ज्ञान-गोदेचे वासी
By Admin | Updated: June 20, 2014 09:31 IST2014-06-20T09:31:54+5:302014-06-20T09:31:54+5:30
उपासना किंवा साधना करायची म्हटलं, तरी त्यासाठी लोक वेगवेगळ्या पवित्र तीर्थांना जातात.

ज्ञान-गोदेचे वासी
अध्यात्म- डॉ. यू. म. पठाण
ज्ञानगोदेचे वासी।
सोवळे-वोवळे नाहीं आम्हांसी ।।१।।
जळ-आंघोळी मळ त्यागी।
ज्ञान-आंघोळी शुच योगी ।।२।।
प्रेमबोधाचा प्रयाग।
शुद्ध जाले अष्टहि अंग।।३।।
त्रिवेणी सत्रावीचा झरा।
नाही त्रिगुण मळ शरीरा।।४।।
शांति-विवेक भट सद्रुरु।
शेख महंमद केले स्थिरु।।५।।
उपासना किंवा साधना करायची म्हटलं, तरी त्यासाठी लोक वेगवेगळ्या पवित्र तीर्थांना जातात. ही तीर्थक्षेत्रंं बहुधा पवित्र नद्यांच्या काठीच असतात. या नद्यांमध्ये स्नान केलं, की आपण शुचिर्भूत झालो, असं मानलं जातं. भाविकांची अशी श्रद्धा असणं स्वाभाविक आहे. तथापि, या अभंगात संतकवी शेख महंमद यांनी एका वेगळ्या महत्त्वाच्या तीर्थाचं नि तिथल्या नदीचं रुपकात्मक वर्णन केलेलं आहे. ही नदी आहे ‘ज्ञानरूपी गोदावरी.’ ‘आम्ही या ज्ञानगोदेचेचवासी आहोत,’ असं शेख महंमद म्हणतात. इथं सोवळ्या-ओवळ्याचा प्रश्नच येत नाही. या ज्ञानरूपी गोदावरीमध्ये जे ‘ज्ञानाचं’ स्नान करतात ते सर्व पवित्रच असतात. त्यामुळं त्यांना परमेश्वराच्या प्रीतीचाच (भक्तिभावाचाच) ‘बोध’ किंवा ‘ज्ञान’ होत असतं. या अष्टांग स्नानामुळं कुठलाही ‘मळ’ (कुविचार) त्यांना स्पर्शच करू शकत नाही. त्यांना हे मार्गदर्शन कोण करतं? शांती आणि सद्सद्विवेकबुद्धी याच त्यांच्या ‘सद्गुरू’ होत व त्याच त्यांच्या परमार्थमार्गाची वाटचाल सुलभ करतात आणि त्यामुळंच त्यांचं मन कुठंही आणि कधीही भरकटत नाही. ते नेहमी समेवर असतं... म्हणजे एकाग्र आणि स्थिर असतं. साधकाचं मन असं एकाग्र असलं, की ते अत्यंत निष्ठेनं परमात्म्यावर केंद्रित होतं. एका अर्थानं अशा प्रकारे त्यांच्या मनाचं ‘उननयन’ (र४ु’्रें३्रङ्मल्ल) होऊ लागतं व त्यांचा उद्धार होतो.
या ज्ञान-गोदेत स्नान करण्यासाठी साधकाला अन्यत्र कुठंही यावं-जावं लागत नाही. आपले ऐहिक जीवन व्यवहार करता-करताच त्याची ही ‘तीर्थयात्रा’ घरच्या घरीदेखील होते!