शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

अर्धविराम लावून आपणही थोडे थांबायला काय हरकत आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 07:19 IST

सध्याच्या अस्वस्थ कोरोना काळात आधीच दुबळ्या झालेल्या मन:शांतीचा क्रमांक एकचा शत्रू समाजमाध्यमे आहेत.

कोरोनाने जगाचे वेगवान रहाटगाडगे सक्तीने थोपवून धरलेले असताना नाइलाजाने का असेना, आपल्याला थोडी उसंत मिळालीआहे. डोक्यातल्या कोलाहलापुढे निदान अर्धविराम लावून आपणही थोडे थांबायला काय हरकत आहे? विखारापासून सुटका झाली, तरच हे घडू शकेल. आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने योगाभ्यास आणि मन:शांती याविषयावरील दोन महत्त्वाच्या समकालीन भाष्यकारांनी ‘लोकमत’च्या वेबिनारमध्ये आपल्या मनातली अस्वस्थता मोकळेपणाने मांडली. त्याची दखल येथे घेणे क्रम:प्राप्त आहे. त्यातले एक ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ या जागतिक ख्यातीप्राप्त संघटनेचे संस्थापक श्री श्री रविशंकर आणि दुसरे योगगुरू बाबा रामदेव! सध्याच्या अस्वस्थ कोरोना काळात आधीच दुबळ्या झालेल्या मन:शांतीचा क्रमांक एकचा शत्रू समाजमाध्यमे आहेत.आयुर्वेद आणि योगविद्या या प्राचीन भारतीय ज्ञानाच्या संचिताकडे दुर्लक्ष करून पश्चिमेच्या भजनी लागलेली आपली परावलंबी आरोग्य व्यवस्था आणि केवळ घोकंपट्टीचा रोग जडलेले आपले किरटे शिक्षण अशा दुर्धर दुखण्यांवर या दोघांनी नेमके बोट ठेवले आहे. श्री श्री रविशंकर आणि बाबा रामदेव हे दोघे तसे भिन्न स्वभावधर्माचे; पण कोरोना नावाच्या विषाणूशी चालू असलेली लढाई निभावताना आपण सर्वांनीच जो असह्य कलकलाट आरंभलेला आहे, तो थांबवा, असे या दोघांचेही अगदी कळकळीचे सांगणे होते. या कलकलाटाला, त्यातून हळूहळू येत चाललेल्या त्रासिक उद्विग्नतेला आणि आधीच घरकोंडीने घुसमटलेल्या सामान्यांच्या अस्वस्थ मनांना कारणीभूत आहेत ती अतिरेकी माध्यमे... आणि त्याहीपेक्षा समाजमाध्यमे!

दोन-चार महिने आमदनी थांबली म्हणून काही न बिघडणाऱ्या सुदैवीवर्गाने आधी समाजमाध्यमांवर ‘लॉकडाऊन लाईफस्टाईल’ची दुकाने मांडली. मग ‘डालगोना कॉफी’ आणि ‘बनाना ब्रेड’ न परवडणाऱ्यांनी या अभिजनांची धुलाई केली. छुपा मत्सर आणि त्यापोटी विखार हा तर समाजमाध्यमांचा स्वभावच. या विखाराचा हैदोस सध्या लोकांच्या डोक्यात घुसला आहे. सतत सल्ले तरी, नाही तर भीतीदायक अफवा तरी किंवा मग आत्महत्येपर्यंत नेवू पाहणाºया अस्वस्थतेचे आत्मरंजन तरी! त्यात दर मिनिटागणिक कानीकपाळी आदळणारे कोरोना विषाणूबाधितांचे, मृत्यूंचे वाढते आकडे! बरे, या नकोशा माहितीपासून स्वत:ला दूर ठेवण्याचे दोर सगळ्यांनी कधीच कापलेले... त्यामुळे हातातल्या त्या चौकोनी स्मार्ट डब्यातून नको ते सारे सतत डोळ्यांवर, मनांवर आदळत असतेच! हा अतिरेकी हैदोस आता तरी थांबवा, असा कळकळीचा सल्ला एरव्ही मितभाषी असलेल्या रतन टाटा यांच्यासारख्या आदरणीय व्यक्तित्त्वाला थेट इन्स्टाग्रामवर जाऊनच द्यावासा वाटला, यातच काय ते आले. टाटा म्हणतात, ‘हे वर्ष सगळ्यांसाठीच फार कठीण आहे. ही वेळ एकमेकांवर हल्ले चढवून विखारी निर्भत्सनेची नाही, आता आपण एकमेकांना सावरले पाहिजे. परस्परांविषयी आपल्या मनात सहानुभाव असला पाहिजे!’ एकमेकांच्या दु:खांची-अडीअडचणींची जाणीव असणे, अवघड वेळी न बोलता परस्परांना सांभाळून नेणे आणि आधीच भळभळत्या जखमेवर उगा बोट न दाबणे, ही माणूसपणाची अगदी प्राथमिक कर्तव्ये! पण त्याचाही अनेकांना विसर पडलेला आहे.
सर्दी-खोकल्याने बेजार केले तर हळद घालून गरम दूध पिण्याचे आपण केव्हा विसरलो आणि औषधाच्या दुकानांकडे कसे धावू लागलो; हा तर प्रश्नही हल्ली कुणाला पडत नाही. खरे तर ही दुखणी काही कोरोनाने आणलेली नाहीत. आपला समाज त्याने जर्जर आहेच. फक्त कोरोनाने वरवरचे बुरखे ओरबाडून काढल्यावर आता आत सडलेले समाजमन अधिकच उघडे पडत चालले आहे, एवढेच! हे सडणे इतके जीवघेणे आहे की, त्याने रतन टाटा यांच्यासारख्यालासुद्धा अस्वस्थ केले आहे. वरवरची एक खपली उकलली की, आत सारा असह्य कल्लोळच! कोरोना विषाणूने जगाचे रहाटगाडगे थोपवून धरलेले असताना सक्तीने का असेना, प्रत्येकाच्याच हाताशी काही रिकामा वेळ आला आहे. डोक्यातल्या कोलाहलापुढे पूर्ण नाही, निदान अर्धविराम लावून आपणही थोडे थांबायला काय हरकत आहे? श्री श्री रविशंकर, बाबा रामदेव आणि रतन टाटा हे तीन वेगवेगळ्या स्वभावधर्माचे लोक तेच तर सुचवत आहेत.

टॅग्स :YogaयोगInternational Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिन