शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
2
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
3
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
4
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
5
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
6
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
7
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
8
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
9
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
10
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
11
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
12
बालपणीचे मित्र, इंदूरमधला कॅफे...राजाच्या हत्येसाठी राजने ३ मित्रांना कसं तयार केले?
13
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
14
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
15
बाबो! बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज विकून खुशीने कमावले तब्बल १० कोटी, म्हणाली...
16
MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO)
17
सात जन्मांची साथ..., हत्या केल्यानंतर सोनमने राजाच्या अकाउंवरून शेअर केली अशी पोस्ट, पण ती एक चूक नडली, पोलिसांना आला संशय
18
खतरनाक! सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं बेतलं १९ वर्षीय मुलीच्या जीवावर; काय आहे डस्टिंग चॅलेंज?
19
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
20
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा

शहाणी माणसं मौनात, धर्मांधाचा कलकलाट वाढला; वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे? 

By नंदकिशोर पाटील | Updated: April 5, 2023 12:47 IST

वाट चुकलेल्यांना कोणीतरी खडसावून सांगण्याची वेळ आलेली आहे. परंतु ज्यांच्याबद्दल आदर वाटावा अशा आदरणीय व्यक्तिमत्त्वांची उणीव असल्याने कोणालाच कुणाचा धाक उरलेला नाही.

७ नोव्हेंबर १९४६ ही तारीख इतिहासात खूप महत्वाची आहे. स्वातंत्र्याचा लढा अंतिम टप्प्यात असताना देशभर धार्मिक दंगे भडकले. मोहम्मद अली जिन्नांनी पाकिस्तानच्या निर्मितीसाठी ‘ॲक्शन’चा नारा दिल्यानंतर संयुक्त बंगालमध्ये दंगली सुरू झाल्या. आताच्या बांगलादेशात असलेल्या नौखालीत तर तेव्हा रक्ताचे पाट वाहिले. दिल्लीत स्वातंत्र्याच्या वाटाघाटी सुरू असताना नौखाली कित्येक दिवस जळत होते. आता सारखी मिनिटागणिक ‘ब्रेकिंग न्यूज’ देणारी न्यूज चॅनल्स तेव्हा नव्हती. वर्तमानपत्रांचा खपही शहरांपुरताच होता. टेलिफोन व्यतिरिक्त संवादाचे कोणतही माध्यम नव्हते. तेदेखील मर्यादित. परिणामी, नौखालीच्या दंगलीची बातमी दिल्लीपर्यंत पोहोचायला पंधरा दिवस लागले!

या पंधरा दिवसात विशिष्ट समुदायाच्या घरांची राखरांगोळी झाली होती. नौखालीच्या बातमीने महात्मा गांधी अस्वस्थ झाले. त्यांनी नौखालीला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र तिथली स्फोटक परिस्थिती पाहता बापूंनी आपला दौरा पुढे ढकलावा, अशी विनंती पंडित नेहरू आदी नेत्यांनी केली. मात्र गांधीजी ठाम राहिले. सरोजिनी नायडू, निर्मलकुमार बसू, सुशीला नायडू, जे. बी. कृपलानी अशा निवडक सहकाऱ्यांना सोबत घेऊन रेल्वेने दीड हजार किलोमीटर प्रवास करून गांधीजी बंगालमध्ये पोहोचले. जागोजागी धार्मिक दंगे पेटलेले होते. अनेक ठिकाणी बापूंना विरोध झाला. मात्र, जिवाची पर्वा न करता बापू नौखालीत पोहोचले. पदयात्रा, बैठका, सभा घेऊन त्यांनी नौखालीत शांतता प्रस्थापित केली. तब्बल चार महिने ते तिथे होते! गांधीजींच्या नौखाली दौऱ्याचे फलित काय तर फाळणीनंतर पूर्व पाकिस्तानात आणि आता बांगलादेशात असलेल्या नौखालीत हिंदू- मुस्लिम समुदायात एकही धार्मिक दंगल अथवा तणावाची घटना घडलेली नाही! एवढेच नव्हे, तर गांधीजींच्या कार्याने भारावून गेलेल्या बॅरिस्टर हेमंत कुमार घोष यांनी त्यांच्या मालकीची सुमारे अडीच हजार एकर जमीन बापूंनी स्थापन केलेल्या ट्रस्टला दान केली! आजही तिथे गांधी आश्रम आहे.

आज या घटनेची आठवण होण्याचे कारण म्हणजे, सध्याचे अस्वस्थ वातावरण. गेल्या तीन-चार दिवसात राज्यात ठिकठिकाणी घडलेल्या घटना पाहिल्या तर, कोणीतरी सामाजिक ऐक्याला नख लावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचा संशय येतो. किरकोळ कारणांचे निमित्त करून जाळपोळ, दगडफेक केली जाते. पोलिसांना लक्ष्य बनविले जाते. धार्मिक तणाव निर्माण करून कोणाला राजकीय पोळी भाजायची असेल तर हा आगीशी खेळ त्यांच्या अंगाशी आल्याशिवाय राहाणार नाही. एखादी ठिणगी तुमच्याही घरावर येऊ शकते. कोणत्याही राष्ट्राची प्रगती सामाजिक शांततीशिवाय शक्य नसते. आधीच कोरोनामुळे उद्योगधंद्याचे कंबरडे मोडले. अनेकांचे रोजगार बुडाले. दोन वर्षांनंतर आता कुठे जनजीवन पूर्वपदावर येत असताना अशा घटनांमुळे निरपराध लोक हकनाक बळी पडतील. नवे उद्योग येणार नाही. गुंतवणुकीला खीळ बसेल. तरुणाईच्या भविष्यात आपण अंधार पेरत आहोत, याची जाणीव ठेवा.

समाजात शहाण्या माणसांचीच संख्या बहुसंख्य असते. मात्र, त्यांनी मौन बाळगल्यामुळे अडाण्यांचा हैदोस सुरू आहे. वाट चुकलेल्यांना कोणीतरी खडसावून सांगण्याची वेळ आलेली आहे. परंतु ज्यांच्याबद्दल आदर वाटावा अशा आदरणीय व्यक्तिमत्त्वांची उणीव असल्याने कोणालाच कुणाचा धाक उरलेला नाही. गांधी-नेहरूंबद्दल टिंगल करणे वेगळे आणि मानवतेसाठी त्यांनी केलेल्या कार्यातून प्रेरणा घेणे वेगळे. म्हणूनच, इलाही जमादार यांच्या गझलेतील ‘वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे?’ हा सवाल खूप महत्त्वाचा आहे.

आता तरी जागे व्हा! लोकशाहीत नागरी समाजाची भूमिका खूप महत्त्वाची असते. अधिकार, हक्क आणि स्वातंत्र्याबाबत जागृत असणाऱ्या प्रबुद्ध समाजाने समाजविघातक प्रवृत्तीवर अंकुश ठेवला पाहिजे. धर्म आणि राजकारणाची सरमिसळ करणाऱ्यांना सर्वोच्च न्यायसंस्थेने खडसावले आहेच. नागरी समाजातूनदेखील आवाज उठवला पाहिजे. कारण, प्रबुद्धांचा आवाज बुलंद झाल्याखेरीज द्वेषाच्या मशाली विझणार नाहीत. परंतु, दुर्दैवाने आज कधीकाळी हातात मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरणारी ‘सिव्हिल सोसायटी’च गायब आहे! समाजातील शहाणी माणसं मौनात गेल्याने, सामाजिक चळवळींनी अंग टाकल्याने धर्मांधाचा कलकलाट वाढला आहे. २१ व्या शतकातही कोणाला आपला धर्म संकटात आहे, असे कसे वाटू शकते? नक्कीच कोणीतरी अफू आणि अफवा पिकवित असावेत.

टॅग्स :SocialसामाजिकAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारण