शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहांना अटकाव

By admin | Updated: September 12, 2014 03:10 IST

अमित शहा यांची भाजपाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली तेव्हाच दिल्लीहून प्रकाशित होणाऱ्या एका राष्ट्रीय नियतकालिकाने ‘ही नियुक्ती भाजपाला आज मानवणारी असली

अमित शहा यांची भाजपाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली तेव्हाच दिल्लीहून प्रकाशित होणाऱ्या एका राष्ट्रीय नियतकालिकाने ‘ही नियुक्ती भाजपाला आज मानवणारी असली, तरी उद्या अडचणीची ठरेल’ असे आपल्या मुखपृष्ठावर लिहून त्या विधानाचे समर्थन करणारा एक मोठा लेख प्रकाशित केला होता. नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत निकटवर्ती वर्तुळातले व विश्वासातले ते कार्यकर्ते असले, तरी त्यांच्यावर गुजरातच्या न्यायालयात अनेक खटले दाखल आहेत. खून, खंडणीखोरी आणि अपहरणासारखे गंभीर गुन्हे त्यात समाविष्ट असून, ते सध्या पॅरोलवर आहेत. सध्याचे राजकीय वातावरण बघता त्यांना सातत्याने पॅरोल मिळेल यात शंका नसली, तरी तो न्यायालयांच्या विश्वसनीयतेचाही कधीतरी प्रश्न ठरेल. एवढे सारे पाठीशी असतानाच ‘मुजफ्फरनगरची दंगल जरा आठवा’ अशी गंभीर धमकी सहारनपूरच्या नागरिकांना देण्याइतपत त्यांनी आपल्यावरील जबाबदारीचे भान आता गमावले आहे. पुढे जाऊन ‘जोवर उत्तर प्रदेशात तणावाचे वातावरण आहे, तोवर भाजपाला तेथे विजयाची शक्यताही मोठी आहे’ हे भयकारी वाक्य त्यांनी आपल्या पक्षकार्यकर्त्यांना ऐकविले आहे आणि आता ‘मुजफ्फरनगरच्या दंगलींचा बदला घेण्याची लोकसभेची निवडणूक ही संधी होती’ असे म्हणून त्यांनी आचारसंहितेचा भंगही केला आहे. त्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अखिलेश यादव यांच्या उत्तर प्रदेश सरकारने तो दाखल केला असल्यामुळे त्यावर ‘राजकीय सूडबुद्धीचा’ आरोप ठेवायला अमित शहा यांचा पक्ष अर्थातच मोकळा आहे. मात्र, शहा यांच्या मागे असलेली आरोपांची दीर्घ परंपरा पाहता हे गुन्हे कधीतरी दाखल होणे भागच होते. नंतर आलेल्या वृत्तात न्यायालयाने पोलिसांचे आरोपपत्र परत पाठविल्याचे म्हटले आहे. त्याची कारणे अजून स्पष्ट व्हायची आहेत. तथापि, न्यायालयांची अशी वर्तणूक त्यांच्याही भोवती संशयाचा घेरा उभा करणारी आहे. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या ११ जागांवर पोटनिवडणुका व्हायच्या आहेत. या सर्व जागा या अगोदर भाजपाने जिंकल्या असल्यामुळे याही वेळी त्या जागांवर भाजपाला विजय मिळेल, असेच सारे म्हणतात. परंतु, जनतेचा ‘मूड’ बदलला आहे. झारखंड, बिहार आणि कर्नाटकात झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांनी ते साऱ्यांच्या लक्षात आणूनही दिले आहे. त्यामुळे भाजपाचे उत्तर प्रदेशातील नेते तेथे थेट धमकीच्या भाषेवर आले आहेत. त्या राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष योगी आदित्यनाथ यांच्या फुत्कारवजा भाषणांमुळे राज्यात दंगली होतील म्हणून उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्यावर या आधीच भाषणबंदी लादली आहे व त्यांना लखनौ या राजधानीच्या शहरी यायला मनाई केली आहे. मात्र, हा मनाईहुकूम मोडून या आदित्यनाथांनी त्यांच्या सवयीनुसार सर्वत्र भडकावू भाषणे देण्याचे त्यांचे व्रत मात्र सोडले नाही. आदित्यनाथावरील बंदी ताजी असतानाच आता खुद्द भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीच या हाणामारीत उडी घेऊन वरील प्रकारची उद्दाम विधाने केली आहेत. काँग्रेस पराभूत आहे आणि बहुजन समाज पक्ष व समाजवादी पक्ष पराभवाच्या धक्क्यातून सावरायचे आहेत. या स्थितीत आपण काहीही करू व बोलू शकतो हा भाजपा पुढाऱ्यांचा होरा आहे. परंतु, राजकारण स्थिर असले तरी कायदा, प्रशासन व न्यायालये या यंत्रणा त्यांचे काम करीत आहेत आणि ते त्यांनी करावे हीच त्यांच्याकडून अपेक्षाही आहे. आदित्यनाथ आणि शहा यांना अडवायला आता याच यंत्रणा समोर आल्या आहेत. त्यांची कारवाई किती परिणामकारक होते आणि तिचे राजकारण केवढ्या मोठ्या प्रमाणात केले जाते हे येत्या काही दिवसांत देशाला दिसणार आहे. आपल्याविरुद्धची कारवाई म्हणजे धर्माविरुद्धची कारवाई असे भ्रामक चित्र भाजपाच्या प्रचार यंत्रणेकडून उभे केले जाईलच. प्रत्येक गोष्ट थेट त्याच पातळीवर नेण्याची त्या पक्षाची सध्याची कार्यपद्धती आता जनतेच्याही चांगल्या परिचयाची झाली आहे. मात्र, आदित्यनाथ आणि शहा यांच्या उद्दाम भाषेचा उलटा परिणाम होण्याचीच शक्यता जास्त, कारण आपला समाज कोणत्याही विधायक आवाहनाचे स्वागत करणारा आहे. पण, कोणी उगाच धमकीवजा भाषा व आक्रमकपणाचा आव आणत असेल, तर त्याविषयीची त्याची प्रतिक्रियाही नेहमीच तीव्र राहत आली आहे. आदित्यनाथ आणि अमित शहा यांच्याविषयीची त्याची प्रतिक्रिया पोटनिवडणुकांच्या निकालात दिसण्याची शक्यताही मोठी आहे. ती तशी दिसली तर दिल्लीच्या त्या नियतकालिकाचे शहा यांच्याविषयीचे भाकीत फार लवकर खरे ठरले, असे होणार आहे.