शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

वाढते वाहनवेड आणि पार्किंगचे खूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 03:55 IST

भारतामधील प्रत्येक शहरी आणि ग्रामीण तरुणांना सध्या वाहनवेडाची बाधा झाली आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. रस्त्यावरचे शेकडो अपघात, रोजचे अनेक मृत्यू अशा बातम्यांशिवाय एक दिवस जात नाही.

- सुलक्षणा महाजन(नगररचनातज्ज्ञ)भारतामधील प्रत्येक शहरी आणि ग्रामीण तरुणांना सध्या वाहनवेडाची बाधा झाली आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. रस्त्यावरचे शेकडो अपघात, रोजचे अनेक मृत्यू अशा बातम्यांशिवाय एक दिवस जात नाही. शहरांच्या रस्त्यावर मोकाट तरुणांची किंवा टोळक्यांची वाहने प्रत्येक शहरात बघायला मिळतात. एकाच गाडीवर बसलेल्या तीन-चार तरुण-तरुणी किंवा मुलेबाळे घेऊन धावणाऱ्या मोटारसायकली बघून जीवाचा थरकाप होतो. वाहतूक पोलीस, अपघात आणि मृत्यू या कशाचेच भय नसलेली मानसिकता शहराच्या प्रत्येक रस्त्यावर बघायला मिळते आहे. खेडोपाडी मोकाट गाई-गुरे शेती-शिवारे, तर शहरात मोकाट वाहने जीवन उद्ध्वस्त करीत आहेत. वाहनप्रेमाचा आधुनिक आणि गोमाताप्रेमाचा पारंपरिक अशा विरोधाभासांनी भरलेला काळ देशामध्ये सध्या अवतरला आहे. या काळात आजारी-वृद्ध गाई-गुरांना गोठामुक्त केले जात आहे, तर आणि तगड्या तरुणांच्या वाहनांसाठी कोट्यवधी रुपये खर्चून पार्किंग निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत.

काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये रस्तोरस्ती उभ्या गाड्या बघून महापालिकेने पार्किंगचे विविध प्रयोग करायला सुरुवात केली. जुन्या इमारतींमध्ये गाडी उभी करायला एकही जागा नसे. नव्याने बांधल्या जाणाºया प्रत्येक इमारतींमध्ये किमान वाहनतळ बांधण्याचे नियम आले. गेली वीस पंचवीस वर्षे खासगी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असलेली बघून अनिवार्य वाहनतळांची संख्याही वाढली आहे. तरीही रस्त्यावरच्या सार्वजनिक किंवा इमारतींमधील खासगी वाहनतळांची भूक काही शमताना दिसत नाही. काही वर्षांपूर्वी वाढीव चटई क्षेत्राच्या बदल्यात नेपिअनसी रस्त्यावर एक बहुमजली वाहनतळ विकासकाने बांधून महापालिकेला दिले. त्यात वाहनांसाठी लिफ्टची सोय केली. गाड्यांच्या मालकांनी वाहनतळाकडे पाठ फिरवल्याने तो आज रिकामा पडला आहे. ३०-४० इमारतींमधील असे बहुमजली वाहनतळ मुंबईत रिकामे पडले आहेत, तर रस्ते मात्र उभ्या वाहनांनी वाहतुकीत अडथळे निर्माण करीत आहेत.

निवडणूक आचारसंहिता लागू होण्याआधी ठाण्यामधील मध्यवर्ती गावदेवी मैदानाखाली ३० कोटी रुपये खर्चाच्या भुयारी वाहनतळाचे भूमिपूजन झाले आहे. गजबजलेल्या भागातल्या या एकुलत्या एक सार्वजनिक खेळाच्या मैदानावर घाला येत असलेला बघून नागरिक उच्च न्यायालयात धावले आहेत. हे वाहनतळाचे खूळ कसे आणि कोठून आले याचा शोध घ्यायला मी लागले, तेव्हा त्याचा उगम स्मार्ट सिटी प्रस्तावात आहे हे समजले. म्हणून मूळ प्रस्ताव आणि आयुक्तांचे नागरिकांपुढे केलेले सादरीकरण पुन्हा बघितले, तेव्हा त्यात भुयारी वाहनतळाचा उल्लेख दिसला. पण ते गावदेवी मैदानाखाली होणार आहे हे मात्र दडवून ठेवले होते हे लक्षात आले. कारण तेव्हा ते समजले असते, तर त्याला नागरिकांनी नक्कीच आक्षेप घेतला असता आणि स्मार्ट सिटीमध्ये तो प्रस्ताव सामील करणे शक्य झाले नसते. नागरिकांची संमती आणि पारदर्शकता या दोन्ही महत्त्वाच्या स्मार्ट सिटी तत्त्वांना बाजूला ठेवून हे करण्यात आले. कदाचित अनेक स्मार्ट शहरांच्या संदर्भात हेच होत असावे. त्यामुळेच यावर्षीच्या निवडणूक प्रचारात सत्ताधारी पक्षाने त्यासंबंधी एकही शब्द उच्चारलेला नसावा.

गावदेवी वाहनतळाचा हा घाट बघितला, तेव्हा ठाणे महापालिकेचा मुख्यालयाजवळ दुमजली यांत्रिक वाहनतळ बघितल्याचे आठवले. एका सकाळी तो बारकाईने बघितला आणि त्याचे फोटो काढले. ३० क्षमता असलेल्या वाहनतळावर दहा मोटारी आणि एक मोटारसायकल उभी होती. वरच्या मजल्यावर एकही वाहन नव्हते. शिवाय गाड्या वर-खाली करण्याची व्यवस्थाही नादुरुस्त झालेली दिसली. रखवालदाराच्या खोलीला कुलूप होते, जे अनेक दिवस उघडलेले दिसत नव्हते. उद््घाटन फलकावरची १७ आॅक्टोबर २०१५ तारीख स्पष्ट होती, मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे लोकप्रतिनिधींची नावे झाकली होती. पार्किंगचे नियम आणि दर यांचा फलक वाचता येत होता. ५०-१०० मोटारी आणि अगणित दुचाक्या आजूबाजूच्या रस्त्यावर कायम उभ्या असतात. ठाणे महापालिकेच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावरचा हा महागडा वाहनतळ मात्र रिकामाच पडलेला असतो. ३० गाड्यांच्या या वाहनतळासाठी पालिकेचे ५०-६० लाख रुपये खर्च झाले असावेत. त्याच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च तरी त्यातून निघत असेल का, हे महापालिकेलाच माहीत.

वास्तवात सार्वजनिक वाहतूक सेवा बळकट, कार्यक्षम आणि प्रभावी करणे हे प्रत्येक महापालिकेचे कर्तव्य आहे. सार्वजनिक रस्त्यांवर सर्व नागरिकांचा हक्क समान असतो. उलट काही वाहनमालक त्याचा उपभोग घेत असतात. सार्वजनिक खर्चातून तयार केलेला रस्ता त्यांना फुकट वापरायला देणे सामाजिक न्यायाच्या विरोधी असते. शहरांच्या रस्त्यावरचे ते मोठे आक्रमण असते. त्यामुळे सामाजिक-आर्थिक आणि पर्यावरणाचा नाश होतो. म्हणूनच त्याची किंमत वसूल करणे हे छान शहरांचे लक्षण असते. तसेच त्याची वसुली नगरपालिकेच्या तिजोरीत भर घालते. आपल्या शहरात नागरिकांमध्ये वाढत असलेले वाहनवेड, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकांचे पार्किंगखूळ दूर करण्यासाठी अशा प्रकल्पांना नागरिकांनी विरोध करून आवर घालणे, हाच त्यावरचा खरा उपाय आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी