शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

करमणुकीचा वाढता फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 8:00 PM

केबलच्या वाढत्या वर्चस्वामुळे मध्यंतरी केबल-वॉरच्या बातम्याही गाजल्या. अर्थात, करमणूक म्हटलं की त्यासाठी पैसे मोजावेच लागतात. करमणुकीची इतर अनेक साधने आज उपलब्ध आहेत. मात्र, सर्वाधिक पसंतीचे साधन म्हणजे टीव्ही हेच आहे. 

- विनायक पात्रुडकर 

सध्या एकवेळ घरात खायला दोन वेळ मिळेल की नाही, हे सांगता येत नाही; पण प्रत्येक घरात टीव्ही नक्की सापडेल. अगदी झोपडपट्टींमध्येही सर्रास टीव्ही दिसून येतो. तब्बल दीड-दोन हजारांहून अधिक वाहिन्यांचा रतीब सुरू असतो. यातल्या कोण-किती वाहिन्या पाहतो हा संशोधनाचा विषय ठरेल; परंतु केबल, टीव्ही ही काळाची गरज बनली आहे, हे मात्र नक्की. केबलच्या वाढत्या वर्चस्वामुळे मध्यंतरी केबल-वॉरच्या बातम्याही गाजल्या. अर्थात, करमणूक म्हटलं की त्यासाठी पैसे मोजावेच लागतात. करमणुकीची इतर अनेक साधने आज उपलब्ध आहेत. मात्र, सर्वाधिक पसंतीचे साधन म्हणजे टीव्ही हेच आहे. आता हा व्यवसाय अब्जावधी रुपयांची उलाढाल करू लागला आहे. स्वाभाविकच यावर कर लागल्याने सरकारला भरघोस कमाई मिळणार हे निर्विवाद आहे. ही संधी साधतच सरकारने केबलवर कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जनहिताचा आहे, असे बोलले जात आहे. प्रत्यक्षात सर्वसामान्यांच्या खिशाला यामुळे अधिक कात्री लागणार आहे, असा दावाही होत आहे. हे सत्य ठरले तर केबलचे दरमहा किमान ५०० रुपये मोजावे लागतील, असाही तर्क आहे. ही वाढ नक्कीच परवडणारी ठरणार नाही; पण तसे केले नाही, तर सरकारलाही महसूल मिळणार नाही. या निर्णयात सर्वसामान्य भरडला जाणार हे मात्र निश्चित. टीव्हीचा उदय होऊन अंदाजे चार दशके झाली असतील. सुरुवातीला श्रीमंतांच्या घरात दिसणारा टीव्ही आता घराघरांत दिसतो़ श्रीमंत आणि गरीब, असा भेदभाव यात राहिलेला नाही. दूरदर्शन या सरकारी चॅनेलची मक्तेदारी मोडून काढत जेव्हा खासगी चॅनेलसाठी दारे मोकळी करण्यात आली, तेव्हा तर अनेकांना रोजगारही मिळाले. यासोबतच केबलचालकांनी आपली दुकाने गल्लोगल्लीत मांडली, अगदी गाव-खेड्यातही केबल पोहोचली. तेथेही भ्रष्टाचार सुरू झाला. सरकारला कमी ग्राहक दाखवून कर बुडवणे सुरू झाले़ यात अनेक केबलचालक करोडपती झाले़ या व्यवसायात गँगवारही सुरू झाला. त्याच वेळी मोठ्या कंपन्यांनी डिश टीव्हीचा पर्याय उपलब्ध केला़ सरकारनेही केबलचालकांच्या मुजोरीला चाप लावत सेट टॉप बॉक्सची सक्ती केली. सेट टॉप बॉक्स नसेल तर चॅनेल दिसणार नाही, असा आदेशच केंद्र सरकारने जारी केला. या विरोधात केबलचालक न्यायालयात गेले़ न्यायालयाने सरकारच्या बाजूने निर्णय दिला. त्यामुळे सेट टॉप बॉक्स प्रत्येक घरात आला. याने केबल व्यवसायात थोड्या फार प्रमाणात पारदर्शकता आली. मात्र, या व्यवसायावरील कर दिवसेंदिवस वाढतच गेला. अधिक कर लागल्यामुळे अवघ्या काही दिवसांनी म्हणजे जानेवारी महिन्यात केबलचे दर वाढतील. ही वाढ कोणी टाळू शकत नाही; पण प्रश्न असा उपस्थित होतो की, ही वाढ सर्वसामान्यांच्या खिशातूनच का घ्यावी. कारण टीव्ही चॅनेलवर झळकणाऱ्या जाहिरातींमुळे चॅनेलला कोट्यवधी रुपये मिळतात. या व्यवसायातून चॅनेल चालक-मालक श्रीमंत होतात, असे असताना ज्या प्रेक्षकांमुळे चॅनेलला अधिक पसंती मिळते, त्यांच्यावर कर का लावावा? याचाही विचार झाला पाहिजे. व्यवसाय चालवण्यासाठी पैसे लागतात. त्यातून मिळणा-या नफ्याचेही हिस्से पाडतात. चॅनेल व्यवसायाचा नफा ग्राहकांना मिळत नाही.  परिणामी, केबल दरवाढ करताना सर्वसामान्य भरडला जाणार नाही, याची काळजी सरकार व प्रशासनाने घ्यायला हवी. मात्र, सरकार व प्रशासनाला हेही ज्ञात आहे की, टीव्हीचे व्यसन प्रत्येक घराला लागले आहे. पैसे वाढवले तरी त्याला हवा तसा विरोध होणार नाही.  या मानसिकतेमुळेच सर्वसामान्य भरडला जातो हेही वास्तव आहे, जे कोणी नाकारू शकत नाही.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMumbaiमुंबई