शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

आततायी पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 04:20 IST

मुळापर्यंत जाऊन किंवा विवेकाने एखादा प्रश्न सोडवण्यापेक्षा त्यातला सोप्यात सोपा पर्याय निवडून त्यातून नामानिराळे होण्याची जी वृत्ती बळावते आहे

मुळापर्यंत जाऊन किंवा विवेकाने एखादा प्रश्न सोडवण्यापेक्षा त्यातला सोप्यात सोपा पर्याय निवडून त्यातून नामानिराळे होण्याची जी वृत्ती बळावते आहे, त्याचे ताजे उदाहरण म्हणजे पावसाळी पर्यटनासाठी धबधबे-धरणांवर जाण्यास घातलेली बंदी. ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील अशा ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी वाढते. बऱ्यापैकी पाऊस झाला आणि डोंगरदºयांतून, कडेकपाºयांतून जलप्रपात ओसंडू लागले, की तरुणांचे, ट्रेकर्सचे जत्थेच्या जत्थे अशी ठिकाणे शोधत तेथे धडकतात. मनमुराद भिजण्याचा आनंद लुटतात. यातील काही ठिकाणे धोकादायक बनल्याने म्हणजे तेथे पाण्यासोबत दगड-धोंडेही पडू लागल्याने, पाण्याच्या प्रवाहाने कातळ धारदार बनल्याने-पाणी साचणाºया डोहांची खोली वाढल्याने जखमी-प्रसंगी मृत्युमुखी पडणाºया पर्यटकांची संख्या वाढू लागली आणि यातील काही ठिकाणांवर बंदी आली. त्यातही हे धबधबे पूर्ण बंद करण्यात आले नाहीत, तर तेथील काही भाग पर्यटकांसाठी धोकादायक जाहीर करण्यात आला. अर्थात अशी बंदी मोडून तेथे जाणाºयांचे, प्रसंगी दारू पिऊन बुडणाºयांचे प्रमाण वाढू लागल्याने आधी रायगडमध्ये आणि त्यापाठोपाठ ठाणे-पालघरमध्ये अशा ठिकाणांवर जाण्यास पूर्णत: बंदी घालण्यात आली. पण हा साप समजून भुई थोपटण्याचा प्रकार असल्याची टीका लगेचच सुरू झाली, ती रास्तही आहे. यातील बहुतांश ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ज्या ग्रामपंचायतींच्या परिसरात ही ठिकाणे येतात, त्यातील काहींनी तेथे येणाºया पर्यटकांकडून कररूपाने रकमा गोळा करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांच्यावर सुरक्षेचे उपाय योजण्याची जबाबदारी टाकणे सहज शक्य होते. जे नियम किंवा बंदी मोडतील, दारू पिऊन धिंगाणा घालतील त्यांची तपासणी करणे, त्यांना रोखण्याचेही मार्ग यंत्रणांच्या हाती आहेत. ते न योजता थेट बंदी घालून जबाबदारीतून हात वर करणे कितपत योग्य आहे? मूठभरांच्या धिंगाण्यासाठी जर साºया पर्यटकांना वेठीला धरायचे असेल, तर त्याच न्यायाने नदी-समुद्रात बुडून मृत्यू होतात म्हणून किंवा डोंगरदºयांत पडून मृत्यू होतात म्हणून गडकिल्ल्यांवर जायलाही पुढे अशीच बंदी घालणार का? एखादा घाटरस्ता दरडप्रवण आहे म्हणून या काळात तेथील वाहतूकही बंद करून टाकणार का, याचे उत्तर या यंत्रणांना द्यावे लागेल. सरसकट बंदी हा मार्ग नव्हे. त्याऐवजी या ठिकाणांतील धोकादायक भाग बंद करणे, कुंपण घालणे, नियम मोडणाºयांवर त्याच ठिकाणी कारवाई करणे, रोडरोमियोंना वेसण घालणे हे उपाय योजले तरी पुरेसे आहेत. जनजागृतीचा मार्गही हाती आहे. पण त्याअगोदर ती जागृती यंत्रणांत निर्माण व्हायला हवी; तरच असे आततायी निर्णय घेतले जाणार नाहीत.