शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

इच्छा असेल तर 'बेस्ट' मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 08:18 IST

पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांची महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत योजना यशस्वी करण्यासाठी संपूर्ण देश हातभार लावत आहे. 

- विनायक पात्रुडकरपंतप्रधान नरेंद्र मोंदी यांची महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत योजना यशस्वी करण्यासाठी संपूर्ण देश हातभार लावत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. जनजागृती केली जात आहे. दंडात्मक कारवाई केली जात आहे. सर्वच स्तरावर असे विविध प्रयत्न सुरू असताना बेस्ट प्रशासनात बस गाड्यांचे शौचालय करण्यावरून वाद निर्माण झाला आहे.बेस्टच्या सुमारे अकराशे बस भंगारात निघणार आहेत. या गाड्या भंगारात काढण्याऐवजी त्याचे शौचालय करावे व शहरातील विविध भागात या गाड्या उभ्या कराव्यात, अशी मागणी काही नगरसेवकांनी केली आहे. हा मुद्दा काही नगरसेवकांनी प्रतिष्ठेचा केला आहे. बेस्ट बस मुंबईची ओळख आहे. जागतिकस्तरावर या गाड्यांची वेगळी ओळख आहे. अशा गाड्यांचे शौचालय करणे योग्य नाही, असे सांगत काही नगरसेवकांनी याला विरोध केला आहे. मुंबईत सर्वच ठिकाणी सावर्जनिक शौचालय नाहीत. मधुमेह रुग्णांची संख्या वाढत आहे. किमान त्यांच्यासाठी तरी बस गाड्यांचे शौचालय करा, असे काही नगरसेवकांचे म्हणणे आहे. या म्हणण्याचा विचार व्हायला हवा. बेस्टची ओळख टिकून राहावी याबाबत कोणाचे दुमत असू शकणार नाही. बस भंगारात काढून ही प्रतिष्ठा टिकून राहील, असा दावा करणेदेखील चुकीचे आहे. गेल्यावर्षी ६०० बस भंगारात काढल्या, आता ११०० बस भंगारात काढण्याचा प्रस्ताव आहे. भंगारात निघणाऱ्या गाड्यांचा सदुपयोग झाला तर, त्याला कोणाचाच विरोध नसेल. बेस्ट बसचा रंग बदलणे शक्य आहे. रंग बदलून या गाड्यांचा शौचालय म्हणून वापर होऊ शकतो. किंवा अन्य कोणता तरी मार्ग शोधला जाऊ शकतो. मधुमेह रुग्णांसह महिलांना सावर्जनिक शौचालयाची नितांत आवश्यकता असते. पुरुष आडोसा बघून नैसर्गिक विधी उरकू शकतो. तसे महिलांना करता येत नाही. शौचालय कोठे आहे, असे विचारणेही महिलांना जमत नाही. असे असताना शौचालयाला नकार देणे योग्य नाही. काळानुसार बदल घडणे आवश्यक आहे. जनहिताचे बदल तर निश्चितच व्हायला हवे. प्रत्येक वेळी तडजोड करण्याची आवश्यकता नसते. पण मार्ग शोधायला हवा. तंत्रज्ञान ऐवढे पुढे गेले आहे की कोणतीच गोष्ट अशक्य नाही. असे असताना बेस्ट बसचे शौचालय करताना व्यापक जनहिताचा विचार व्हायला हवा. रुग्ण, महिलांना योग्य त्या सुविधा देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, ही जबाबदारी तरी प्रशासनाने लक्षात ठेवायला हवी.(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत कार्यकारी संपादक आहेत.)

टॅग्स :BESTबेस्ट