शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
4
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
5
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
6
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
7
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
8
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
9
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
10
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
11
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
12
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
13
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
14
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
15
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
17
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
18
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
19
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
20
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Daily Top 2Weekly Top 5

ताजा विषय : ठाण्याच्या पलीकडेही आता लक्ष देण्याची गरज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 06:39 IST

एकनाथ शिंदे यांच्यारूपाने ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपदाचा मान मिळाला. पण अजूनही विकासाचे गाडे ठाणे शहरातच अडकलेले दिसते.

मिलिंद बेल्हे, सहयोगी संपादक

एकनाथ शिंदे यांच्यारूपाने ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपदाचा मान मिळाला. पण अजूनही विकासाचे गाडे ठाणे शहरातच अडकलेले दिसते. कोपरीचा पूल, कळवा खाडी पूल, रेल्वे पूल, क्लस्टर, रुग्णालयाचा विकास, रेल्वे- एमएमआरडीएचे प्रकल्प, नवे रेल्वे स्टेशन असे ठाणे शहराला भरभरून मिळाले. मिळते आहे. जिल्ह्याचे मुख्यालय विकसित होत असेल, तर त्याबद्दल दुमत नाही. पण उरलेल्या पाच महानगरपालिका, दोन नगरपालिका, ग्रामीण भागांचे काय? 

एकही पालिका, तालुका किंवा ग्रामीण भाग असा नाही की जेथे अतिक्रमण नाही. त्यावर क्लस्टर हा उतारा सांगितला जात होता. पण त्यासाठी नियोजनच नाही. झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी बीएसयूपी योजनेतील घरे पडून आहेत. परवडणाऱ्या घरांच्या योजनेतून फक्त बिल्डरांची चांदी झाली. आधीच वाहतूक कोंडी पाचवीला पुजलेली. त्यात पुरेसे रस्ते, पार्किंग, दळणवळणाच्या सोयी नसतानाही मोठ मोठे गृहप्रकल्प उभे राहत आहेत. औद्योगिक वसाहतीतील रासायनिक वायू, पाणी, प्रदूषणामुळे आणि डम्पिंगच्या दुर्गंधीने शहरांचे श्वास कोंडले आहेत. 

एकात्मिक वाहतूक प्रकल्प बासनात गुंडाळला गेला आहे. मुंबईत बेस्टने तिकीट दर घटवून प्रवासी वाढविले. त्यांना दिलासा दिला. येथील स्थिती उफराटी आहे. प्रत्येक परिवहन सेवा आचके देत आहे; तरीही उल्हासनगरला स्वतंत्र परिवहन सेवा सुरू होत आहे. बस- स्पेअर पार्ट- कर्मचारी भरती- इंधनाच्या खरेदीत हात गुंतल्याने तोट्यात जाऊनही सत्तेतील सर्वांनाच परिवहन सेवा हवी आहे.

उल्हास नदी आणि बारवी धरण हे येथील पाण्याचे मुख्य स्रोत. त्यातील बारवीचे पाणी उद्योगांना मिळते. ज्या उल्हास नदीवर अन्य शहरांच्या पिण्याच्या पाण्याची मदार आहे, तिची मिठी नदी होते की काय अशी भीती आहे. त्यात ठिकठिकाणी प्रदूषण वाढते आहे. पाण्याच्या आरक्षणाचे झगडे आताच मंत्र्यांच्या दालनात सोडवण्याची वेळ येते आहे.  ठाणे शहरवगळता अन्यत्र चांगले म्हणावे असे सरकारी किंवा पालिकेचे एकही रुग्णालय नाही. मुंबईत पालिका शाळा सुधारल्या, पण ठाणे जिल्ह्यात पालिका, जिल्हा परिषदेच्या शाळांना वाली नाही. तीन खासदार, १८ आमदार असूनही ठाणे जिल्ह्याची ही स्थिती असेल, लोकप्रतिनिधी काही करत नसतील, तर आता मुख्यमंत्र्यांनाच आपला जिल्हा सावरण्यासाठी मैदानात उतरावे लागेल. तो दिवस फार दूर नाही.

मुख्यमंत्र्यांचा रात्रीचा बोटीचा प्रवासखड्ड्यांमुळे खुद्द मुख्यमंत्र्यांना रस्त्याचा प्रवास टाळून रात्रीच्या अंधारात बोटीने प्रवास करण्याची वेळ आली होती.महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री जयंत पाटील यांनी मोटरमनच्या डब्यातून प्रवास करत डोंबिवली गाठले होते. तरीही मुंब्रा ते डोंबिवली समांतर रस्ता पूर्ण करावा, अशी एकाही लोकप्रतिनिधीची इच्छा नाही.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्रीthaneठाणे