शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

महागाईचा भस्मासुर आणि बचतीवरील व्याज मुंगीएवढे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 11:11 IST

विविध प्रकारच्या अल्पबचत योजना सुरू करण्यामागील मूळ उद्देश लक्षात घेऊन सरकारने आर्थिक निकषांच्या आधारावरच व्याजदर निश्चित करणे आवश्यक आहे.

- ॲड. कांतीलाल तातेड(अर्थशास्त्राचे अभ्यासक)

केंद्र सरकारने १ जानेवारी २०२३ पासून चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी अल्पबचतीच्या आठ योजनांच्या व्याजदरात ०.२० ते १.१० टक्के इतकी वाढ केली आहे; परंतु पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, आदी उर्वरित चार योजनांच्या व्याजदरात मात्र कोणतीही वाढ केलेली नाही. वास्तविक प्रत्येक तिमाहीत समान मुदतीच्या सरकारी रोख्यांच्या व्याजदरांशी समानता साधून व त्यात कमाल एक टक्का मिळवून त्या सूत्राच्या आधारे सरकार अल्पबचत योजनांचे व्याजदर निश्चित करीत असते. आठ योजनांना हे सूत्र लावले; मग उरलेल्या चारांना का नाही?

३० डिसेंबर २०२२ रोजी १० वर्षे मुदतीच्या सरकारी रोख्यांवर ७.३३४ टक्के; तर ५ वर्षे मुदतीच्या सरकारी रोख्यांवर ७.२३८ टक्के परतावा मिळत होता. सूत्रानुसार ‘पीपीएफ’चे व्याजदर किमान ८.३५,  तर ‘एनएससी’वरील व्याजदर ८.२५ टक्के असणे आवश्यक आहे; परंतु सरकारने गेल्या चार वर्षांत बहुतांश अल्पबचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली नाही. आता जी केली ती अत्यल्प आहे. व्याजदर निश्चितीसाठी महागाईचा दर हा महत्त्वाचा घटक असतो. गेल्या वर्षी सुरुवातीच्या सलग दहा महिन्यांत किरकोळ महागाईदर सतत सहा टक्क्यांपेक्षा जास्त होता. एप्रिल, मे, जून व ऑगस्ट २०२२ मध्ये तर तो सात टक्क्यांपेक्षा जास्त होता. सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत केवळ पाच योजनांच्या व्याजदरात  ०.१० ते ०.३० टक्के इतकी अल्प वाढ केली. अल्पबचत योजनांच्या व्याजदरात शेवटची वाढ जानेवारी २०१९ मध्ये केली होती. अल्पबचतीच्या बहुतांश योजनांमधील गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर गुंतवणूकदारांना प्राप्तिकर भरावा लागतो. त्यामुळे वास्तव व्याजदर फार कमी मिळतो; त्यामुळे वाढत्या महागाईचा विचार करता उत्पन्न तर सोडाच; गुंतवणूकदारांच्या मुद्दलातच मोठ्या प्रमाणात घट होत आहे.

उद्योगपतींना स्वस्त दराने कर्ज देता येणे बँकांना शक्य व्हावे म्हणून बँकांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरांशी समानता साधण्याकरिता अल्पबचत योजनांचे व्याजदर सरकार कोणत्याही आर्थिक निकषांचा विचार न करता कृत्रिमरीत्या कमी करीत असते. वास्तविक रिझर्व्ह बँकेने रेपो दरात गेल्या आठ महिन्यांत २.२५ टक्क्यांची वाढ केलेली आहे. अल्पबचत योजनांच्या व्याजदरात त्याप्रमाणे वाढ केलेली नाही. ज्या योजनांवरील व्याजाच्या उत्पन्नावर प्राप्तिकर आकाराला जात नाही, त्या योजनांमधील गुंतवणुकीच्या व्याजदरात अजिबात वाढ करण्यात येत नाही (उदा. पीपीएफ).

मुळात प्राप्तिकरात देण्यात येणारी सवलत व व्याजदर निश्चित करण्याचे निकष या दोन स्वतंत्र बाबी आहेत. प्राप्तिकराची आकारणी ही मिळणाऱ्या उत्पन्नावर केली जाते. त्याचा वापर गुंतवणूकदारांचे उत्पन्नच कमी करण्यासाठी करणे अयोग्य असून प्राप्तिकर न भरणाऱ्या कोट्यवधी गुंतवणूकधारकांवरदेखील हा अन्याय आहे.  गरिबातील गरिबाला केंद्रस्थानी ठेवून  त्यांच्या कुटुंबीयांच्या भविष्याची तरतूद म्हणून ‘सामाजिक सुरक्षा’ प्रदान करण्याच्या हेतूने सरकारने पोस्टाच्या विविध योजना सुरू केल्या होत्या.  वाढत्या महागाईचा विचार करून सरकार त्याप्रमाणे व्याजदरात सातत्याने वाढ करीत असे. उदा. १९८७ ते १४ जानेवारी, २००० पर्यंत सरकार ‘पीपीएफ’ वर तसेच अन्य योजनांवर सातत्याने १२ टक्के दराने व्याज देत होते.

एप्रिल १९८७ मध्ये अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक ६९१ होता; तर ऑक्टोबर २०२२ मध्ये तो ८७१०.३६ आहे. म्हणजेच या कालावधीत महागाईत १२.६१ पट वाढ झालेली आहे; परंतु अल्पबचत योजनांच्या व्याजदरात मात्र मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आलेली आहे. उदा. ‘पीपीएफ’ व ‘एनएससी’चे व्याजदर १२ टक्क्यांवरून अनुक्रमे ७.१० व ७ टक्के करण्यात आलेले आहेत. ‘आज की बचत कल का उजाला’ असे सांगितले जाते; परंतु ‘उजाला’चे रूपांतर ‘अंधेरा’मध्ये होत आहे. सरकारने अल्पबचत योजना सुरू करण्यामागील मूळ उद्देश लक्षात घेऊन व्याजदर निश्चित करणे आवश्यक आहे.

kantilaltated@gmail.com

टॅग्स :Inflationमहागाई