शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपमध्ये वाढतेय ती ‘ताकद’ की ‘सूज’?; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांपुढे आव्हान मोठे

By यदू जोशी | Updated: July 11, 2025 06:58 IST

रवींद्र चव्हाण साधे दिसतात; पण ठाणे, पालघरच्या पट्ट्यात इतर पक्षांबरोबरच एकनाथ शिंदेंनाही शह देण्याची ताकद ठेवणारा नेता अशी त्यांची इमेज आहे.

यदु जोशी, सहयोगी संपादक,लोकमत

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची कारकीर्द सुरू झाली आहे. त्यांचा नेहमीचा एक आवडीचा शब्द (शिवी) आहे. संघ-भाजपच्या संस्कारांच्या चौकटीत तो कितपत बसतो, ते सोडा; पण कार्यकर्त्यांना त्यांच्या त्या शब्दातून आपला नेता बिनधास्त, कोणाची पर्वा न करणारा आणि सगळ्यांना ताकद देणारा आहे असे वाटत राहाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना नेहमीच गमतीने म्हणतात, ‘रवी, तू हा जो शब्द वापरतो ना, तेवढ्याच वेळा देवाचे नाव घेतले असते तर तुला देव पावला असता!’- अर्थात ही झाली गंमत. प्रदेशाध्यक्ष झाले म्हणून  बोलण्याचा बाज बदलणे, तो शब्द आपल्या कोशातून काढून टाकणे असे काही होणार नाही, कारण तोच चव्हाणांचा यूएसपीदेखील आहे. 

चव्हाण साधे दिसतात; पण  साधे नाहीत. जीन्स आणि शर्ट घालणारा अध्यक्ष भाजपला मिळाला आहे. ठाणे, पालघरच्या पट्ट्यात इतर पक्षांबरोबरच एकनाथ शिंदेंनाही शह देण्याची ताकद ठेवणारा नेता अशी त्यांची ‘भाई इमेज’ आहे. भाजपमध्ये ‘भाऊ’ असतात; पण आता ‘भाई’ आलेले आहेत. कोकणात भाजपचा दबदबा गेल्या काही वर्षांत वाढविण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विशेषत: विदर्भातील पक्षाचे नेते त्यांना कसे स्वीकारतात आणि कसे सहकार्य करतात यावर त्यांच्या कारकिर्दीचे यश अवलंबून असेल. पाच-सहा महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे त्यांच्यासमोरचे मोठे आव्हान असेल.

राजकीय वर्तुळात असा तर्क दिला जातो (अर्थात या तर्काला फार आधार आहे असे नाही) की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २०२८ मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील आणि त्यांच्या नेतृत्वात भाजप २०२९ची लोकसभा निवडणूक लढेल. तसे झालेच तर ‘महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण?’ याची चर्चा होत राहते.  पहिले नाव अर्थातच चंद्रशेखर बावनकुळे यांचे. २०१९च्या निवडणुकीत तिकीट न मिळू शकलेले बावनकुळे गेल्या सहा वर्षांत बरेच पुढे निघून गेले आहेत. मग पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार अशीही नावे येतात. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला निर्भेळ यश मिळाले तर  या संभाव्यांच्या यादीमध्ये रवींद्र चव्हाण हे नावदेखील जोडले जाईल. 

पक्ष सत्तेत नसताना सांभाळणे तुलनेने सोपे असते. आल्या दिवशी आंदोलन करणे हाच बव्हंशी अजेंडा असतो. सरकारमध्ये असताना पक्ष सांभाळणे अधिक कठीण. पक्षाच्या मंत्र्यांना पक्षाच्या माध्यमातून जनतेप्रति उत्तरदायी करण्याचे आव्हान चव्हाण यांच्यासमोर आहे. केवळ प्रदेश कार्यालयात मंत्र्यांचे जनता दरबार भरविण्याइतपतच हे उत्तरदायित्व मर्यादित राहू नये. भाजपच्या जिल्हाध्यक्षालाही मंत्रालयातील पाससाठी ‘जॅक’ लावावा लागतो, चिरीमिरी द्यावी लागते याबद्दल खूप अस्वस्थता आहे. सरकार येऊन आठ महिने झाले तरी पक्षाच्या कार्यकर्त्याला साधे एसईओ, तालुका कमिटीचे सदस्यपदही मिळू शकलेले नाही. विधानसभा निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतलेले कार्यकर्ते आता छोटेमोठे पद मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. बावनकुळे मागे म्हणाले होते, जूनमध्ये आम्ही ही पदे वाटू, अजून काहीच झाले नाही.

बावनकुळे प्रदेशाध्यक्ष असतानाच मंत्रीदेखील होते.  चव्हाण सत्तेत नाहीत, तरीही मंत्र्यांना पक्षाच्या कामाला लावणे हे आव्हान त्यांच्यासमोर असेल. बावनकुळेंचा हात मोकळा होता, चव्हाण यांचेही तसेच आहे म्हणतात. मोकळ्या हाताच्या प्रदेशाध्यक्षाचा ट्रेण्ड चव्हाण यांनी कायम ठेवावा, अशी अनेकांची इच्छा आहे. अर्थात त्यांच्याकडे मंत्रिपद नसल्याने त्यांना मर्यादा आहेत. इकडून घेणे आणि तिकडे देणे असेच त्यांना करावे लागणार आहे. सध्या अनेक पक्षांमधून भाजपमध्ये जाणाऱ्यांची अक्षरश: रांग लागली आहे. म्हणाल तर पक्ष भलामोठ्ठा होताना दिसतो; पण म्हणाल तर ही सूजदेखील आहे. ज्यांनी पक्षासाठी सतरंज्या उचलल्या, चिवडा खाऊन प्रचार केला ते सरकारमध्ये आलेले दोन वाटेकरी पक्ष आणि आता इतर पक्षांतून येत असलेले नेते, कार्यकर्ते यांच्यामुळे धास्तावले आहेत. ॲपलच्या जमान्यात नोकिया संकोचला आहे. आपल्याच घरात आपल्याला कोपऱ्यात बसावे लागते असे त्यांचे झाले आहे. आपला पक्ष सत्तेत आहे, पण आपण सत्तेत नाही ही भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. 

जाता जाता -  विधानसभेच्या कामकाजाचे वार्तांकन करणारा पत्रकार म्हणून अलीकडे एका विषयाची चिंता वाटते. विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसलेले विरोधी आमदार हे मंत्री, सत्तापक्षाचे काही आमदारच नव्हे, तर पिठासीन अधिकाऱ्यांबद्दलही आक्षेपार्ह शेरेबाजी करत असतात. त्यात आदित्य ठाकरेंसारखे आमदारही सामील होतात. अर्थात नितेश राणेंसारखे नेतेही कोणाची नक्कल कुठे कशी करायची याचे भान ठेवत नाहीत ही बाजूही आहेच. एखाद दिवशी या पायऱ्यांवरच हाणामारी होईल!  

yadu.joshi@lokmat.com

टॅग्स :Ravindra Chavanरविंद्र चव्हाणBJPभाजपाChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे