शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

शहाणी माणसं मौनात, धर्मांधाचा कलकलाट वाढला; वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे? 

By नंदकिशोर पाटील | Updated: April 5, 2023 12:47 IST

वाट चुकलेल्यांना कोणीतरी खडसावून सांगण्याची वेळ आलेली आहे. परंतु ज्यांच्याबद्दल आदर वाटावा अशा आदरणीय व्यक्तिमत्त्वांची उणीव असल्याने कोणालाच कुणाचा धाक उरलेला नाही.

७ नोव्हेंबर १९४६ ही तारीख इतिहासात खूप महत्वाची आहे. स्वातंत्र्याचा लढा अंतिम टप्प्यात असताना देशभर धार्मिक दंगे भडकले. मोहम्मद अली जिन्नांनी पाकिस्तानच्या निर्मितीसाठी ‘ॲक्शन’चा नारा दिल्यानंतर संयुक्त बंगालमध्ये दंगली सुरू झाल्या. आताच्या बांगलादेशात असलेल्या नौखालीत तर तेव्हा रक्ताचे पाट वाहिले. दिल्लीत स्वातंत्र्याच्या वाटाघाटी सुरू असताना नौखाली कित्येक दिवस जळत होते. आता सारखी मिनिटागणिक ‘ब्रेकिंग न्यूज’ देणारी न्यूज चॅनल्स तेव्हा नव्हती. वर्तमानपत्रांचा खपही शहरांपुरताच होता. टेलिफोन व्यतिरिक्त संवादाचे कोणतही माध्यम नव्हते. तेदेखील मर्यादित. परिणामी, नौखालीच्या दंगलीची बातमी दिल्लीपर्यंत पोहोचायला पंधरा दिवस लागले!

या पंधरा दिवसात विशिष्ट समुदायाच्या घरांची राखरांगोळी झाली होती. नौखालीच्या बातमीने महात्मा गांधी अस्वस्थ झाले. त्यांनी नौखालीला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र तिथली स्फोटक परिस्थिती पाहता बापूंनी आपला दौरा पुढे ढकलावा, अशी विनंती पंडित नेहरू आदी नेत्यांनी केली. मात्र गांधीजी ठाम राहिले. सरोजिनी नायडू, निर्मलकुमार बसू, सुशीला नायडू, जे. बी. कृपलानी अशा निवडक सहकाऱ्यांना सोबत घेऊन रेल्वेने दीड हजार किलोमीटर प्रवास करून गांधीजी बंगालमध्ये पोहोचले. जागोजागी धार्मिक दंगे पेटलेले होते. अनेक ठिकाणी बापूंना विरोध झाला. मात्र, जिवाची पर्वा न करता बापू नौखालीत पोहोचले. पदयात्रा, बैठका, सभा घेऊन त्यांनी नौखालीत शांतता प्रस्थापित केली. तब्बल चार महिने ते तिथे होते! गांधीजींच्या नौखाली दौऱ्याचे फलित काय तर फाळणीनंतर पूर्व पाकिस्तानात आणि आता बांगलादेशात असलेल्या नौखालीत हिंदू- मुस्लिम समुदायात एकही धार्मिक दंगल अथवा तणावाची घटना घडलेली नाही! एवढेच नव्हे, तर गांधीजींच्या कार्याने भारावून गेलेल्या बॅरिस्टर हेमंत कुमार घोष यांनी त्यांच्या मालकीची सुमारे अडीच हजार एकर जमीन बापूंनी स्थापन केलेल्या ट्रस्टला दान केली! आजही तिथे गांधी आश्रम आहे.

आज या घटनेची आठवण होण्याचे कारण म्हणजे, सध्याचे अस्वस्थ वातावरण. गेल्या तीन-चार दिवसात राज्यात ठिकठिकाणी घडलेल्या घटना पाहिल्या तर, कोणीतरी सामाजिक ऐक्याला नख लावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचा संशय येतो. किरकोळ कारणांचे निमित्त करून जाळपोळ, दगडफेक केली जाते. पोलिसांना लक्ष्य बनविले जाते. धार्मिक तणाव निर्माण करून कोणाला राजकीय पोळी भाजायची असेल तर हा आगीशी खेळ त्यांच्या अंगाशी आल्याशिवाय राहाणार नाही. एखादी ठिणगी तुमच्याही घरावर येऊ शकते. कोणत्याही राष्ट्राची प्रगती सामाजिक शांततीशिवाय शक्य नसते. आधीच कोरोनामुळे उद्योगधंद्याचे कंबरडे मोडले. अनेकांचे रोजगार बुडाले. दोन वर्षांनंतर आता कुठे जनजीवन पूर्वपदावर येत असताना अशा घटनांमुळे निरपराध लोक हकनाक बळी पडतील. नवे उद्योग येणार नाही. गुंतवणुकीला खीळ बसेल. तरुणाईच्या भविष्यात आपण अंधार पेरत आहोत, याची जाणीव ठेवा.

समाजात शहाण्या माणसांचीच संख्या बहुसंख्य असते. मात्र, त्यांनी मौन बाळगल्यामुळे अडाण्यांचा हैदोस सुरू आहे. वाट चुकलेल्यांना कोणीतरी खडसावून सांगण्याची वेळ आलेली आहे. परंतु ज्यांच्याबद्दल आदर वाटावा अशा आदरणीय व्यक्तिमत्त्वांची उणीव असल्याने कोणालाच कुणाचा धाक उरलेला नाही. गांधी-नेहरूंबद्दल टिंगल करणे वेगळे आणि मानवतेसाठी त्यांनी केलेल्या कार्यातून प्रेरणा घेणे वेगळे. म्हणूनच, इलाही जमादार यांच्या गझलेतील ‘वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे?’ हा सवाल खूप महत्त्वाचा आहे.

आता तरी जागे व्हा! लोकशाहीत नागरी समाजाची भूमिका खूप महत्त्वाची असते. अधिकार, हक्क आणि स्वातंत्र्याबाबत जागृत असणाऱ्या प्रबुद्ध समाजाने समाजविघातक प्रवृत्तीवर अंकुश ठेवला पाहिजे. धर्म आणि राजकारणाची सरमिसळ करणाऱ्यांना सर्वोच्च न्यायसंस्थेने खडसावले आहेच. नागरी समाजातूनदेखील आवाज उठवला पाहिजे. कारण, प्रबुद्धांचा आवाज बुलंद झाल्याखेरीज द्वेषाच्या मशाली विझणार नाहीत. परंतु, दुर्दैवाने आज कधीकाळी हातात मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरणारी ‘सिव्हिल सोसायटी’च गायब आहे! समाजातील शहाणी माणसं मौनात गेल्याने, सामाजिक चळवळींनी अंग टाकल्याने धर्मांधाचा कलकलाट वाढला आहे. २१ व्या शतकातही कोणाला आपला धर्म संकटात आहे, असे कसे वाटू शकते? नक्कीच कोणीतरी अफू आणि अफवा पिकवित असावेत.

टॅग्स :SocialसामाजिकAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारण