शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

अन्वयार्थ - सिनेमातल्या तारे-तारकांचे जमिनीवर काय काम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 01:57 IST

सिनेलोकप्रियतेचा वापर करून राजकीय कारकीर्द घडवणारा कलाकार विरळा ! राजकारणात आलेल्या तारे-तारका फक्त क्षणकाळ चमकतात, हाच नेहमीचा अनुभव!

वसंत भोसले

निवडणुका जाहीर झाल्या की, अनेक हौसे गवसे राजकीय व्यासपीठावर मिरवायला पुढे येतात. यामध्ये चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांचा भरणा मोठा असतो. त्यापैकी बहुतांश जण कसलीही राजकीय पार्श्वभूमी, वैचारिक धारणा नसताना केवळ सिनेसृष्टीतील प्रसिद्धीचे वलय घेऊन गर्दीत सामील होतात. काही जण निवडणुकाही लढवितात तसेच सत्ताधारी राजकीय पक्षांचा वरदहस्त  घेऊन राज्यसभेवर जाण्याचा प्रयत्न करतात.  आपल्या लोकप्रियतेचा वापर करीत सार्वजनिक सभा, मेळावे , रॅलीमध्ये गर्दी खेचण्याचा प्रयत्न करतात. ती गर्दी केवळ तात्कालिक आणि भावनिक असते. राजकीय पक्षदेखील त्यांच्या लोकप्रियतेचा वापर करून घेतात. काही सिनेतारका किंवा अभिनेते चक्क त्याला पैसा कमावण्याचे साधन बनवून टाकतात. एका मतदारसंघात एका राजकीय पक्षाचा प्रचार करतात आणि दुसऱ्या मतदारसंघात दुसऱ्याच पक्षाचा!  - हे तर फारच हास्यास्पद!                                       

आता पाच राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. त्यापैकी पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ या  राज्यात स्थानिक भाषेचा, संस्कृतीचा मोठा बोलबाला. तेथील नाट्य आणि सिनेसृष्टी समृद्ध आहे. परिणामी या क्षेत्रातील कलावंतांची  राजकीय लुडबुड सुरू होणे तसे स्वाभाविकच! मूळ बंगाली असलेले आणि  हिंदी सिनेसृष्टीत नाव कमावलेले मिथुन चक्रवर्ती यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला.  राजकीय व्यासपीठावर जाणे त्यांच्यासाठी नवीन नाही. पश्चिम बंगालमध्ये ज्या पक्षाचे वारे वाहत राहिले तसे ते फिरत राहिले आहेत. त्यांनी नक्षलवादी चळवळीचेही समर्थन केले होते. दहा वर्षांपूर्वी ममता बॅनर्जी यांच्या  तृणमूल काँग्रेसची हवा असताना मिथुन यांनी त्या पक्षात प्रवेश केला. तृणमूलकडून राज्यसभेवरही गेले. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून एक वर्तुळ पूर्ण केले आहे. काही अपवाद वगळता सिने अभिनेत्यांच्या  राजकीय कामात सातत्य राहत नाही, असा अनुभव आहे. चित्रपट सृष्टीतील लोकप्रियतेवर मतदार मते देतात आणि नंतर हे तारे गायब झाले, की मतदारांवर पश्चात्ताप करून घेण्याची वेळ येते. रामायण मालिकेतील दीपिका चिखलिया बडोद्यातून निवडून आल्या आणि मुंबईत राहू लागल्या. धर्मेंद्र राजस्थानातील बिकानेरमधून निवडून आले आणि परत तिकडे फिरकल्याचेही ऐकिवात नाही. वायव्य मुंबई मतदारसंघातून गोविंदा याने ज्येष्ठ संसदपटू राम नाईक यांच्या विरूद्ध निवडणूक लढवून मोठे मताधिक्य घेतले  आणि काहीच काम केले नाही. मतदार एका चांगल्या संसदपटूला कायमचे मुकले. शहेनशहा अमिताभ बच्चन यांची कहाणीही तशीच आहे.  राजीव गांधी यांचे मित्र म्हणून काँग्रेसची उमेदवारी मिळाल्याने अलाहाबाद (आताचे प्रयागराज) मधून बच्चन निवडून आले. त्यांनी काय काम केले, ते लोकांनाही आठवत नाही. जयाप्रदा एकदा उत्तर प्रदेशातील रामपूरच्या खासदार होत्या. मूळच्या तेलंगणातील गोदावरी तीरावरील राजमुंद्रीच्या. मुंबईत हिंदी चित्रपटसृष्टीत आल्या आणि  एकदम रामपूरच्या खासदार झाल्या.  

चित्रपटसृष्टीतील लोकप्रियता वेगळी आणि राजकीय कारकीर्द वेगळी असते. हा फरक मतदारही करायला विसरतो. लोकप्रतिनिधी म्हणून काम करणे सोपे नसते, हे या कलावंतांच्याही लक्षात येत नाही. काही मोजके चित्रपट कलावंत अपवाद आहेत पण ते केवळ आपल्या लोकप्रियतेवर अवलंबून राहीले नाहीत. त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी निभावली, लोकांच्या आकांक्षांशी स्वतःला जोडून कसे घ्यावे याचे पाठ गिरवले आणि अंमलात आणले म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द घडली. एम.जी. रामचंद्रन, जयललिता, करूणानिधी, एन,टी. रामाराव आदींनी ठाम राजकीय भूमिका घेत पक्षाची स्थापना करण्यापासून राज्यांचे नेतृत्व करण्यापर्यंत सातत्य राखले. सुनील दत्त, हेमामालिनी, विनोद खन्ना, स्मृती इराणी आदी ज्येष्ठ कलावंतांनी आपल्या राजकीय भूमिकेत जाऊन प्रत्यक्ष काम केले. जावेद अख्तर, शबाना आझमी आदींच्या राजकीय भूमिका पक्क्या आहेत. 

-एरवी तिकडले तारे राजकारणात येतात आणि क्षणकाळ चमकून विझून जातात, हेच वास्तव आहे !अभिनेता त्या क्षणापुरता आपल्या भूमिकेत जाऊन बाहेर येतो; नेत्याची भूमिका ही रोज वठवावी लागते, अंगीभूत व्हावी लागते... शिवाय नवा चित्रपट साइन केला की नवी भूमिका हे तिकडे चालते. मिथुन चक्रवर्ती आता तेच ‘इकडे’ही करु पाहाताहेत...नवा चित्रपट नवी भूमिका तसे आता नवी लाट, नवा राजकीय पक्ष !

(लेखक लोकमत कोल्हापूर आवृत्तीचे संपादक आहेत)

टॅग्स :Mithun Chakrabortyमिथुन चक्रवर्तीBJPभाजपा