शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Jammu and Kashmir: काश्मीर खोऱ्यातली अशांतता  वाढवणारं घटनाबाह्य पाऊल ? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 13:59 IST

भारतीय राज्यघटनेतल्या २१ व्या भागात कलम ३७० आहे. ते ‘टेंपररी ट्रान्झिशनल अँड स्पेशल प्रोव्हिजन’ म्हणून स्वीकारण्यात आले.

-प्रा. उल्हास बापटभारतीय राज्यघटनेतल्या २१ व्या भागात कलम ३७० आहे. ते ‘टेंपररी ट्रान्झिशनल अँड स्पेशल प्रोव्हिजन’ म्हणून स्वीकारण्यात आले. म्हणजेच हे कलम ‘तात्पुरते’ आहे, हा याचा पहिला अर्थ होय. या कलमानुसार काश्मीरची वेगळी राज्यघटना अस्तित्वात आली. अशी स्वतंत्र राज्यघटना असणारे काश्मीर हे देशातले एकमेव राज्य आहे. ज्या मुद्यावरून खूप वाद होतो ती ‘३५-अ’ ही तरतूद या कलमातलीच आहे. यामुळे केवळ काश्मिरी लोकांनाच काश्मीरमध्ये नोकरी करता येईल, काश्मिरात मालमत्ता विकत घेता येईल, यासारखे अधिकार प्राप्त झाले. कलम ३७० काढले तर त्या अंतर्गत येणारी ‘३५-अ’ची तरतूदही आपोआपच जाते. आता प्रश्न असा आहे, की कलम ३७० रद्द कसे करता येते?सार्वजनिक अधिसूचना काढून राष्ट्रपती हे कलम रद्द करू शकतात. पण त्यासाठी काश्मीरच्या घटना समितीची परवानगी घेणे आवश्यक आहे. आता ही समिती केव्हाच संपुष्टात आलेली आहे. काश्मीरच्या घटना समितीची परवानगी याचा अर्थ असा होता, की काश्मिरी जनमत लक्षात घेऊन राष्ट्रपतींनी हा निर्णय करावा. काश्मिरी जनतेचे मत विचारात घ्यावे. त्यांना वगळून थेट हे कलम रद्द केले तर तो निर्णय एकतर्फी ठरू शकतो का, काश्मिरी जनतेशी केलेला तो विश्वासघात ठरेल का, याचा विचार व्हायला हवा. मुळात असे आहे, की गेल्या काही वर्षात काश्मीरची स्वायतत्ता अनेक मार्गांनी कमी होत आली आहे. मोजके मुद्दे वगळले तर ९० टक्के स्वायतत्ता संपलेलीच आहे. काश्मीरचे राज्यपाल, न्यायाधीश यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. काश्मिरी जनतेसाठी कायदे केले गेले आहेत. त्यामुळे ३७० कलमासंबंधीचा निर्णय घाईने करण्याची गरज होती का, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो.मला या ठिकाणी माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांची आठवण होते. वाजपेयी म्हणाले होते, ‘‘राम मंदिर, कलम ३७०, समान नागरी कायदा यासारखे वादग्रस्त मुद्दे आपण काही काळ बाजूला ठेवू. त्या ऐवजी देशाच्या प्रगतीवर लक्ष देऊ,’’ मला वाटते, की वाजपेयींची ही अपेक्षा आजही अनुकरणीय आहे. आज देशापुढे घसरती अर्थव्यवस्था, बेरोजगारी पाणी, शेती यासारखे अनेक महत्त्वाचे प्रश्न आ वासून उभे आहेत. या काळात कलम ३७०ला हात घालण्याची गरज आहे, असे मला वाटत नाही. काश्मिरची जनता हा निर्णय सहजपणे स्विकारणार नाही. पाकिस्तान, चीन यासारखे शेजारी आणि कदाचित अमेरिकेलादेखील हे कितपत पसंत पडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे काश्मिर खोऱ्यातली अशांतता अकारण वाढणार आहे. 

घटनातज्ज्ञ (शब्दांकन - सुकृत करंदीकर)

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Article 35 Aकलम 35-एAmit Shahअमित शहा