शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

आततायी पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 04:20 IST

मुळापर्यंत जाऊन किंवा विवेकाने एखादा प्रश्न सोडवण्यापेक्षा त्यातला सोप्यात सोपा पर्याय निवडून त्यातून नामानिराळे होण्याची जी वृत्ती बळावते आहे

मुळापर्यंत जाऊन किंवा विवेकाने एखादा प्रश्न सोडवण्यापेक्षा त्यातला सोप्यात सोपा पर्याय निवडून त्यातून नामानिराळे होण्याची जी वृत्ती बळावते आहे, त्याचे ताजे उदाहरण म्हणजे पावसाळी पर्यटनासाठी धबधबे-धरणांवर जाण्यास घातलेली बंदी. ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील अशा ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी वाढते. बऱ्यापैकी पाऊस झाला आणि डोंगरदºयांतून, कडेकपाºयांतून जलप्रपात ओसंडू लागले, की तरुणांचे, ट्रेकर्सचे जत्थेच्या जत्थे अशी ठिकाणे शोधत तेथे धडकतात. मनमुराद भिजण्याचा आनंद लुटतात. यातील काही ठिकाणे धोकादायक बनल्याने म्हणजे तेथे पाण्यासोबत दगड-धोंडेही पडू लागल्याने, पाण्याच्या प्रवाहाने कातळ धारदार बनल्याने-पाणी साचणाºया डोहांची खोली वाढल्याने जखमी-प्रसंगी मृत्युमुखी पडणाºया पर्यटकांची संख्या वाढू लागली आणि यातील काही ठिकाणांवर बंदी आली. त्यातही हे धबधबे पूर्ण बंद करण्यात आले नाहीत, तर तेथील काही भाग पर्यटकांसाठी धोकादायक जाहीर करण्यात आला. अर्थात अशी बंदी मोडून तेथे जाणाºयांचे, प्रसंगी दारू पिऊन बुडणाºयांचे प्रमाण वाढू लागल्याने आधी रायगडमध्ये आणि त्यापाठोपाठ ठाणे-पालघरमध्ये अशा ठिकाणांवर जाण्यास पूर्णत: बंदी घालण्यात आली. पण हा साप समजून भुई थोपटण्याचा प्रकार असल्याची टीका लगेचच सुरू झाली, ती रास्तही आहे. यातील बहुतांश ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ज्या ग्रामपंचायतींच्या परिसरात ही ठिकाणे येतात, त्यातील काहींनी तेथे येणाºया पर्यटकांकडून कररूपाने रकमा गोळा करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांच्यावर सुरक्षेचे उपाय योजण्याची जबाबदारी टाकणे सहज शक्य होते. जे नियम किंवा बंदी मोडतील, दारू पिऊन धिंगाणा घालतील त्यांची तपासणी करणे, त्यांना रोखण्याचेही मार्ग यंत्रणांच्या हाती आहेत. ते न योजता थेट बंदी घालून जबाबदारीतून हात वर करणे कितपत योग्य आहे? मूठभरांच्या धिंगाण्यासाठी जर साºया पर्यटकांना वेठीला धरायचे असेल, तर त्याच न्यायाने नदी-समुद्रात बुडून मृत्यू होतात म्हणून किंवा डोंगरदºयांत पडून मृत्यू होतात म्हणून गडकिल्ल्यांवर जायलाही पुढे अशीच बंदी घालणार का? एखादा घाटरस्ता दरडप्रवण आहे म्हणून या काळात तेथील वाहतूकही बंद करून टाकणार का, याचे उत्तर या यंत्रणांना द्यावे लागेल. सरसकट बंदी हा मार्ग नव्हे. त्याऐवजी या ठिकाणांतील धोकादायक भाग बंद करणे, कुंपण घालणे, नियम मोडणाºयांवर त्याच ठिकाणी कारवाई करणे, रोडरोमियोंना वेसण घालणे हे उपाय योजले तरी पुरेसे आहेत. जनजागृतीचा मार्गही हाती आहे. पण त्याअगोदर ती जागृती यंत्रणांत निर्माण व्हायला हवी; तरच असे आततायी निर्णय घेतले जाणार नाहीत.