शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

खेडोपाडी काँग्रेस पोहोचवणारे देशभक्त केशवराव जेधे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 05:03 IST

आज देशभक्त केशवराव जेधे यांची १२५ वी जयंती, त्यानिमित्ताने झंझावाती कर्तृत्व असलेल्या या नेत्याचे स्मरण!

- दिग्विजय जेधे, अध्यक्ष, देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशन १९१७ साली भारतीय राजकारणात गांधीजींचा उदय झाला आणि राजकीय-सामाजिक स्तरावर नव्याने घुसळण होऊ लागली. राजकीय क्षितिजावर गांधींच्या उदयानंतर केशवराव जेधेंसारखा प्रागतिक-पुरोगामी विचारांचा युवक त्यांच्याकडे आकृष्ट होणं अगदीच स्वाभाविक होतं. १९३०पर्यंत महाराष्ट्र काँग्रेसमध्ये  टिळक-समर्थक केळकर गटाचं प्राबल्य होतं; पण १९३० नंतर ही सूत्रे शंकरराव देवांसारख्या गांधीवादी गटाकडे जाऊ लागली. यादरम्यान महाराष्ट्राच्या राजकीय प्रतलात निर्माण झालेली पोकळी केशवराव जेधेंसारख्या ब्राह्मणेतर नेत्याने  समर्थपणे भरून काढली. १९२४ ली सप्टेंबर महिन्यात महात्मा गांधी जेव्हा पुण्यात आले होते, तेव्हा त्यांचा स्वागत-कार्यक्रम जेधे मॅन्शनमध्येच आयोजित करण्यात आला होता. ब्रिटिश हाच आपला मुख्य शत्रू आहे त्यामुळे या बलाढ्य शत्रूला नामोहरम केल्यानंतर ब्राह्मण-ब्राह्मणेतर हा वाद सोडवला जाऊ शकतो, असे आवाहन महात्मा गांधीजींनी जेधे मॅन्शन इथल्या सभेत केले. याला प्रतिसाद देत केशवरावांनी आपला मोर्चा  ब्राह्मणेतर चळवळीकडून स्वातंत्र्य चळवळीकडे वळवला.

६ एप्रिल, १९३० रोजी महात्मा गांधींनी दांडी येथे मीठ उचलल्यानंतर  पुढे आठवडाभर केशवराव जेधे  विठ्ठल रामजी शिंदे, प्रा. धर्मानंद कोसंबी यांच्यासह पुण्याच्या पंचक्रोशीत फिरले.  मराठा समाजात जन्मलेले आणि कान्होजी-बाजी जेधेंचा जाज्ज्वल्य वारसा लाभलेले केशवराव  हे बहुजनांच्या, दलितांच्या वस्त्यांत जाऊ लागले आणि सत्याग्रहात सर्व जाती-धर्मांनी का सामील झाले पाहिजे, यावर प्रकाश टाकू लागले. कालांतराने गांधींच्या अनुयायांचंही अटकसत्र सुरू झालं. २६ जानेवारी १९३२ रोजी केशवराव जेधेंना अटक झाली आणि त्यांची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली. या कारावासात सोबत असलेल्या काकासाहेब गाडगीळ यांच्याशी जेधेंचा मैत्रभाव वाढत गेला.१९३४ च्या एप्रिल महिन्यात गांधीजींनी चळवळ मागे घेतली आणि त्याच वेळी काँग्रेसजनांना निवडणुकीचे वेध लागले. मध्यवर्ती कायदेमंडळाच्या निवडणुकीसाठी ब्राह्मणेतरांचे नेते म्हणून केशवराव जेधे यांना पुणे प्रांतासाठी उमेदवारी द्यावी यासाठी काकासाहेब गाडगीळ आग्रही होते. शेवटी केशवराव  तयार झाले. सातारा जिल्ह्यातील जनतेने केशवरावांना बहुमतांनी निवडून दिले. 

१९३६ साली काँग्रेसच्या  फैजपूर अधिवेशनाची मुख्य जबाबदारी केशवरावांच्या खांद्यांवर होती. त्या काळी संदेशवहनाची आणि दळणवळणाची साधने आजच्या इतकी प्रभावी नक्कीच नव्हती. अशा प्रतिकूलतेतही केशवराव जेधेंनी कंबर कसली आणि मे ते डिसेंबर १९३६ या कालावधीत महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला.  डिसेंबर महिन्यात भरलेल्या या ऐतिहासिक अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित नेहरू यांच्यासमोर जवळपास साठ हजारांचा विराट जनसमुदाय होता. १९३८ साली महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस कमिटीचं अध्यक्षपद केशवरावांना मिळालं आणि काँग्रेस मजबूत व्हायला, तळागाळापर्यंत पोहोचायला आत्यंतिक मदत झाली. केशवराव जेधेंसारखा ब्राह्मणेतर नेता ब्राह्मणवादी गटाचं वर्चस्व असलेल्या काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष व्हावा, ही घटना काँग्रेसच्या राजकारणाला नवं वळण देणारी ठरली. १९३७ साली ४६ हजार सभासद संख्या असलेली काँग्रेस केशवरावांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत १ लाख ६३ हजार ८८० सभासदांची प्रचंड मोठा जनाधार असलेली चळवळ झाली. १९३७-३८ या काळात तर ब्राह्मणेतर पक्षातील अनेक प्रमुख कार्यकर्ते-नेते केशवरावांचा झंझावात पाहून प्रभावित झाले आणि स्वतःहून काँग्रेसमध्ये आले. पुणे जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष शंकरराव मोरे यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्ते काँग्रेसच्या छत्राखाली एकवटू लागले. 

काँग्रेस खऱ्या अर्थाने बहुजनांची होऊ लागली ती १९३८ नंतरच! मराठी प्रांतातल्या सर्वजातीय, सर्वधर्मीय बहुजनांना एका राष्ट्रव्यापी राजकीय चळवळीत आणि राजकारणाच्या मुख्य प्रवाहात सक्रिय करण्याचं  कार्य सर्वप्रथम कोणी केलं असेल तर ते केशवराव जेधेंनीच!  

टॅग्स :congressकाँग्रेस