शकतील. तसे होणे गरजेचे आहे कारण सार्वत्रिक निवडणुकांना आता एक वर्षाहून कमी कालावधी उरला आहे. प्रादेशिक नेत्यांनी आपल्या महत्त्वाकांक्षांना जरा आवर घातला तर हे राष्टÑीय ऐक्य साधता येणे सहज शक्यही आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी