शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

चीनशी मुकाबला करण्यासाठी रशिया व अमेरिका यांची मैत्री व विश्वास वाढविणे आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 05:34 IST

आताची युद्धे युद्धभूमीवर लढविली जात नाहीत. ज्या देशांनी अण्वस्त्रे विकसित केली ते देश आता त्यांचे पारंपरिक सैन्य व शस्त्रे कमी करण्याच्या मार्गालाही लागली आहेत.

आताची युद्धे युद्धभूमीवर लढविली जात नाहीत. ज्या देशांनी अण्वस्त्रे विकसित केली ते देश आता त्यांचे पारंपरिक सैन्य व शस्त्रे कमी करण्याच्या मार्गालाही लागली आहेत. चीन व रशिया यांनी त्याचा आरंभही केला आहे. ‘पारंपरिक शस्त्रांनिशी लढताना आम्हाला एखादेवेळी मात खावी लागेल, परंतु कोणतेही राष्ट्र युद्धातील पराभव सहजासहजी सहन करीत नाही. पाकिस्तानही तो तसा करणार नाही,’ असे सांगून त्याचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले, ‘आमच्या शस्त्रागारात शक्तिशाली अण्वस्त्रे आहेत आणि ती वाहून नेणारी बलशाली क्षेपणास्त्रेही आहेत. वेळ आली तर आम्ही त्याचा उपयोग करणारच नाही असे नाही. मात्र, तसे झाल्यास आशियाच्या या दक्षिण क्षेत्रात अणुयुद्धाचा भडका उडेल व तो साऱ्यांसाठीच हानिकारक ठरेल,’ अशी धमकीवजा पुस्तीही त्यांनी आपल्या वक्तव्यात जोडली. भारताशी आजवर झालेली पारंपरिक शस्त्रांची सगळी युद्धे पाकिस्तानने गमावली आहेत. १९६५ चे शास्त्रीजींच्या नेतृत्वातील युद्ध वा इंदिरा गांधींच्या नेतृत्वात झालेले बांगलादेशचे युद्ध तो देश हरला आहे. मात्र, भारतात वाजपेयी सरकारने देशात पाच अणुबॉम्बचा स्फोट पोखरणच्या क्षेत्रात केला. त्याला उत्तर म्हणून पाकिस्तानच्या नवाज शरीफांनी लागलीच सहा अणुबॉम्बचे स्फोट त्यांच्या क्षेत्रात घडविले. भारताने अग्नी-१, २ अशी क्षेपणास्त्रांची मालिका यशस्वी केली तर पाकिस्तानेही शाहीन १, २ ची क्षेपणास्त्रांची मालिका तयार केली. आताचा इम्रान खान यांचा स्फोट काश्मीरचा आहे.

भारत सरकारने आपल्या घटनेतील ३७ वे कलम ३५-अ सह रद्द करून काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशात रूपांतर केले आहे. परिणामी, याची स्वायत्तता जाऊन त्यावर केंद्राची सत्ता आली आहे. इम्रान खान यांच्या मते हा भारताने पाकिस्तानचा व सगळ्या मुस्लीम देशांचा केलेला अधिक्षेप आहे. वास्तविक जे झाले तो भारताचा अंतर्गत प्रश्न असून त्याच्याशी आम्हाला काही घेणे-देणे नाही असे जगातील अनेक देशांनी जाहीर केले आहे. संयुक्त राष्ट्र संघानेही हा प्रश्न भारत व पाकिस्तान यांनी चर्चा करून सोडवावा असे म्हटले आहे. अपवाद आहे तो फक्त अमेरिकेच्या ट्रम्प यांचा. त्यांना अधूनमधून काश्मीर प्रश्नाबाबत मध्यस्थी करण्याची उबळ येते. पण, काही काळातच ती थांबते. चीनची भूमिका मात्र अजून संशयास्पद आहे. तो देश लेह-लडाखच्या प्रदेशावर हक्क सांगणारा आहे. शिवाय अक्साई चीनवरही आपलाच अधिकार असल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्या प्रदेशातून त्याने ७५० मैल लांबीची एक सडकही जगाला थांगपत्ता न लागू देता बांधून काढली आहे. शिवाय चीनचे शस्त्रबळ भारताहून दहा पटींनी मोठे आहे. पाकिस्तान आणि चीन यांचे संबंध मैत्रीचे आहेत. त्यामुळे इम्रान खान यांच्या वक्तव्यामागे चीनचे पाठबळ नसेलच, असे म्हणता येणार नाही. भारताने नवी क्षेपणास्त्रे बांधली आहेत. अण्वस्त्रांचीही निर्मिती केली आहे. त्यामुळे इम्रान खान यांनी दिलेल्या धमकीचे सूतोवाच सहजगत्या डावलता येणार नाही. त्यासाठी आपल्याही बाजूने आपण सावध व सतर्क राहणे गरजेचे आहे. त्याचवेळी चीनच्या हालचालींवरही आपली करडी नजर राहणे आवश्यक आहे. नीता या भारतातील बाराहोती या उत्तर प्रदेशातील गावानजीक असलेल्या खिंडीवर चीनने त्याचा हक्क सांगितला असून तिला त्याने तंजुमला हे नाव दिले आहे. शिवाय बाराहोतीचे नावही बदलून त्याने त्याचा उल्लेख वू झू असा केला आहे.
इम्रानची धमकी आणि चीनचे हे पवित्रे काळजी करावी असे आहेत. डोकलामच्या क्षेत्रात भारतीय सैन्य चिनी सैन्याच्या समोर प्रत्यक्ष उभेही झाले आहे. चीन हा कोणतेही कारण न देता वा पूर्वसूचनेवाचून हल्ला करणारा देश आहे व त्याचा अनुभव आपण १९६२ मध्ये घेतला आहे. त्यामुळे हा काळ केवळ अण्वस्त्रे बनविण्याचा नसून बलशाली देश आपल्या बाजूने आणण्याचा आहे. त्यासाठी रशिया व अमेरिका यांची मैत्री व विश्वास वाढविणे गरजेचे आहे. दोन्ही आघाड्यांवर युद्ध लढविण्याची भाषा आपले सेनाधिकारी बोलतात. मात्र त्यातले गांभीर्यही जोखून पाहावे असे आहे. काश्मीरचा प्रश्न आपल्या मते सुटला व निकालात निघाला आहे. पाकिस्तानला मात्र तो जिवंत ठेवायचा आहे. त्याचे सारे राजकारणच त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे यापुढच्या काळात पाकिस्तान व चीन यांच्याएवढीच आपल्याही मित्र राष्ट्रांची काळजी घेणे भारताला गरजेचे आहे. तशी ती घेतली जाईल व देश शांततेत राहील असाच आशावाद आपण बाळगला पाहिजे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीImran Khanइम्रान खान