शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

‘कॉम्प्युटर इंजिनिअरिंग’ नाही मिळाले, तर आभाळ कोसळेल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 06:58 IST

ज्यांना सीईटीमध्ये कमी पर्सेंटाइल आहे, असे विद्यार्थी आणि त्यांचे पालक सध्या प्रचंड काळजीत आहेत! त्यांच्यासमोर असलेल्या पर्यायांची यादी...

प्रा. डॉ. संदीप ताटेवार, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावतीप्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 'सामाईक प्रवेश परीक्षा’ कक्षामार्फत महाराष्ट्रात  सुरू झाली आहे व प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या अनुषंगाने पालकांची प्रवेशासाठी झुंबड उडाली आहे. या वर्षी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी), आर्टिफिशल इंटेलिजन्स ॲण्ड मशीन लर्निंग, आर्टिफिशल इंटेलिजन्स ॲण्ड डेटा सायन्स, कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड डिझाईन या शाखांसाठी विद्यार्थ्यांचा सर्वात जास्त कल असून, याच शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी जीवापाड प्रयत्न करीत असल्याचे सर्वत्र चित्र आहे. नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात या शाखांचा कट-ऑफ सर्वाधिक (९० पेक्षा जास्त पर्सेंटाइल) असल्याचे दिसून येत आहे. सध्या सर्वच क्षेत्रात डिजिटायझेशनला असणारे प्राधान्य लक्षात घेता कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये जास्त नोकऱ्या उपलब्ध होत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना सर्वसाधारण किंवा कमी गुण आहेत त्यांचे पालक  आता आपल्या मुलांचे कसे होईल? - अशा अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत आहेत. काही पालकांनी  सीईटीचा निकाल लागण्याआधीच विनाअनुदानित महाविद्यालयात संपर्क साधून मॅनेजमेंट  कोट्यात आपला प्रवेश याच शाखेत निश्चित केल्याचे कळते आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एकूण जवळपास ४४० अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. प्रत्येक महाविद्यालयात जवळपास कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व तत्सम शाखा उपलब्ध आहेत. अभियांत्रिकी प्रक्रियेमध्ये प्रवेशाच्या तीन फेरी होणार आहेत. प्रत्येक फेरीमध्ये आपल्या पसंतीची शाखा व महाविद्यालय मिळण्याची शक्यता बरीच वाढत जाणार आहे.  आजच्या घडीला जरी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेला जास्त मागणी असली तरी भविष्यात काय स्थिती राहील याची भविष्यवाणी आज आपण करू शकत नाही. सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकीच्या मूळ शाखा असून यावरच बांधकाम उद्योग, दूरसंचारण व्यवस्था, यंत्र कारखाने, विद्युत निर्मिती व संचारण या सारख्या महत्त्वाच्या गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे या शाखेतील अभियंत्यांची गरज नेहमीच भासणार आहे.लॉकडाऊन नंतर ही क्षेत्रे म्हणावी तितकी स्थिरावलेली नाही. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांमधील नोकरी भरतीत आज सातत्य नसल्याचे दिसून येत आहे; पण हीच परिस्थिती भविष्यात राहणार नाही.  या क्षेत्रातील अभियंत्यांना काही विशेष फायदे आहेत.  स्वत:चा व्यवसाय कमी भांडवलात व छोट्या गावात चालू करता येऊ शकतो, परदेशातच किंवा महानगरातच नोकरी अथवा व्यवसायासाठी स्थायिक होण्याची गरज नसते, शासकीय नोकऱ्यांमध्ये स्पर्धात्मक अभियांत्रिकी परीक्षा देऊन सरळ भरतीने उच्च पदे मिळविण्याची संधीही असते. आजकाल या शाखेतील विद्यार्थ्यांनासुद्धा महाविद्यालयातील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलद्वारे संगणक क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध होत आहेत. या शाखेतील विद्यार्थीसुद्धा संगणक क्षेत्रातील कमी कालावधीचे आवश्यक अभ्यासक्रम करून संगणक क्षेत्रात चांगल्या नोकऱ्या मिळवताना दिसतात.त्यामुळे फक्त कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेतच प्रवेश मिळाला नाही तर आभाळ कोसळणार आहे ही धारणा ठेवून निराश होण्यात काहीही अर्थ नाही. यावर्षी कमी पर्सेंटाईल असले तरी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व तत्सम शाखेच्या तुलनेत इतर शाखेत चांगल्या महाविद्यालयात  प्रवेश मिळणार आहे.sandiptatewar123@gmail.com

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा