शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

दुर्लक्षित माळीण

By admin | Updated: September 6, 2014 11:05 IST

निसर्गाच्या प्रकोपासमोर कोणाचे काहीही चालत नाही. तरीही अशा घटनेनंतर ‘आताच्या शतकात’ सावरण्याची आपली शक्ती असली पाहिजे. जपानसारख्या

- नागेश केसरी, ज्येष्ठ पत्रकार
 
निसर्गाच्या प्रकोपासमोर कोणाचे काहीही चालत नाही. तरीही अशा घटनेनंतर ‘आताच्या शतकात’ सावरण्याची आपली शक्ती असली पाहिजे. जपानसारख्या राष्ट्राने अनेक नैसर्गिक प्रकोपांनंतर पुन्हा नव्याने राष्ट्रनिर्मिती केली आहे. या अगोदरही महाराष्ट्रात किल्लारी येथे काही वर्षांपूर्वी भूकंपाचा धक्का बसला आणि ते गाव होत्याचे नव्हते झाले, त्यानंतर या वर्षी जुलै महिन्यात आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव जमीनदोस्त झाले. हे दोन्ही प्रकोप राज्याने पाहिले आहेत, पण महाराष्ट्रातील दातृत्ववान उद्योगपतींनी किल्लारीकडे जसे लक्ष दिले, तसे माळीणकडे दिले नाही.
बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांत नेहमी नद्यांना पूर येतो, हिमालयाचे कडे कोसळतात, अनेक गावे नष्ट होतात, वाहूनही जातात. महाराष्ट्रात किल्लारीला भूकंप झाला तेव्हा वर्षभर त्या भागातल्या नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवत होते, प्रशासनाला त्याची जाणीव होती. पण माळीणबाबत अशी कोणतीही पूर्वसंकेत देणारी घटना घडली नाही. डोंगर पायथ्याशी वसलेले लहान गाव, छोटी-मोठी शेती त्यामुळे या गावाची आर्थिक स्थिती मजबूत नव्हती, बहुतेक नागरिक कष्ट करणारे, लहानसहान उद्योग करणारे, त्यामुळे या गावाकडे म्हणावे तसे लक्ष गेले नाही आणि लक्ष देण्याची गरजही भासली नाही. आंबेगावचे लोकप्रतिनिधी दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघातला हा एक भाग, त्यांचे आपल्या मतदारसंघातील गावाकडे जसे लक्ष असते तसेच विकासाच्या दृष्टीने या गावाकडे लक्ष होते. त्यांनी गेल्या महिनाभरापासून माळीणच्या पुनर्वसनाच्या कामाला वेग देण्याचा प्रयत्न केला आहे. 
राज्य सरकारने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या नेत्यांबरोबरच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आदींनी या गावाला भेट दिली. मदतीचे ठोस आश्‍वासनही दिले. केवळ सरकारच्या मदतीवर अवलंबून त्या गावाचा विकास होणे फारसे शक्य नसते याची जाणीव सर्वसंबंधितांना आहे. नैसर्गिकदृष्ट्या सुरेख असलेल्या या गावाकडे दातृत्ववान व्यक्तींनी अद्याप लक्ष दिले नाही, माध्यमानींही या विषयावर लक्ष केंद्रित केले नाही. जवळपास १५0 नागरिक मृत्युमुखी पडले, अनेक जखमी झाले. मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांचे पुनर्वसन, त्यांच्या नातेवाइकांची विचारपूस ही केवळ स्थानिक लोकप्रतिनिधींनी करावी, अशी अपेक्षा ठेवणे फारसे बरोबर नाही. लोकप्रतिनिधींनी ते करावेच आणि ते करतील. पण दातृत्ववान व्यक्तींनीही अशा कामावर लक्ष केंद्रित केले तर या राज्याच्या वैभवात भरच पडणार आहे. नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर आर्थिक मदतीचा ओघ मोठय़ा प्रमाणात येतो, पण त्या प्रमाणात तसा ओघ इकडे आला नाही. विविध पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांनी या गावाकडे लक्ष दिले नाही. पुण्यासारख्या अत्यंत जवळ असलेल्या या गावाचे टुमदार गावात परिवर्तन होणे, स्थानिक नागरिकांना दिलासा देणे, एक चांगले शहर वसविणे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातील दातृत्ववान व्यक्तींना सहज करणे शक्य आहे.
नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घालून दिलेली पद्धत माळीण गावासाठी अनुसरली गेली असती तर महाराष्ट्राला एक वेगळा अनुभव मिळाला असता. पवारांनी किल्लारी भूकंपाच्या वेळी सोलापूर येथे ठाण मांडून किल्लारीचे पुनर्वसन केले. अशीच एखादी महनीय व्यक्ती पुढे आली असती आणि केंद्र व राज्य सरकारने मदतीचा ओघ वाढवला असता तर काम करणार्‍या व्यक्तींची शक्ती दुणावली असती. एक महिना झाला तरी या घटनेचे राज्यातल्या इतर नागरिकांना सातत्याने स्मरण होत नाही. माध्यमांनी अशा घटनाकडे आपला कटाक्ष टाकला किंवा आपली यंत्रणा राबविण्यासाठी संबंधितांना भाग पाडले तर माळीणकरांना खरोखरच दिलासा मिळणार आहे.
दु:खात चार शब्द सांत्वनपर कोणी सांगितले तर दु:ख हलके होण्यासाठी मदत होते, एवढी तर जाणीव दातृत्ववान व्यक्तींनी ठेवावयास हरकत नाही हीच खरी महाराष्ट्रातील संतांची शिकवणूक आहे आणि पुण्याजवळ वाढलेल्या माळीणकरांना त्याची गरज आहे.दुर्लक्षित माळीण
 
नागेश केसरी
ज्येष्ठ पत्रकार
 
 
निसर्गाच्या प्रकोपासमोर कोणाचे काहीही चालत नाही. तरीही अशा घटनेनंतर ‘आताच्या शतकात’ सावरण्याची आपली शक्ती असली पाहिजे. जपानसारख्या राष्ट्राने अनेक नैसर्गिक प्रकोपांनंतर पुन्हा नव्याने राष्ट्रनिर्मिती केली आहे. या अगोदरही महाराष्ट्रात किल्लारी येथे काही वर्षांपूर्वी भूकंपाचा धक्का बसला आणि ते गाव होत्याचे नव्हते झाले, त्यानंतर या वर्षी जुलै महिन्यात आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव जमीनदोस्त झाले. हे दोन्ही प्रकोप राज्याने पाहिले आहेत, पण महाराष्ट्रातील दातृत्ववान उद्योगपतींनी किल्लारीकडे जसे लक्ष दिले, तसे माळीणकडे दिले नाही.
बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांत नेहमी नद्यांना पूर येतो, हिमालयाचे कडे कोसळतात, अनेक गावे नष्ट होतात, वाहूनही जातात. महाराष्ट्रात किल्लारीला भूकंप झाला तेव्हा वर्षभर त्या भागातल्या नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवत होते, प्रशासनाला त्याची जाणीव होती. पण माळीणबाबत अशी कोणतीही पूर्वसंकेत देणारी घटना घडली नाही. डोंगर पायथ्याशी वसलेले लहान गाव, छोटी-मोठी शेती त्यामुळे या गावाची आर्थिक स्थिती मजबूत नव्हती, बहुतेक नागरिक कष्ट करणारे, लहानसहान उद्योग करणारे, त्यामुळे या गावाकडे म्हणावे तसे लक्ष गेले नाही आणि लक्ष देण्याची गरजही भासली नाही. आंबेगावचे लोकप्रतिनिधी दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघातला हा एक भाग, त्यांचे आपल्या मतदारसंघातील गावाकडे जसे लक्ष असते तसेच विकासाच्या दृष्टीने या गावाकडे लक्ष होते. त्यांनी गेल्या महिनाभरापासून माळीणच्या पुनर्वसनाच्या कामाला वेग देण्याचा प्रयत्न केला आहे. 
राज्य सरकारने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या नेत्यांबरोबरच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आदींनी या गावाला भेट दिली. मदतीचे ठोस आश्‍वासनही दिले. केवळ सरकारच्या मदतीवर अवलंबून त्या गावाचा विकास होणे फारसे शक्य नसते याची जाणीव सर्वसंबंधितांना आहे. नैसर्गिकदृष्ट्या सुरेख असलेल्या या गावाकडे दातृत्ववान व्यक्तींनी अद्याप लक्ष दिले नाही, माध्यमानींही या विषयावर लक्ष केंद्रित केले नाही. जवळपास १५0 नागरिक मृत्युमुखी पडले, अनेक जखमी झाले. मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांचे पुनर्वसन, त्यांच्या नातेवाइकांची विचारपूस ही केवळ स्थानिक लोकप्रतिनिधींनी करावी, अशी अपेक्षा ठेवणे फारसे बरोबर नाही. लोकप्रतिनिधींनी ते करावेच आणि ते करतील. पण दातृत्ववान व्यक्तींनीही अशा कामावर लक्ष केंद्रित केले तर या राज्याच्या वैभवात भरच पडणार आहे. नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर आर्थिक मदतीचा ओघ मोठय़ा प्रमाणात येतो, पण त्या प्रमाणात तसा ओघ इकडे आला नाही. विविध पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांनी या गावाकडे लक्ष दिले नाही. पुण्यासारख्या अत्यंत जवळ असलेल्या या गावाचे टुमदार गावात परिवर्तन होणे, स्थानिक नागरिकांना दिलासा देणे, एक चांगले शहर वसविणे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातील दातृत्ववान व्यक्तींना सहज करणे शक्य आहे.
नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घालून दिलेली पद्धत माळीण गावासाठी अनुसरली गेली असती तर महाराष्ट्राला एक वेगळा अनुभव मिळाला असता. पवारांनी किल्लारी भूकंपाच्या वेळी सोलापूर येथे ठाण मांडून किल्लारीचे पुनर्वसन केले. अशीच एखादी महनीय व्यक्ती पुढे आली असती आणि केंद्र व राज्य सरकारने मदतीचा ओघ वाढवला असता तर काम करणार्‍या व्यक्तींची शक्ती दुणावली असती. एक महिना झाला तरी या घटनेचे राज्यातल्या इतर नागरिकांना सातत्याने स्मरण होत नाही. माध्यमांनी अशा घटनाकडे आपला कटाक्ष टाकला किंवा आपली यंत्रणा राबविण्यासाठी संबंधितांना भाग पाडले तर माळीणकरांना खरोखरच दिलासा मिळणार आहे.
दु:खात चार शब्द सांत्वनपर कोणी सांगितले तर दु:ख हलके होण्यासाठी मदत होते, एवढी तर जाणीव दातृत्ववान व्यक्तींनी ठेवावयास हरकत नाही हीच खरी महाराष्ट्रातील संतांची शिकवणूक आहे आणि पुण्याजवळ वाढलेल्या माळीणकरांना त्याची गरज आहे.