शहरं
Join us  
Trending Stories
1
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
2
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
3
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
4
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
5
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
6
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
7
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
8
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
9
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
10
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
11
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
12
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
13
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
14
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
15
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
16
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
17
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
18
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतक झळकावणाऱ्या टॉप ५ महिला क्रिकेटपटू!
19
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
20
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल

या एकोप्याला नेताही हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:08 IST

२०१४ च्या निवडणुकीत भाजपाला देशातील ३१ टक्के मते मिळाली.

१९७५ ची अंतर्गत आणीबाणी मागे घेताच १९७७ मध्ये लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात देशातील सर्व काँग्रेसविरोधी पक्षांची जशी एकजूट दिल्लीच्या रामलीला मैदानावर दिसली, नेमकी तशीच सर्व भाजपविरोधी पक्षांची एकी परवा कर्नाटकात कुमारस्वामींनी घेतलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीच्या वेळी आढळली. काँग्रेसच्या सोनिया गांधी, कम्युनिस्टांचे विजयन आणि येचुरी, उत्तर प्रदेशच्या मायावती व अखिलेश, बिहारचे तपस्वी यादव, राष्ट्रवादीचे शरद पवार, आंध्रचे चंद्राबाबू नायडू, बंगालच्या ममता बॅनर्जी हे सारेच विरोधी पक्षनेते यावेळी नुसते एकत्रच आले नाहीत तर त्यांच्यात भाजपविरोधी एकवाक्यता दिसून आली. पंजाबचे अमरिंदरसिंग यात दिसले नाहीत. मात्र ते काँग्रेसचेच नेते आहेत. आश्चर्य याचे की ‘पालघरमधील पोटनिवडणुकीत अडकलो नसतो तर आम्हीही आलो असतो’ हे रालोआतील शिवसेनेनेही या मेळाव्याला कळविलेले दिसले. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाला देशातील ३१ टक्के मते मिळाली. त्या हिशेबाने कर्नाटकात परवा जमलेल्या पक्षांच्या मतांची तेव्हाची एकूण बेरीज ६५ टक्क्यांच्या पुढे जाणारी आहे. ही मते या पक्षांना अशीच राखता आली तर २०१९ च्या निवडणुकीत त्यांचे पारडे जड होण्याची शक्यता मोठी आहे. तथापि या पक्षात अजून मतभेद शिल्लक आहेत. ममता बॅनर्जींचे डाव्यांशी जुळत नाही आणि मायावती व अखिलेश एकत्र असले तरी त्यांना काँग्रेसलाही सोबत घ्यावे लागणार आहे. झालेच तर व्यापक मतैक्यासाठी ज्या राज्यात ज्या पक्षाचे पारडे भारी, वा ज्या मतदारसंघात ज्या पक्षाची मते अधिक ती राज्ये व ते संघ त्या पक्षांकडे सोपविण्याचे राजकीय औदार्यही या नेत्यांना दाखवावे लागेल. तसे समझोते होण्यात सध्या कोणत्या अडचणी मात्र नाहीत. यापैकी प्रत्येकच पक्षाला त्याची मर्यादा आता समजली आहे आणि ज्या भाजपाशी लढत द्यायची त्याचे राजकीय व आर्थिक बळही साऱ्यांच्या ध्यानात आहे. दुसरी महत्त्वाची अडचण केंद्रीय नेतृत्वाबाबतची आहे. मायावती, ममता आणि मुलायमसिंग यांच्याएवढेच पंतप्रधानपदाचे आकर्षण शरद पवारांनाही आहे. कधीकाळी देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल हे मागे फारसे पाठबळ नसताना विरोधकांच्या मतांची बेरीज जुळवून त्या पदावर आले होते. तसेच काहीसे आपणही जमवू शकू असे पवारांसह अनेकांना वाटते. यातले वास्तव हे की हे सारे नेते व त्यांचे पक्ष प्रादेशिक आहेत. त्यांना त्याच मर्यादाही आहेत. या साºयात राष्टÑीय पातळीवर समर्थ असणारा व जनतेत पाठबळ असणारा पक्ष काँग्रेस हाच आहे. त्याचमुळे सोनिया गांधी या अजूनही संयुक्त पुरोगामी दलाच्या अध्यक्ष आहेत. त्या पक्षाने राहुल गांधींची अध्यक्षपदी निवड केली आणि कर्नाटकातील निवडणुकीत सर्वाधिक परिश्रम केलेले नेतेही तेच आहेत. झालेच तर साºया देशात फिरून पक्षाची राष्टÑीय बांधणीही तेच करीत आहेत. त्यांनी पंजाब जिंकले, राजस्थानातील लोकसभेच्या तीन जागा जिंकल्या आणि त्यांच्याखेरीज आपल्या राज्याबाहेर जाणारा दुसरा नेताही या पक्षांजवळ आज नाही. त्यामुळे आताच्या एकोप्यासोबतच राष्टÑीय नेतृत्वाबाबतही त्यांच्यात एकवाक्यता होणे अवघड नाही व ती तशी लवकर होणे आवश्यकही आहे. आपला देश व समाज प्रकृतीने मध्यममार्गी आहे आणि काँग्रेस पक्ष त्या मार्गाचा म्हणून ओळखला जाणारा आहे. शिवाय त्या पक्षात नेतृत्वाबाबत वाद नाही आणि अन्य नेत्यांशी राहुल गांधींचे संबंधही सलोख्याचे आहेत. सबब पक्षीय एकोप्याला नेतृत्वाबाबतच्या एकमताची जोड लवकर मिळाली तर सारेच पक्ष तात्काळ कामाला लागू शकतील. तसे होणे गरजेचे आहे कारण सार्वत्रिक निवडणुकांना आता एक वर्षाहून कमी कालावधी उरला आहे. प्रादेशिक नेत्यांनी आपल्या महत्त्वाकांक्षांना जरा आवर घातला तर हे राष्टÑीय ऐक्य साधता येणे सहज शक्यही आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी