शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

भारत बदलला आहे, यात शंका नाही; या बळजबरीविरुद्ध ‘ब्र’ तरी काढणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 08:56 IST

भारत बदलला आहे. आपण ज्या देशात जन्माला आलो तो ‘हा’ देश नव्हे! २०२४ मध्ये सादर होणाऱ्या नाटकाची संहिता तयार आहे; सगळ्यांनी सावध असावे!

कपिल सिब्बल, राज्यसभा खासदार, ज्येष्ठ विधिज्ञ

लोकसभेच्या २०२४ साली होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभर ज्या विषयावर चर्चा-विमर्श सुरू केला जात आहे, त्यातील मुद्दे पाहिले की अस्वस्थ व्हायला लागते. या निवडणुकीसाठी सादर होणाऱ्या नाटकाची संहिता कधीची लिहून तयार आहे. पहिला मुद्दा आहे समान नागरी कायद्याचा. भाजपशासित राज्यांमध्ये त्यावरून हळूहळू वातावरण तापते आहे. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी हा कायदा विधानसभेमध्ये आणण्याची प्रतिज्ञा आधीच केली आहे. हिमाचल आणि गुजरातमधील विधानसभा निवडणुकीतही हा मुद्दा होताच! या विषयावरील चर्चेला दोन बाजू आहेत. एक आहे ती भावनिक आणि दुसरी फुटीरतावादी. त्यामुळे या विषयाला जहाल धार्मिक रंग देता येऊ शकतो. त्यातूनच लोकसभा निवडणुकीचे कथानक रंगवले जाणार आहे.

दुसरा मुद्दा म्हणजे ‘लव्ह जिहाद’. एका अल्पसंख्य जमातीतील मुलगा हिंदू मुलीशी नाते प्रस्थापित करतो किंवा लग्न करतो; त्याविरुद्धचा हा संताप. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा अलीकडेच गुजरातमध्ये निवडणुकींचा प्रचार करत असताना म्हणाले ‘श्रद्धा वालकरची हत्या हा ‘लव्ह जिहाद’च आहे. सन २०२४ साली मोदींना पुन्हा निवडून दिले नाही तर देशातल्या प्रत्येक शहरात लव्ह जिहाद सुरू होईल.’एका विशिष्ट धर्माच्या लोकांना हिंदूंची मते मिळवण्यासाठी कसे लक्ष्य केले जात आहे, याचेच हे उदाहरण. देशाच्या राजकारणात धार्मिक तेढ  पसरवण्याचा हा प्रयत्न. मुळात सर्वसमावेशक असलेल्या समाजात पसरत चाललेल्या या विषवल्लीची पाळेमुळे देशाच्या राजकारणात अधिक खोलवर नेण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. टीआरपीच्या मोहापायी माध्यमेही या खेळात सहभागी होतात. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर जास्तीत जास्त गैरसमज पसरवू पाहणाऱ्यांचेच फावते.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी गुजरातमध्ये प्रचार करताना केलेले विधान भविष्यात काय वाढून ठेवले आहे याचे द्योतक आहे. गोध्रा येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेचा उल्लेख करून ते म्हणाले, दंगलखोरांना चांगला धडा शिकवला गेला आहे. काँग्रेसने ही दंगलखोरी जोपासली, २००२ साली त्याचा बीमोड केला गेला आणि त्यानंतर गुजरातमध्ये जातीय दंगल झालेली नाही! - म्हणजे एकप्रकारे गोध्रा हिंसाचाराला गृहमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. गोध्रा स्थानकावर उभ्या असलेल्या साबरमती एक्स्प्रेसचा डबा जाळण्यात आला. या घटनेशी कोणताच संबंध नसलेली बायका-मुले नंतरच्या हिंसाचारात लक्ष्य केली गेली. 

२० कोटीच्या घरात असलेल्या अल्पसंख्याक समाजाविरुद्ध हे असे गरळ ओकल्याने कदाचित हिंदू मते एकवटतीलही परंतु देशाच्या लोकशाही राज्य व्यवस्थेवर त्याचा होणारा परिणाम दुर्दैवी असेल.  तिसरा सूत्ररुपाने समोर येणारा विषय म्हणजे मतभेद व्यक्तच होणार नाहीत, अशी व्यवस्था उभी करणे! दलितांविरुद्ध होणाऱ्या अत्याचारांना विरोध करणाऱ्या बुद्धिजीवींना शहरी नक्षलवादी संबोधले जात आहे. बलदंड सरकारांनी केलेल्या हिंसक कारवायांमागील सत्य शोधण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना देशद्रोही कृत्ये मानले जात आहे. सरकार जे म्हणते तेच खरे. जे त्यावर प्रतिप्रश्न करतील ते देशाचे शत्रू! 

‘बेकायदा कारवाया प्रतिबंध कायदा १९६७’ (यूएपीए) अन्वये त्यांच्यावर खटले भरले जातील. या यूएपीएमधील तरतुदी अशा आहेत की, त्यात गोवल्या गेलेल्या व्यक्तीला जामीन मिळणे कठीण जाते. परिणामी सरकारच्या बळजोरीविरुद्ध कोणी ब्र काढायला तयार होत नाही. स्वाभाविकच सरकारी शक्ती बेलगाम सुटतात. न्यायालयेही अशा कायद्याखाली गोवल्या गेलेल्यांना दिलासा देण्यास कचरतात.चौथा मुद्दा न्यायालयांचा!  सत्तारुढ पक्षाच्या धोरणांशी सुसंगत अशा मुद्द्यांची चर्चा सुरू व्हायला मदत होईल, असे निकाल अलीकडे न्यायालयांकडून वारंवार दिले जाऊ लागले. अलीकडचे उदाहरण निवडणूक काळात वाटल्या जाणाऱ्या खिरापतीचे! सत्तारूढ पक्षाला या मुद्याने ग्रासलेले होतेच; पण निवडणूक आयोगही रिंगणात उतरला. हा विषय हाताळण्याचे योग्य ते अधिकार आपल्याला नाहीत, असे प्रतिज्ञापत्र आयोगाने न्यायालयासमोर दिले; आणि कोलांटउडी मारत अशा प्रकरणात कारवाई करण्याची जबाबदारीही घेतली. 

त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणात चौकशी करण्याचे ठरवले. एका विशिष्ट पक्षाने अशा खिरापतीची आश्वासने देऊन लोकप्रियता मिळवणे, हे त्यामागचे कारण  असू शकेल. सत्ताधारी पक्षाने अशा खिरापतींबाबतीत केलेला आर्थिक  युक्तिवाद बरोबर असू शकेल. परंतु त्यामागचा राजकीय हेतू नजरेआड करता येणार नाही. त्यातच विविध व्यासपीठांवरून धर्मद्वेष पसरवणारी वक्तव्ये अधूनमधून भरणाऱ्या तथाकथित धर्मसंसदांत केली जातात. यातूनही जातीय विद्वेषाची मुळे खोलवर जात आहेत. अशी धर्मविद्वेषी वक्तव्ये सरकारी यंत्रणा ज्या (बे)जबाबदारीने  हाताळते ते पाहता असेच वाटावे, की या लोकांना सरकारचीच फूस आहे! पोलिस याबाबतीत काहीच करत नाहीत. याचा अर्थ सरकारचीच तशी इच्छा असणार असाच निघतो ना?

भारत बदलला आहे, यात शंका नाही. सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या एका उमद्या देशात आपण जन्माला आलो. तो भारत आता राहिलेला नाही. आज आपल्या आसपास जे बोलले जाते; ते चिंताजनक आहे.  आपण वेळीच त्याविरुद्ध उभे राहिलो नाही तर आपला भविष्यकाळ धोक्यात आहे. आज दुसऱ्या कुणाला तरी लक्ष्य केले जात आहे, उद्या त्या बंदुकांसमोर आपलेही नरडे असू शकेल!