शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

राजा उदार झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 4:01 AM

भारतात अनेक भाषा बोलल्या जातात, परंतु मराठी अभिजात आणि समृद्ध, पारंपरिक संचित बाळगून असलेली भक्कम अशी भाषा आहे. मराठी ही देशातील मोठ्या समूहाकडून बोलली जाणारी चौथ्या क्रमांकाची भाषा

भारतात अनेक भाषा बोलल्या जातात, परंतु मराठी अभिजात आणि समृद्ध, पारंपरिक संचित बाळगून असलेली भक्कम अशी भाषा आहे. मराठी ही देशातील मोठ्या समूहाकडून बोलली जाणारी चौथ्या क्रमांकाची भाषा असून जगातील असंख्य भाषांमध्ये मराठीचा पंधरावा क्रमांक लागतो. अशा या माय मराठीच्या समृद्धीसाठी शासन ते नागरिक सातत्याने प्रयत्न सुरू असतात. या प्रयत्नात मराठी साहित्य संमेलनाचेही मोठे योगदान आहे. मराठीचा हा गौरव सोहळा दरवर्षी न चुकता आयोजित केला जातो. परंतु या भव्य आयोजनाला कोटीच्या वर खर्च येतो. शासन मात्र दरवेळी २५ लाखांचे अनुदान देऊन आपली सुटका करून घेत होते. महागाईमुळे संमेलनासाठी २५ लाख पुरत नाहीत. त्यामुळे संमेलनाचे अनुदान वाढविण्यात यावे, असा प्रस्ताव महामंडळाने सरकारकडे पाठवला होता. अखेर सरकारने या प्रस्तावाची दखल घेत मराठीच्या या गौरव सोहळ्यासाठी आपली तिजोरी उघडली असून २५ लाखांचे अनुदान आता दुप्पट म्हणजे ५० लाख इतके केले आहे. शासनाची ही उदारता खरच अभिनंदनीय आहे. शासनाच्या या निर्णयाला आणखी एक महत्त्वाचा कंगोरा आहे. तो म्हणजे, इंग्रजी ही जागतिक पातळीवरची ज्ञानभाषा आहे आणि आता तर ती बाजारपेठेची भाषा झाली आहे. परिणामी इंग्रजीचा वापर प्रचंड वाढला आहे. याचा फटका मराठीला बसत आहे. मराठी भाषा जिवंत राहावी यासाठी प्रयत्नशीलता आणि प्रयोगशीलता कमी पडत आहे. मुळात कोणतीही भाषा टिकणे आणि तिचा विकास होणे म्हणजे काय, तर संभाषण, वाचन, लेखन या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या तिन्ही आघाड्यांवर मराठीला अग्रेसर करण्यासाठी साहित्य संमेलनाच्या मंचावरून सातत्याने प्रयत्न सुरू असतात. अनेकदा संमेलनाच्या आयोजनावरून आणि अंतर्गत राजकारणावरून टीकाही होत असते. परंतु म्हणून मराठीसाठी हे संमेलन घेत असलेले कष्ट नजरेआड करता येत नाही. साडेपाच दशकांपूर्वी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मराठी भाषेची स्थिती बदलणे शक्य होते, परंतु तेव्हा ते तितक्या क्षमतेने घडले नाही. मराठी संस्कृती, मराठी माणूस, मराठी भाषा याच्या केवळ गप्पाच झाल्या. शासनानेही घोषणा खूप केल्या पण जेव्हा गोष्ट पैशांची आली तेव्हा मात्र बहाणे शोधले. पण, साहित्य संमेलनाने मराठीची पताका कायम फडकत ठेवली. कधी झुणका-भाकर खाऊन तर कधी फाटक्या चादरी पांघरून सारस्वतांनी मराठीचा भविष्यातील प्रवास समृद्ध कसा होईल, यासाठी अखंड खस्ता खाल्ल्या. उशिरा का होईला शासनाला याची जाणीव झाली आणि शासनाने संमेलनाचे अनुदान दुप्पट केले. त्यासाठी शासनाचे मनस्वी अभिनंदन...