शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
3
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
4
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
5
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
6
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
7
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
8
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
9
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
10
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
11
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
12
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
13
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
14
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
15
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
16
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
17
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
18
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
19
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
20
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम

अन्वयार्थ - सिनेमातल्या तारे-तारकांचे जमिनीवर काय काम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 01:57 IST

सिनेलोकप्रियतेचा वापर करून राजकीय कारकीर्द घडवणारा कलाकार विरळा ! राजकारणात आलेल्या तारे-तारका फक्त क्षणकाळ चमकतात, हाच नेहमीचा अनुभव!

वसंत भोसले

निवडणुका जाहीर झाल्या की, अनेक हौसे गवसे राजकीय व्यासपीठावर मिरवायला पुढे येतात. यामध्ये चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांचा भरणा मोठा असतो. त्यापैकी बहुतांश जण कसलीही राजकीय पार्श्वभूमी, वैचारिक धारणा नसताना केवळ सिनेसृष्टीतील प्रसिद्धीचे वलय घेऊन गर्दीत सामील होतात. काही जण निवडणुकाही लढवितात तसेच सत्ताधारी राजकीय पक्षांचा वरदहस्त  घेऊन राज्यसभेवर जाण्याचा प्रयत्न करतात.  आपल्या लोकप्रियतेचा वापर करीत सार्वजनिक सभा, मेळावे , रॅलीमध्ये गर्दी खेचण्याचा प्रयत्न करतात. ती गर्दी केवळ तात्कालिक आणि भावनिक असते. राजकीय पक्षदेखील त्यांच्या लोकप्रियतेचा वापर करून घेतात. काही सिनेतारका किंवा अभिनेते चक्क त्याला पैसा कमावण्याचे साधन बनवून टाकतात. एका मतदारसंघात एका राजकीय पक्षाचा प्रचार करतात आणि दुसऱ्या मतदारसंघात दुसऱ्याच पक्षाचा!  - हे तर फारच हास्यास्पद!                                       

आता पाच राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. त्यापैकी पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ या  राज्यात स्थानिक भाषेचा, संस्कृतीचा मोठा बोलबाला. तेथील नाट्य आणि सिनेसृष्टी समृद्ध आहे. परिणामी या क्षेत्रातील कलावंतांची  राजकीय लुडबुड सुरू होणे तसे स्वाभाविकच! मूळ बंगाली असलेले आणि  हिंदी सिनेसृष्टीत नाव कमावलेले मिथुन चक्रवर्ती यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला.  राजकीय व्यासपीठावर जाणे त्यांच्यासाठी नवीन नाही. पश्चिम बंगालमध्ये ज्या पक्षाचे वारे वाहत राहिले तसे ते फिरत राहिले आहेत. त्यांनी नक्षलवादी चळवळीचेही समर्थन केले होते. दहा वर्षांपूर्वी ममता बॅनर्जी यांच्या  तृणमूल काँग्रेसची हवा असताना मिथुन यांनी त्या पक्षात प्रवेश केला. तृणमूलकडून राज्यसभेवरही गेले. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून एक वर्तुळ पूर्ण केले आहे. काही अपवाद वगळता सिने अभिनेत्यांच्या  राजकीय कामात सातत्य राहत नाही, असा अनुभव आहे. चित्रपट सृष्टीतील लोकप्रियतेवर मतदार मते देतात आणि नंतर हे तारे गायब झाले, की मतदारांवर पश्चात्ताप करून घेण्याची वेळ येते. रामायण मालिकेतील दीपिका चिखलिया बडोद्यातून निवडून आल्या आणि मुंबईत राहू लागल्या. धर्मेंद्र राजस्थानातील बिकानेरमधून निवडून आले आणि परत तिकडे फिरकल्याचेही ऐकिवात नाही. वायव्य मुंबई मतदारसंघातून गोविंदा याने ज्येष्ठ संसदपटू राम नाईक यांच्या विरूद्ध निवडणूक लढवून मोठे मताधिक्य घेतले  आणि काहीच काम केले नाही. मतदार एका चांगल्या संसदपटूला कायमचे मुकले. शहेनशहा अमिताभ बच्चन यांची कहाणीही तशीच आहे.  राजीव गांधी यांचे मित्र म्हणून काँग्रेसची उमेदवारी मिळाल्याने अलाहाबाद (आताचे प्रयागराज) मधून बच्चन निवडून आले. त्यांनी काय काम केले, ते लोकांनाही आठवत नाही. जयाप्रदा एकदा उत्तर प्रदेशातील रामपूरच्या खासदार होत्या. मूळच्या तेलंगणातील गोदावरी तीरावरील राजमुंद्रीच्या. मुंबईत हिंदी चित्रपटसृष्टीत आल्या आणि  एकदम रामपूरच्या खासदार झाल्या.  

चित्रपटसृष्टीतील लोकप्रियता वेगळी आणि राजकीय कारकीर्द वेगळी असते. हा फरक मतदारही करायला विसरतो. लोकप्रतिनिधी म्हणून काम करणे सोपे नसते, हे या कलावंतांच्याही लक्षात येत नाही. काही मोजके चित्रपट कलावंत अपवाद आहेत पण ते केवळ आपल्या लोकप्रियतेवर अवलंबून राहीले नाहीत. त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी निभावली, लोकांच्या आकांक्षांशी स्वतःला जोडून कसे घ्यावे याचे पाठ गिरवले आणि अंमलात आणले म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द घडली. एम.जी. रामचंद्रन, जयललिता, करूणानिधी, एन,टी. रामाराव आदींनी ठाम राजकीय भूमिका घेत पक्षाची स्थापना करण्यापासून राज्यांचे नेतृत्व करण्यापर्यंत सातत्य राखले. सुनील दत्त, हेमामालिनी, विनोद खन्ना, स्मृती इराणी आदी ज्येष्ठ कलावंतांनी आपल्या राजकीय भूमिकेत जाऊन प्रत्यक्ष काम केले. जावेद अख्तर, शबाना आझमी आदींच्या राजकीय भूमिका पक्क्या आहेत. 

-एरवी तिकडले तारे राजकारणात येतात आणि क्षणकाळ चमकून विझून जातात, हेच वास्तव आहे !अभिनेता त्या क्षणापुरता आपल्या भूमिकेत जाऊन बाहेर येतो; नेत्याची भूमिका ही रोज वठवावी लागते, अंगीभूत व्हावी लागते... शिवाय नवा चित्रपट साइन केला की नवी भूमिका हे तिकडे चालते. मिथुन चक्रवर्ती आता तेच ‘इकडे’ही करु पाहाताहेत...नवा चित्रपट नवी भूमिका तसे आता नवी लाट, नवा राजकीय पक्ष !

(लेखक लोकमत कोल्हापूर आवृत्तीचे संपादक आहेत)

टॅग्स :Mithun Chakrabortyमिथुन चक्रवर्तीBJPभाजपा