शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

काश्मीरचे दुखणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 04:10 IST

जम्मू व काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन तसेच अतिरेक्यांचे हल्ले व घुसखोरी थांबायला तयार नाही. हे काश्मीर खो-यातच घडत नसून, अलीकडे जम्मूमध्येही हे प्रकार वाढू लागले आहेत.

जम्मू व काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन तसेच अतिरेक्यांचे हल्ले व घुसखोरी थांबायला तयार नाही. हे काश्मीर खो-यातच घडत नसून, अलीकडे जम्मूमध्येही हे प्रकार वाढू लागले आहेत. जम्मूच्या सीमेकडील भागांत पाकिस्तानी सैनिक रोजच्या रोज गोळीबार करीत आहेतच, पण सुंजवां लष्करी कॅम्पमध्ये घुसून, अतिरेक्यांनी शनिवारी पहाटे हल्ला केला. हल्लेखोरांना सुुरक्षा दलांनी कंठस्नान घातले तरी त्यात पाच जवानांनाही वीरमरण आले. शिवाय अनेक जखमी झाले. सोमवारी सकाळी पुन्हा श्रीनगरच्या नागरोटा लष्करी तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला आणि तो असफल झाल्यानंतर एका जवानावर गोळ्या झाडल्या. तो हुतात्मा झाला. तीन दिवसांत भारताचे सहा जवान अतिरेक्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले. दरवेळी हल्ला झाल्यानंतर अतिरेक्यांच्या कारवाया हाणून पाडू, पाकिस्तानला धडा शिकवण्यास भारतीय जवान समर्थ आहेत, असे केंद्र सरकार सांगते आणि तरीही हल्ले सुरूच राहतात. गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळवण्यात पुरेसे यश येत नाही की काय, अशी शंका त्यामुळे येऊ लागली आहे. पाकिस्तानला जशास तसे उत्तर भारतीय जवान देतच असतात. पण अतिरेकी हल्ल्यांमध्ये जवानांचे शहीद होणे, स्थानिक ठार होणे, असंख्य लोक जखमी होणे, ही अतिशय चिंतेची बाब आहे. दहशतवाद कमी होत चालला आहे, त्यांना स्थानिकांचा पाठिंबा मिळेनासा झाला आहे, अतिरेक्यांचे कंबरडे मोडले आहेत, अशा घोषणा म्हणजे जणू वल्गनाच ठरू लागल्या आहेत. प्रचंड बेरोजगारी, राज्य सरकारचा गैरकारभार, भ्रष्टाचार, सत्तेतील पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टी आणि भाजपा यांच्यातील अविश्वास आणि स्थानिक जनतेचा त्यांच्याकडून होत चाललेला भ्रमनिरास या साºयांचा फायदा अतिरेकी संघटना व पाकिस्तान उचलत आहे. पाकिस्तानसारखा शेजारी देश तर काश्मीरमध्ये असे वातावरण निर्माण व्हावे, यासाठीच प्रयत्न करीत आहे. सुरक्षा दलांवर दगडफेकीच्या घटना कमी झाल्या असल्या तरी अनेक स्थानिकांचा आणि विशेषत: तरुणांचा अतिरेक्यांना छुपा पाठिंबा असल्यानेच त्यांच्या घुसखोरीला मदत व त्यांना आश्रय मिळत आहे. अन्यथा स्थानिक वा पाकिस्तानी अतिरेकी ही हिंमतच करू शकणार नाहीत. राज्य सरकार व जनता यांच्यात संबंध पुरते तुटलेले आहेत. पीडीपीचा भाजपाशी घरोबा खोºयातील जनतेला आवडलेला नाही आणि अनेक पीडीपी नेत्यांचा अतिरेकी व फुटीरवादी गटांना पाठिंबा आहे, असे भाजपाचेच म्हणणे आहे. तशी वस्तुस्थितीच आहे. नॅशनल कॉन्फरन्सचेही काही नेते फुटीरवादी व अतिरेकी गटांना मदत करीत असतात. काँग्रेस तिथे आता नावापुरती उरली आहे. या स्थितीत काश्मिरी जनता मूळ प्रवाहापासून दूर होत चालली असून, तिचा विश्वास संपादन करेल, असा एकही पक्ष वा नेता खोºयात नाही. मध्यंतरी केंद्र सरकारने काश्मिरी जनतेशी संवाद साधण्यासाठी दिनेश्वर शर्मा यांची नेमणूक केली खरी, पण त्याचा उपयोग झाल्याचे दिसलेले नाही. काश्मीरमध्ये सुरक्षा दले असणे गरजेचेच आहे. पण लष्करी बळावर राज्य ताब्यात ठेवणे हा कायमचा उपाय असूच शकत नाही. सरकार व प्रशासन निष्क्रिय ठरतात, त्यांच्याविषयी लोकांना विश्वास वाटत नाही, तेव्हाचे वातावरण स्फोटक स्थितीसाठी पूरक असते. तसे ते होणार नाही, ही आपलीच जबाबदारी आहे. पाकिस्तान, अतिरेकी व फुटीरवादी शक्तींना धडा शिकवायलाच हवा, पण आपले घर शाबूत राहील, यासाठी विशेष प्रयत्न हवेत. काश्मिरींचे मूळ दुखणे दूर करण्यासाठी त्यासाठी जनतेचा विश्वास मिळवणे आणि त्यांचे प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. त्यात सरकार व यंत्रणांना आतापर्यंतही यश आलेले नाही.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर