शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

जरा हटके, जरा बचके... मुंबई मेरी जान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 01:30 IST

देशपातळीवर हॉटेल, मॉल्स, प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी राज्य सरकारने त्याला परवानगी दिलेली नाही.

कोरोनामुळे सर्वच व्यवहारांना लागलेले कुलूप हळूहळू उघडायला प्रारंभ झाला आहे. खासगी कार्यालयांच्या टेबलांवरील धूळ झटकली गेली. बागबगीचे माणसांनी गजबजले. ‘मॉर्निंग वॉक’ची दिनचर्या नव्या उत्साहाने सुरू झाली. दुकानांची शटर सताड उघडली गेली. काळा धूर सोडत मोटारी-दुचाकींची लगबग सुरू झाली. एका विषाणूने स्टॅच्यू केलेले आजूबाजूचे विश्व पुन्हा हलू लागले, धावू लागले.

देशपातळीवर हॉटेल, मॉल्स, प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी राज्य सरकारने त्याला परवानगी दिलेली नाही. एकीकडे जनजीवन सुरू करण्याची इच्छा, आर्थिक चक्र गतिमान करण्याची अपरिहार्यता, तर दुसरीकडे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे अवघड झाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती या कात्रीत सरकारसह सारेच सापडले आहेत. ज्या देशाची लोकसंख्या १३५ कोटींच्या घरात आहे, तेथे सोशल डिस्टन्सिंगची काटेकोर अंमलबजावणी होण्याचा आग्रह धरणे हे हास्यास्पद आहे. सोमवारी उपनगरांतील डोंबिवली व विरार या लक्षावधी नोकरदारवर्गाचे आश्रयस्थान असलेल्या शहरांत हेच दिसून आले. मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली उपनगरीय लोकल अजून सुरु झालेली नसून ती लागेच सुरु होण्याची शक्यता नाही. लोकलखेरीज हे शहर म्हणजे कुबड्यांशिवाय पंगू व्यक्ती अशी अवस्था आहे. मात्र, अशा परिस्थितीत खासगी कार्यालये अत्यल्प कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु झाली तरीही बसगाड्यांकरिता पाच किलोमीटर लांबीच्या रांगा लागल्या. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांनुसार ‘एका आसनावर एक’ असे बसवून या हजारो कर्मचाऱ्यांना नेणे अशक्य असल्याने त्या प्रवाशांनीच ‘एका आसनावर दोनजण’ बसविण्याची ‘तडजोड’ स्वीकारली. अर्थात, ही ‘तडजोड’ आपल्या जीवावर बेतू शकते, याची जाणीव असूनही केवळ आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या पोटा-पाण्याकरिता ते ही जोखीम पत्करायला तयार झाले. अगोदर बसगाडीच्या रांगेत दोन तास उभे राहायचे व त्यानंतर तब्बल तीन-साडेतीन तासांचा बसचा प्रवास करून कार्यालय गाठायचे, ही सर्कस जोवर रेल्वेसेवा पूर्ववत होत नाही, तोवर त्यांना करायची आहे. शासकीय व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी गेली अडीच महिने हा द्राविडीप्राणायम करीत आहेत. मुंबई व उपनगरांकरिता तसेच पुणे, नागपूर आदी मोठ्या शहरांकरिता बसखेरीज सार्वजनिक वाहतुकीची मेट्रो सेवा २० वर्षांपूर्वीच उभारली जाणे गरजेचे होते. तसे झाले असते तर कदाचित या शहरांमधील गर्दी रेल्वे, बस आणि मेट्रो यांमध्ये विभागली जाऊन या सेवा लवकर सुरु करणे शक्य झाले असते. कोरोना असो की, निसर्ग वादळ प्रत्येक गोष्टीत ‘माझा’ टीआरपी पाहणाºया वाहिन्यांकडून सध्या सर्व काही सुरळीत होण्याचा आग्रह धरला जात असतानाच महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही कशी चीन अथवा स्पेनशी स्पर्धा करत आहे, असे गळेही काढले जात आहेत. ब्रिटिशकालीन साथरोग कायद्याने नोकरशाहीच्या हाती अनेक अधिकार देऊन त्यांचे हात बळकट केले आहेत. त्यामुळे काही नोकरशहा रुग्णवाढ टाळण्याकरिता निर्बंध सैल करायला तयार नाहीत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने बंधने सैलावण्याबाबत तीन पक्षांच्या तीन भूमिका आहेत. त्यामुळे याचा परिणाम जनजीवन पूर्ववत होण्यावर होत आहेत. असे सतत बिचकत घराबाहेर पडण्याचा, आज सुरु झालेल्या गोष्टी उद्या लागलीच भीतीने बंद होण्याचा पायंडा पडला, तर त्याचा आणखी विपरीत परिणाम लोकांच्या मनोधैर्यावर व आर्थिक चक्र पूर्ववत होण्यावर होणार आहे. लोकांमधील साठेबाजी करण्याचा व पर्यायाने वस्तूंचा काळाबाजार, चढ्या दराने विक्री वगैरे अनुचित प्रकार वाढण्याचा धोका आहे. मरिन लाईन्स येथे फिरायला येणाºयांनी रविवारी गर्दी करताच सोमवारी पुन्हा दंडुकेधारींनी परिसराचा ताबा घेतला; हे उचित नाही. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्या दिशेने या शहराची जडणघडण झाली असून, या शहरात वावरताना आपली काळजी कशी घ्यावी, हे मुंबईकरांएवढे अन्य कुणालाच ठावूक नाही. ‘ऐ दिल हैं मुश्किल जीना यहाँ, जरा हटके, जरा बचके ये है बॉम्बे मेरी जान’ या गीतामध्येच तो संदेश दिलेला आहे. 

टॅग्स :Mumbaiमुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या