शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

बाटली तीच, पेयही तेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 06:19 IST

युवक काँग्रेसच्या महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकवार त्या पक्षात रुजलेली घराणेशाही विजयी झाली आहे.

युवक काँग्रेसच्या महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकवार त्या पक्षात रुजलेली घराणेशाही विजयी झाली आहे. संघटनेच्या अध्यक्षपदी निवडून आलेले सत्यजीत तांबे हे महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. याअगोदरच्या निवडणुकीतही या भाच्याने त्याच्या मामाच्या भरवशावर ही जागा जिंकली होती. अमित झनक हे उपाध्यक्षपदावर निवडून आलेले युवक माजी महिला व बालकल्याण मंत्री सुभाष झनक यांचे चिरंजीव आहेत. तर दुसरे उपाध्यक्ष कुणाल राऊत हे माजी मंत्री व काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष नितीन राऊत यांचे सुपुत्र आहेत. बापाची जागा मुलाने घेऊन किंवा मामाची जागा त्याच्या भाच्याने बळकावणे यात परंपराविरोधी असे काही नाही. आपली ती अनेक शतकांची परंपरा आहे. अडचण एवढीच की या परंपरेत लोकशाहीच नव्याने घुसली आहे. १५ आॅगस्ट १९४७ या दिवशी हा देश स्वतंत्र झाला आणि १९५२ मध्ये त्याने आपल्या घटनेनुसार संसदीय लोकशाहीचा स्वीकार करून निवडणुका घेतल्या. तशी त्या निवडणुकांची सुरुवात १९१९ व १९३७ पासूनच झाली. मात्र १९५२ मध्ये खऱ्या लोकशाहीला सुरुवात झाली. ही लोकशाही राजकीय पक्षातही यावी यासाठी या देशाचे राजकारण व त्याचे नेतृत्व गेली पाऊणशे वर्षे नुसताच आकांत करीत आहे. परंतु सत्तेची घमेंड आणि तिच्यावरची परंपरागत मालकी सोडायला जुनी माणसे तयार नाहीत आणि त्यांच्या घरातल्या नव्यांना हे सारे फुकटात मिळत असेल तर ते हवेच आहे. त्यातून बाप पक्षात पदाधिकारी असला की त्याचे चेले-चपाटे, स्नेही, दलाल, उपकृत व त्याच्या दारात पाणी भरणारी चापलूसखोर माणसे यांचा पाठिंबा अशा नव्यांना तत्काळ मिळतो. त्यातही बाप सत्ताधारी असेल तर त्याचे सत्तास्थान त्यातील अधिकारी व यंत्रणांसह राबवूनही घेता येते. पूर्वी अशाच एका निवडणुकीत राज्याच्या वनमंत्र्याचे पोर अध्यक्षपदासाठी उभे होते आणि त्याच्यासाठी सारे वनखाते, त्यातील अधिकारी, कर्मचारी व डाकबंगले असे सारे कामाला लागलेले दिसत होते. अशा निवडणुका पद देतात, इभ्रत देत नाहीत. आताची स्थिती आणखी वेगळी आहे. सध्या बापांच्याच जागांचा, तिकिटांचा व निवडून येण्याचा भरवसा नाही. त्यांनाही ते चांगले ठाऊक आहे. जे राजीव गांधी वा राहुल गांधींच्या वाट्याला येते ते या साºयांच्या वाट्याला येत नाही. त्यांच्यामागे शतकांचा इतिहास व अभूतपूर्व त्याग उभा आहे. त्या इतिहासाने व त्यागाने त्यांना देशाचे प्रतीक बनविले आहे. आताच्या महाराष्ट्रातील पुढाºयांच्या पोरांनाही आपण तसेच बनलो आहोत असे वाटत असेल तर विदर्भाच्या भाषेत सांगायचे झाले तर तो त्यांचा ‘बह्याडपणा’ आहे. तो त्यांना दूर करता येत नसेल तर त्यांच्या बापांनी तो दूर करावा आणि बापही त्यातलेच असतील तर पक्षाच्या अन्य नेत्यांनी ते काम करावे. गांधीजी म्हणायचे, काँग्रेस ही लोकचळवळ आहे. तीत लोक येत राहतील. नित्य नव्यांचा भरणाही होत राहील. आताचे संघटनशूर मात्र पक्षाला कुंपणे लावून बसले आहेत आणि जमेल तेव्हा ती कुंपणे आतून मजबूत करीत आहेत. बाहेरचे कुणी आत येणार नाहीत आणि आम्हाला कुणी बाहेर जायला लावणार नाहीत अशा चिंतेत असलेली ही लाडावलेली बाळे पक्ष वाढू देत नाहीत आणि त्यात नव्यांना येऊ देत नाहीत. अशी बंद मनाची आणि मंद बुद्धीची पोरे हाताशी धरून राहुल गांधी त्यांचा पक्ष विजयाच्या दिशेने कसा नेतील? राहुल गांधींना पक्षात नवीन संजीवनी आणायची असेल तर आताची महाराष्ट्र युवक काँग्रेसची नव्याने निवडून आलेली जुन्यांचीच कार्यकारिणी त्यांनी तत्काळ बरखास्त केली पाहिजे. कोणत्याही सत्ताधारी राहिलेल्या बापाच्या पोराला अशी निवडणूक लढवायला त्यांनी बंदी घातली पाहिजे. कितीही काळ बदलला तरी संघटनेचा चेहरा तसाच राहणार आहे. काँग्रेसचे खरे नूतनीकरण करायचे तर त्यासाठी अतिशय खंबीर उपायच आता करणे गरजेचे आहे. राहुल गांधींकडून ती अपेक्षा आहे. तसे झाल्यास पक्षात नवे तरुण येतील आणि ते पक्षाला विजयापर्यंत पोहोचवू शकतील.

टॅग्स :congressकाँग्रेसSatyajit Tambeसत्यजित तांबेAmit Jhankअमित झनकPoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधी