शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

Jammu and Kashmir: काश्मीर खोऱ्यातली अशांतता  वाढवणारं घटनाबाह्य पाऊल ? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 13:59 IST

भारतीय राज्यघटनेतल्या २१ व्या भागात कलम ३७० आहे. ते ‘टेंपररी ट्रान्झिशनल अँड स्पेशल प्रोव्हिजन’ म्हणून स्वीकारण्यात आले.

-प्रा. उल्हास बापटभारतीय राज्यघटनेतल्या २१ व्या भागात कलम ३७० आहे. ते ‘टेंपररी ट्रान्झिशनल अँड स्पेशल प्रोव्हिजन’ म्हणून स्वीकारण्यात आले. म्हणजेच हे कलम ‘तात्पुरते’ आहे, हा याचा पहिला अर्थ होय. या कलमानुसार काश्मीरची वेगळी राज्यघटना अस्तित्वात आली. अशी स्वतंत्र राज्यघटना असणारे काश्मीर हे देशातले एकमेव राज्य आहे. ज्या मुद्यावरून खूप वाद होतो ती ‘३५-अ’ ही तरतूद या कलमातलीच आहे. यामुळे केवळ काश्मिरी लोकांनाच काश्मीरमध्ये नोकरी करता येईल, काश्मिरात मालमत्ता विकत घेता येईल, यासारखे अधिकार प्राप्त झाले. कलम ३७० काढले तर त्या अंतर्गत येणारी ‘३५-अ’ची तरतूदही आपोआपच जाते. आता प्रश्न असा आहे, की कलम ३७० रद्द कसे करता येते?सार्वजनिक अधिसूचना काढून राष्ट्रपती हे कलम रद्द करू शकतात. पण त्यासाठी काश्मीरच्या घटना समितीची परवानगी घेणे आवश्यक आहे. आता ही समिती केव्हाच संपुष्टात आलेली आहे. काश्मीरच्या घटना समितीची परवानगी याचा अर्थ असा होता, की काश्मिरी जनमत लक्षात घेऊन राष्ट्रपतींनी हा निर्णय करावा. काश्मिरी जनतेचे मत विचारात घ्यावे. त्यांना वगळून थेट हे कलम रद्द केले तर तो निर्णय एकतर्फी ठरू शकतो का, काश्मिरी जनतेशी केलेला तो विश्वासघात ठरेल का, याचा विचार व्हायला हवा. मुळात असे आहे, की गेल्या काही वर्षात काश्मीरची स्वायतत्ता अनेक मार्गांनी कमी होत आली आहे. मोजके मुद्दे वगळले तर ९० टक्के स्वायतत्ता संपलेलीच आहे. काश्मीरचे राज्यपाल, न्यायाधीश यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. काश्मिरी जनतेसाठी कायदे केले गेले आहेत. त्यामुळे ३७० कलमासंबंधीचा निर्णय घाईने करण्याची गरज होती का, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो.मला या ठिकाणी माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांची आठवण होते. वाजपेयी म्हणाले होते, ‘‘राम मंदिर, कलम ३७०, समान नागरी कायदा यासारखे वादग्रस्त मुद्दे आपण काही काळ बाजूला ठेवू. त्या ऐवजी देशाच्या प्रगतीवर लक्ष देऊ,’’ मला वाटते, की वाजपेयींची ही अपेक्षा आजही अनुकरणीय आहे. आज देशापुढे घसरती अर्थव्यवस्था, बेरोजगारी पाणी, शेती यासारखे अनेक महत्त्वाचे प्रश्न आ वासून उभे आहेत. या काळात कलम ३७०ला हात घालण्याची गरज आहे, असे मला वाटत नाही. काश्मिरची जनता हा निर्णय सहजपणे स्विकारणार नाही. पाकिस्तान, चीन यासारखे शेजारी आणि कदाचित अमेरिकेलादेखील हे कितपत पसंत पडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे काश्मिर खोऱ्यातली अशांतता अकारण वाढणार आहे. 

घटनातज्ज्ञ (शब्दांकन - सुकृत करंदीकर)

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Article 35 Aकलम 35-एAmit Shahअमित शहा