शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

खेडोपाडी काँग्रेस पोहोचवणारे देशभक्त केशवराव जेधे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 05:03 IST

आज देशभक्त केशवराव जेधे यांची १२५ वी जयंती, त्यानिमित्ताने झंझावाती कर्तृत्व असलेल्या या नेत्याचे स्मरण!

- दिग्विजय जेधे, अध्यक्ष, देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशन १९१७ साली भारतीय राजकारणात गांधीजींचा उदय झाला आणि राजकीय-सामाजिक स्तरावर नव्याने घुसळण होऊ लागली. राजकीय क्षितिजावर गांधींच्या उदयानंतर केशवराव जेधेंसारखा प्रागतिक-पुरोगामी विचारांचा युवक त्यांच्याकडे आकृष्ट होणं अगदीच स्वाभाविक होतं. १९३०पर्यंत महाराष्ट्र काँग्रेसमध्ये  टिळक-समर्थक केळकर गटाचं प्राबल्य होतं; पण १९३० नंतर ही सूत्रे शंकरराव देवांसारख्या गांधीवादी गटाकडे जाऊ लागली. यादरम्यान महाराष्ट्राच्या राजकीय प्रतलात निर्माण झालेली पोकळी केशवराव जेधेंसारख्या ब्राह्मणेतर नेत्याने  समर्थपणे भरून काढली. १९२४ ली सप्टेंबर महिन्यात महात्मा गांधी जेव्हा पुण्यात आले होते, तेव्हा त्यांचा स्वागत-कार्यक्रम जेधे मॅन्शनमध्येच आयोजित करण्यात आला होता. ब्रिटिश हाच आपला मुख्य शत्रू आहे त्यामुळे या बलाढ्य शत्रूला नामोहरम केल्यानंतर ब्राह्मण-ब्राह्मणेतर हा वाद सोडवला जाऊ शकतो, असे आवाहन महात्मा गांधीजींनी जेधे मॅन्शन इथल्या सभेत केले. याला प्रतिसाद देत केशवरावांनी आपला मोर्चा  ब्राह्मणेतर चळवळीकडून स्वातंत्र्य चळवळीकडे वळवला.

६ एप्रिल, १९३० रोजी महात्मा गांधींनी दांडी येथे मीठ उचलल्यानंतर  पुढे आठवडाभर केशवराव जेधे  विठ्ठल रामजी शिंदे, प्रा. धर्मानंद कोसंबी यांच्यासह पुण्याच्या पंचक्रोशीत फिरले.  मराठा समाजात जन्मलेले आणि कान्होजी-बाजी जेधेंचा जाज्ज्वल्य वारसा लाभलेले केशवराव  हे बहुजनांच्या, दलितांच्या वस्त्यांत जाऊ लागले आणि सत्याग्रहात सर्व जाती-धर्मांनी का सामील झाले पाहिजे, यावर प्रकाश टाकू लागले. कालांतराने गांधींच्या अनुयायांचंही अटकसत्र सुरू झालं. २६ जानेवारी १९३२ रोजी केशवराव जेधेंना अटक झाली आणि त्यांची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली. या कारावासात सोबत असलेल्या काकासाहेब गाडगीळ यांच्याशी जेधेंचा मैत्रभाव वाढत गेला.१९३४ च्या एप्रिल महिन्यात गांधीजींनी चळवळ मागे घेतली आणि त्याच वेळी काँग्रेसजनांना निवडणुकीचे वेध लागले. मध्यवर्ती कायदेमंडळाच्या निवडणुकीसाठी ब्राह्मणेतरांचे नेते म्हणून केशवराव जेधे यांना पुणे प्रांतासाठी उमेदवारी द्यावी यासाठी काकासाहेब गाडगीळ आग्रही होते. शेवटी केशवराव  तयार झाले. सातारा जिल्ह्यातील जनतेने केशवरावांना बहुमतांनी निवडून दिले. 

१९३६ साली काँग्रेसच्या  फैजपूर अधिवेशनाची मुख्य जबाबदारी केशवरावांच्या खांद्यांवर होती. त्या काळी संदेशवहनाची आणि दळणवळणाची साधने आजच्या इतकी प्रभावी नक्कीच नव्हती. अशा प्रतिकूलतेतही केशवराव जेधेंनी कंबर कसली आणि मे ते डिसेंबर १९३६ या कालावधीत महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला.  डिसेंबर महिन्यात भरलेल्या या ऐतिहासिक अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित नेहरू यांच्यासमोर जवळपास साठ हजारांचा विराट जनसमुदाय होता. १९३८ साली महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस कमिटीचं अध्यक्षपद केशवरावांना मिळालं आणि काँग्रेस मजबूत व्हायला, तळागाळापर्यंत पोहोचायला आत्यंतिक मदत झाली. केशवराव जेधेंसारखा ब्राह्मणेतर नेता ब्राह्मणवादी गटाचं वर्चस्व असलेल्या काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष व्हावा, ही घटना काँग्रेसच्या राजकारणाला नवं वळण देणारी ठरली. १९३७ साली ४६ हजार सभासद संख्या असलेली काँग्रेस केशवरावांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत १ लाख ६३ हजार ८८० सभासदांची प्रचंड मोठा जनाधार असलेली चळवळ झाली. १९३७-३८ या काळात तर ब्राह्मणेतर पक्षातील अनेक प्रमुख कार्यकर्ते-नेते केशवरावांचा झंझावात पाहून प्रभावित झाले आणि स्वतःहून काँग्रेसमध्ये आले. पुणे जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष शंकरराव मोरे यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्ते काँग्रेसच्या छत्राखाली एकवटू लागले. 

काँग्रेस खऱ्या अर्थाने बहुजनांची होऊ लागली ती १९३८ नंतरच! मराठी प्रांतातल्या सर्वजातीय, सर्वधर्मीय बहुजनांना एका राष्ट्रव्यापी राजकीय चळवळीत आणि राजकारणाच्या मुख्य प्रवाहात सक्रिय करण्याचं  कार्य सर्वप्रथम कोणी केलं असेल तर ते केशवराव जेधेंनीच!  

टॅग्स :congressकाँग्रेस