शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

दुर्लक्षित माळीण

By admin | Updated: September 6, 2014 11:05 IST

निसर्गाच्या प्रकोपासमोर कोणाचे काहीही चालत नाही. तरीही अशा घटनेनंतर ‘आताच्या शतकात’ सावरण्याची आपली शक्ती असली पाहिजे. जपानसारख्या

- नागेश केसरी, ज्येष्ठ पत्रकार
 
निसर्गाच्या प्रकोपासमोर कोणाचे काहीही चालत नाही. तरीही अशा घटनेनंतर ‘आताच्या शतकात’ सावरण्याची आपली शक्ती असली पाहिजे. जपानसारख्या राष्ट्राने अनेक नैसर्गिक प्रकोपांनंतर पुन्हा नव्याने राष्ट्रनिर्मिती केली आहे. या अगोदरही महाराष्ट्रात किल्लारी येथे काही वर्षांपूर्वी भूकंपाचा धक्का बसला आणि ते गाव होत्याचे नव्हते झाले, त्यानंतर या वर्षी जुलै महिन्यात आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव जमीनदोस्त झाले. हे दोन्ही प्रकोप राज्याने पाहिले आहेत, पण महाराष्ट्रातील दातृत्ववान उद्योगपतींनी किल्लारीकडे जसे लक्ष दिले, तसे माळीणकडे दिले नाही.
बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांत नेहमी नद्यांना पूर येतो, हिमालयाचे कडे कोसळतात, अनेक गावे नष्ट होतात, वाहूनही जातात. महाराष्ट्रात किल्लारीला भूकंप झाला तेव्हा वर्षभर त्या भागातल्या नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवत होते, प्रशासनाला त्याची जाणीव होती. पण माळीणबाबत अशी कोणतीही पूर्वसंकेत देणारी घटना घडली नाही. डोंगर पायथ्याशी वसलेले लहान गाव, छोटी-मोठी शेती त्यामुळे या गावाची आर्थिक स्थिती मजबूत नव्हती, बहुतेक नागरिक कष्ट करणारे, लहानसहान उद्योग करणारे, त्यामुळे या गावाकडे म्हणावे तसे लक्ष गेले नाही आणि लक्ष देण्याची गरजही भासली नाही. आंबेगावचे लोकप्रतिनिधी दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघातला हा एक भाग, त्यांचे आपल्या मतदारसंघातील गावाकडे जसे लक्ष असते तसेच विकासाच्या दृष्टीने या गावाकडे लक्ष होते. त्यांनी गेल्या महिनाभरापासून माळीणच्या पुनर्वसनाच्या कामाला वेग देण्याचा प्रयत्न केला आहे. 
राज्य सरकारने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या नेत्यांबरोबरच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आदींनी या गावाला भेट दिली. मदतीचे ठोस आश्‍वासनही दिले. केवळ सरकारच्या मदतीवर अवलंबून त्या गावाचा विकास होणे फारसे शक्य नसते याची जाणीव सर्वसंबंधितांना आहे. नैसर्गिकदृष्ट्या सुरेख असलेल्या या गावाकडे दातृत्ववान व्यक्तींनी अद्याप लक्ष दिले नाही, माध्यमानींही या विषयावर लक्ष केंद्रित केले नाही. जवळपास १५0 नागरिक मृत्युमुखी पडले, अनेक जखमी झाले. मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांचे पुनर्वसन, त्यांच्या नातेवाइकांची विचारपूस ही केवळ स्थानिक लोकप्रतिनिधींनी करावी, अशी अपेक्षा ठेवणे फारसे बरोबर नाही. लोकप्रतिनिधींनी ते करावेच आणि ते करतील. पण दातृत्ववान व्यक्तींनीही अशा कामावर लक्ष केंद्रित केले तर या राज्याच्या वैभवात भरच पडणार आहे. नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर आर्थिक मदतीचा ओघ मोठय़ा प्रमाणात येतो, पण त्या प्रमाणात तसा ओघ इकडे आला नाही. विविध पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांनी या गावाकडे लक्ष दिले नाही. पुण्यासारख्या अत्यंत जवळ असलेल्या या गावाचे टुमदार गावात परिवर्तन होणे, स्थानिक नागरिकांना दिलासा देणे, एक चांगले शहर वसविणे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातील दातृत्ववान व्यक्तींना सहज करणे शक्य आहे.
नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घालून दिलेली पद्धत माळीण गावासाठी अनुसरली गेली असती तर महाराष्ट्राला एक वेगळा अनुभव मिळाला असता. पवारांनी किल्लारी भूकंपाच्या वेळी सोलापूर येथे ठाण मांडून किल्लारीचे पुनर्वसन केले. अशीच एखादी महनीय व्यक्ती पुढे आली असती आणि केंद्र व राज्य सरकारने मदतीचा ओघ वाढवला असता तर काम करणार्‍या व्यक्तींची शक्ती दुणावली असती. एक महिना झाला तरी या घटनेचे राज्यातल्या इतर नागरिकांना सातत्याने स्मरण होत नाही. माध्यमांनी अशा घटनाकडे आपला कटाक्ष टाकला किंवा आपली यंत्रणा राबविण्यासाठी संबंधितांना भाग पाडले तर माळीणकरांना खरोखरच दिलासा मिळणार आहे.
दु:खात चार शब्द सांत्वनपर कोणी सांगितले तर दु:ख हलके होण्यासाठी मदत होते, एवढी तर जाणीव दातृत्ववान व्यक्तींनी ठेवावयास हरकत नाही हीच खरी महाराष्ट्रातील संतांची शिकवणूक आहे आणि पुण्याजवळ वाढलेल्या माळीणकरांना त्याची गरज आहे.दुर्लक्षित माळीण
 
नागेश केसरी
ज्येष्ठ पत्रकार
 
 
निसर्गाच्या प्रकोपासमोर कोणाचे काहीही चालत नाही. तरीही अशा घटनेनंतर ‘आताच्या शतकात’ सावरण्याची आपली शक्ती असली पाहिजे. जपानसारख्या राष्ट्राने अनेक नैसर्गिक प्रकोपांनंतर पुन्हा नव्याने राष्ट्रनिर्मिती केली आहे. या अगोदरही महाराष्ट्रात किल्लारी येथे काही वर्षांपूर्वी भूकंपाचा धक्का बसला आणि ते गाव होत्याचे नव्हते झाले, त्यानंतर या वर्षी जुलै महिन्यात आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव जमीनदोस्त झाले. हे दोन्ही प्रकोप राज्याने पाहिले आहेत, पण महाराष्ट्रातील दातृत्ववान उद्योगपतींनी किल्लारीकडे जसे लक्ष दिले, तसे माळीणकडे दिले नाही.
बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांत नेहमी नद्यांना पूर येतो, हिमालयाचे कडे कोसळतात, अनेक गावे नष्ट होतात, वाहूनही जातात. महाराष्ट्रात किल्लारीला भूकंप झाला तेव्हा वर्षभर त्या भागातल्या नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवत होते, प्रशासनाला त्याची जाणीव होती. पण माळीणबाबत अशी कोणतीही पूर्वसंकेत देणारी घटना घडली नाही. डोंगर पायथ्याशी वसलेले लहान गाव, छोटी-मोठी शेती त्यामुळे या गावाची आर्थिक स्थिती मजबूत नव्हती, बहुतेक नागरिक कष्ट करणारे, लहानसहान उद्योग करणारे, त्यामुळे या गावाकडे म्हणावे तसे लक्ष गेले नाही आणि लक्ष देण्याची गरजही भासली नाही. आंबेगावचे लोकप्रतिनिधी दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघातला हा एक भाग, त्यांचे आपल्या मतदारसंघातील गावाकडे जसे लक्ष असते तसेच विकासाच्या दृष्टीने या गावाकडे लक्ष होते. त्यांनी गेल्या महिनाभरापासून माळीणच्या पुनर्वसनाच्या कामाला वेग देण्याचा प्रयत्न केला आहे. 
राज्य सरकारने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या नेत्यांबरोबरच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आदींनी या गावाला भेट दिली. मदतीचे ठोस आश्‍वासनही दिले. केवळ सरकारच्या मदतीवर अवलंबून त्या गावाचा विकास होणे फारसे शक्य नसते याची जाणीव सर्वसंबंधितांना आहे. नैसर्गिकदृष्ट्या सुरेख असलेल्या या गावाकडे दातृत्ववान व्यक्तींनी अद्याप लक्ष दिले नाही, माध्यमानींही या विषयावर लक्ष केंद्रित केले नाही. जवळपास १५0 नागरिक मृत्युमुखी पडले, अनेक जखमी झाले. मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांचे पुनर्वसन, त्यांच्या नातेवाइकांची विचारपूस ही केवळ स्थानिक लोकप्रतिनिधींनी करावी, अशी अपेक्षा ठेवणे फारसे बरोबर नाही. लोकप्रतिनिधींनी ते करावेच आणि ते करतील. पण दातृत्ववान व्यक्तींनीही अशा कामावर लक्ष केंद्रित केले तर या राज्याच्या वैभवात भरच पडणार आहे. नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर आर्थिक मदतीचा ओघ मोठय़ा प्रमाणात येतो, पण त्या प्रमाणात तसा ओघ इकडे आला नाही. विविध पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांनी या गावाकडे लक्ष दिले नाही. पुण्यासारख्या अत्यंत जवळ असलेल्या या गावाचे टुमदार गावात परिवर्तन होणे, स्थानिक नागरिकांना दिलासा देणे, एक चांगले शहर वसविणे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातील दातृत्ववान व्यक्तींना सहज करणे शक्य आहे.
नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घालून दिलेली पद्धत माळीण गावासाठी अनुसरली गेली असती तर महाराष्ट्राला एक वेगळा अनुभव मिळाला असता. पवारांनी किल्लारी भूकंपाच्या वेळी सोलापूर येथे ठाण मांडून किल्लारीचे पुनर्वसन केले. अशीच एखादी महनीय व्यक्ती पुढे आली असती आणि केंद्र व राज्य सरकारने मदतीचा ओघ वाढवला असता तर काम करणार्‍या व्यक्तींची शक्ती दुणावली असती. एक महिना झाला तरी या घटनेचे राज्यातल्या इतर नागरिकांना सातत्याने स्मरण होत नाही. माध्यमांनी अशा घटनाकडे आपला कटाक्ष टाकला किंवा आपली यंत्रणा राबविण्यासाठी संबंधितांना भाग पाडले तर माळीणकरांना खरोखरच दिलासा मिळणार आहे.
दु:खात चार शब्द सांत्वनपर कोणी सांगितले तर दु:ख हलके होण्यासाठी मदत होते, एवढी तर जाणीव दातृत्ववान व्यक्तींनी ठेवावयास हरकत नाही हीच खरी महाराष्ट्रातील संतांची शिकवणूक आहे आणि पुण्याजवळ वाढलेल्या माळीणकरांना त्याची गरज आहे.