शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
4
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
5
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
6
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
7
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
8
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
9
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
10
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
11
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
12
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
13
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
14
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
15
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
16
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
17
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
18
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
19
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
20
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...

जरा हटके, जरा बचके... मुंबई मेरी जान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 01:30 IST

देशपातळीवर हॉटेल, मॉल्स, प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी राज्य सरकारने त्याला परवानगी दिलेली नाही.

कोरोनामुळे सर्वच व्यवहारांना लागलेले कुलूप हळूहळू उघडायला प्रारंभ झाला आहे. खासगी कार्यालयांच्या टेबलांवरील धूळ झटकली गेली. बागबगीचे माणसांनी गजबजले. ‘मॉर्निंग वॉक’ची दिनचर्या नव्या उत्साहाने सुरू झाली. दुकानांची शटर सताड उघडली गेली. काळा धूर सोडत मोटारी-दुचाकींची लगबग सुरू झाली. एका विषाणूने स्टॅच्यू केलेले आजूबाजूचे विश्व पुन्हा हलू लागले, धावू लागले.

देशपातळीवर हॉटेल, मॉल्स, प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी राज्य सरकारने त्याला परवानगी दिलेली नाही. एकीकडे जनजीवन सुरू करण्याची इच्छा, आर्थिक चक्र गतिमान करण्याची अपरिहार्यता, तर दुसरीकडे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे अवघड झाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती या कात्रीत सरकारसह सारेच सापडले आहेत. ज्या देशाची लोकसंख्या १३५ कोटींच्या घरात आहे, तेथे सोशल डिस्टन्सिंगची काटेकोर अंमलबजावणी होण्याचा आग्रह धरणे हे हास्यास्पद आहे. सोमवारी उपनगरांतील डोंबिवली व विरार या लक्षावधी नोकरदारवर्गाचे आश्रयस्थान असलेल्या शहरांत हेच दिसून आले. मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली उपनगरीय लोकल अजून सुरु झालेली नसून ती लागेच सुरु होण्याची शक्यता नाही. लोकलखेरीज हे शहर म्हणजे कुबड्यांशिवाय पंगू व्यक्ती अशी अवस्था आहे. मात्र, अशा परिस्थितीत खासगी कार्यालये अत्यल्प कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु झाली तरीही बसगाड्यांकरिता पाच किलोमीटर लांबीच्या रांगा लागल्या. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांनुसार ‘एका आसनावर एक’ असे बसवून या हजारो कर्मचाऱ्यांना नेणे अशक्य असल्याने त्या प्रवाशांनीच ‘एका आसनावर दोनजण’ बसविण्याची ‘तडजोड’ स्वीकारली. अर्थात, ही ‘तडजोड’ आपल्या जीवावर बेतू शकते, याची जाणीव असूनही केवळ आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या पोटा-पाण्याकरिता ते ही जोखीम पत्करायला तयार झाले. अगोदर बसगाडीच्या रांगेत दोन तास उभे राहायचे व त्यानंतर तब्बल तीन-साडेतीन तासांचा बसचा प्रवास करून कार्यालय गाठायचे, ही सर्कस जोवर रेल्वेसेवा पूर्ववत होत नाही, तोवर त्यांना करायची आहे. शासकीय व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी गेली अडीच महिने हा द्राविडीप्राणायम करीत आहेत. मुंबई व उपनगरांकरिता तसेच पुणे, नागपूर आदी मोठ्या शहरांकरिता बसखेरीज सार्वजनिक वाहतुकीची मेट्रो सेवा २० वर्षांपूर्वीच उभारली जाणे गरजेचे होते. तसे झाले असते तर कदाचित या शहरांमधील गर्दी रेल्वे, बस आणि मेट्रो यांमध्ये विभागली जाऊन या सेवा लवकर सुरु करणे शक्य झाले असते. कोरोना असो की, निसर्ग वादळ प्रत्येक गोष्टीत ‘माझा’ टीआरपी पाहणाºया वाहिन्यांकडून सध्या सर्व काही सुरळीत होण्याचा आग्रह धरला जात असतानाच महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही कशी चीन अथवा स्पेनशी स्पर्धा करत आहे, असे गळेही काढले जात आहेत. ब्रिटिशकालीन साथरोग कायद्याने नोकरशाहीच्या हाती अनेक अधिकार देऊन त्यांचे हात बळकट केले आहेत. त्यामुळे काही नोकरशहा रुग्णवाढ टाळण्याकरिता निर्बंध सैल करायला तयार नाहीत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने बंधने सैलावण्याबाबत तीन पक्षांच्या तीन भूमिका आहेत. त्यामुळे याचा परिणाम जनजीवन पूर्ववत होण्यावर होत आहेत. असे सतत बिचकत घराबाहेर पडण्याचा, आज सुरु झालेल्या गोष्टी उद्या लागलीच भीतीने बंद होण्याचा पायंडा पडला, तर त्याचा आणखी विपरीत परिणाम लोकांच्या मनोधैर्यावर व आर्थिक चक्र पूर्ववत होण्यावर होणार आहे. लोकांमधील साठेबाजी करण्याचा व पर्यायाने वस्तूंचा काळाबाजार, चढ्या दराने विक्री वगैरे अनुचित प्रकार वाढण्याचा धोका आहे. मरिन लाईन्स येथे फिरायला येणाºयांनी रविवारी गर्दी करताच सोमवारी पुन्हा दंडुकेधारींनी परिसराचा ताबा घेतला; हे उचित नाही. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्या दिशेने या शहराची जडणघडण झाली असून, या शहरात वावरताना आपली काळजी कशी घ्यावी, हे मुंबईकरांएवढे अन्य कुणालाच ठावूक नाही. ‘ऐ दिल हैं मुश्किल जीना यहाँ, जरा हटके, जरा बचके ये है बॉम्बे मेरी जान’ या गीतामध्येच तो संदेश दिलेला आहे. 

टॅग्स :Mumbaiमुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या