शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

जातविरहित स्त्रीमुक्ती चळवळ, स्त्रियांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:54 PM

‘स्त्री शिकली तर आमची कुटुंब व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होईल’, असे कुजकट विचार स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीत अग्रेसर असलेल्या एका राष्ट्रीय पुढा-याने व्यक्त केले होते.

‘स्त्री शिकली तर आमची कुटुंब व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होईल’, असे कुजकट विचार स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीत अग्रेसर असलेल्या एका राष्ट्रीय पुढा-याने व्यक्त केले होते. त्यामुळे केवळ समाजच नाही तर समाज जागरणाची धुरा ज्यांच्यावर आहे अशी पुढारलेली माणसेदेखील महिलांबद्दल असे प्रतिगामी विचार करीत असल्याने स्त्रीमुक्तीच्या चळवळीला सुरुवातीपासूनच अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले आहे. आजच्या अत्याधुनिक काळात स्त्री शिकली, किंबहुना पुरुषांपेक्षाही आज ती विविध क्षेत्रात अग्रेसर असली तरी आजही तिला लिंगभेदाच्या त्रासाला सामोरे जावे लागत असते. उच्चशिक्षित म्हणवून घेतलेल्या समाजातही त्यांना हा त्रास सहन करावा लागत असतो. अलीकडेच नागपुरात पार पडलेल्या महिला क्रांती परिषदेत या विषयावर व्यक्त झालेली चिंता आपण सा-यांनाच अंतर्मुख करणारी जशी आहे तशीच ती स्त्रीमुक्तीच्या चळवळीला पुढे नेणारी देखील आहे. अगदी पुराणकाळापासून समाजाने स्त्रियांवर दास्यत्व लादले आहे. महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतीमुळे स्त्रिया शिकल्या आणि सबंध देशात स्त्रीमुक्तीची चळवळ व्यापक झाली. पण अजूनही स्त्रियांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत नाही. स्त्री, मग ती कुठल्याही जातीची असो तिला लिंगभेद सहन करावाच लागतो. ती उच्च जातीची असेल तरी तिला हा त्रास होतोच. परंतु दलित समाजाच्या स्त्रीला होणारा त्रास हा तिहेरी स्वरुपाचा असतो. ती स्त्री आहे म्हणून कुटुंबात होणारा त्रास, दुसरा ती दलित आहे म्हणून आणि तिसरा ती गरीब आहे म्हणून. जातिव्यवस्थेमुळे भारतात लिंगभेदाचे स्वरूप भिन्न आहे. मात्र सर्वच जाती आणि स्तरातील स्त्रियांना हा छळ सहन करावाच लागतो. पण खेदाची बाब अशी की, स्त्रियांवर होणाºया अत्याचाराच्या प्रश्नांवरही जातीभेद आणि वर्णभेद पाळला जातोच. त्यामुळे लिंगभेदाविरुद्धच्या चळवळीत समस्त स्त्रीवर्ग एकवटू शकत नाही. गडचिरोली किंवा मेळघाटातील आदिवासी स्त्रियांचे प्रश्न स्वतंत्रपणे का चर्चिले जात नाही? ही चर्चा केवळ कुपोषण आणि नक्षलवादातून निर्माण होणाºया प्रश्नांभोवती का फिरत राहते? मजूर म्हणून काम करणाºया निरक्षर महिला किंवा कार्यालयात काम करणाºया उच्च शिक्षित महिला असो, या सर्वांना होणारा पुरुषी मानसिकतेचा त्रास हा सारखाच असतो. पण त्याची चर्चा एका व्यासपीठावर, एका आंदोलनातून होत नाही. एका जातीच्या महिलेवर झालेल्या अत्याचाराबाबत दुसºया जातीतील स्त्रियांचे मौन हा देखील एक गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे स्त्रीमुक्तीची चळवळ ही जातविरहित असणे नितांत गरजेचे आहे. नागपुरातील महिला क्रांती परिषदेतील चिंतनाचे हे सार आहे.

टॅग्स :Womenमहिला