शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास अधिक ऊर्जाबचत शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 04:39 IST

सन १९६९ मध्ये सॅन फ्रान्सिस्कोमधील युनेस्को परिषदेत २२ एप्रिल १९७0 रोजी जागतिक पृथ्वी दिवस स्थापित करण्यात आला.

- डॉ. दीपक शिकारपूरसन १९६९ मध्ये सॅन फ्रान्सिस्कोमधील युनेस्को परिषदेत २२ एप्रिल १९७0 रोजी जागतिक पृथ्वी दिवस स्थापित करण्यात आला. शांती कार्यकर्ते जॉन मॅककोनेल यांनी पृथ्वीच्या सन्मानासाठी ही संकल्पना मांडली होती. पर्यावरणाचे बिघडते तालचक्र पृथ्वीच्या काही विशिष्ट भागापुरते मर्यादित राहणार नसून आज ना उद्या सर्वत्र पसरणार आहे. निसर्गाच्या जीवावर उधळपट्टी करणाऱ्या देशांनाही या बाबीची जाणीव होते आहे आणि तेथेही पर्यावरण जतनाची चळवळ जोर पकडते आहे. इथेच आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला खूप मदत करू शकते.औद्योगिक जगाच्या एकूण वीजवापरापैकी ४२ टक्के वापर आयटी आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्राकडून केला जातो. नव्या उत्पादन तंत्रांमुळे संगणक व इतर साधनांच्या (पेरिफेरल्स) किमती झपाट्याने कमी होत आहेत. परंतु ऊर्जेवर करावा लागणारा खर्च वाढतो आहे. कळत नकळत आपणापैकी प्रत्येक जण, या ना त्या प्रकारे, दररोज बरीच ऊर्जा आणि स्रोत वाया घालवत असतो. संगणक क्षेत्रातील पर्यावरण जतनाचे खरे काम सुरू होते पायाभूत गोष्टींपासून; सर्व्हर्स, सॉफ्टवेअर आणि विविध हार्डवेअर्सच्या पातळीपासून. संगणकाकडून खाल्ल्या जाणाºया विजेचा मोठा हिस्सा रंगीत मॉनिटर वापरीत असतो. सध्या विविध कारणांसाठी मोठ्या स्क्रीनचे टीव्ही आणि मॉनिटर्स वापरण्याची प्रथा पडते आहे. अशा वेळी त्यांच्या वीजवापराचा विचार सर्वांनीच करणे आवश्यक आहे.जगभरातील हजारो डेटा सेंटर्समधले लाखो सर्व्हर्स अहोरात्र चालू असतात. ते वीज वापरतात व काम करताना भरपूर उष्णता बाहेर टाकतात. बºयाच सर्व्हर्सना ‘एसी’ उर्फ वातानुकूलन लागते. डेटा सेंटर चालवण्याच्या एकूण खर्चापैकी ५0 टक्क्यांपेक्षाही अधिक रक्कम निव्वळ वीजबिलावर खर्च होते असा अंदाज आहे. या सर्व प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जाबचत होऊ शकते. उपलब्ध असलेलेच स्रोत आणि संसाधने वापरून जास्तीत जास्त माहिती कार्यक्षमतेने साठवण्याचे हे आव्हान पेलण्यासाठी डेटाचा सर्वाधिक महत्त्वाचा भाग ‘मिरर्ड डबल डिस्क’वर साठवणे आणि त्याचा बॅकअप उच्च क्षमतेच्या ड्राइव्हवर घेणे यांसारखे उपायदेखील करता येतात. त्यामुळे जागा वाचते (८0 टक्क्यांनी), साठवणूक क्षमता वाढते (३५ ते ८0 टक्क्यांनी), व्यावसायिक कामगिरी सुधारते आणि (ड्राइव्हजची संख्याच कमी झाल्याने) विजेचे बिल निम्मेच येते! ही बाब प्रकर्षाने ध्यानात घ्यायला हवी.

थोडक्यात काय, वापरात असलेल्या प्रक्रिया आणि कार्यपद्धतींचे जरा तिरक्या नजरेने पुनर्परीक्षण केले की माहिती साठवण्याचे काम जास्त कार्यक्षमतेने करता येईल. प्रत्येकाने ऊर्जाबचत आणि पर्यावरण रक्षणातला आपला खारीचा वाटा निभावणे आता क्र मप्राप्त आहे. त्यासाठीचे काही उपाय सर्वांनाच योजता येतील. थोडीशी सतर्कता आणि अवधान बाळगले तर आपण मोठ्या प्रमाणावर वीज वाचवू शकतो. म्हणून सर्वांनी पुढील खबरदारी घेतली पाहिजे. गरज नसताना दिवे, पंखे, संगणकीय व इतर उपकरणे चालू ठेवू नका. भरपूर वीज वापरणारी उपकरणे (मोठे टीव्ही संच, ओव्हन इ.) बराच वेळ वापरायची नसल्यास निव्वळ रिमोटने बंद न करता भिंतीतील प्लगपासूनच बंद करा. शक्य तितक्या आधुनिक व ऊर्जा-कार्यक्षम संगणक व संगणकीय प्रणालींचा वापर करा. तत्कालिक फॅशन व लाटांच्या मागे लागून सतत उपकरणे (गॅजेट्स) बदलत राहू नका. आपण नाहक टाकून दिलेल्या वस्तूंमुळे किती प्रदूषण होईल हे आधी समजून घ्या. संगणकाच्या ‘कंट्रोल पॅनेल’मध्ये ‘पॉवर आॅप्शन्स’ किंवा ‘पॉवर मॅनेजमेंट’ अशा अर्थाचे एक प्रतीकचिन्ह (आयकॉन) आपणास आढळेल. त्यावर क्लिक केल्याने, संगणक वापरात नसताना करण्याचे, ऊर्जाबचतीचे असे लहानसहान विविध उपाय आपणास दिसतील. किरकोळ उपाय म्हणून त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. अशा उपायांचा वापर आवर्जून केला गेला तर मोठ्या प्रमाणावर ऊर्जाबचत होऊ शकते. ते समजून घ्यायला हवे.
संगणकाच्या स्क्रीनवर उर्फ ‘डेस्कटॉप’वर मोठे (म्हणजे जास्त एमबी किंवा जीबीचे) जॉब्ज, अ‍ॅप्स, ग्राफिक्स वा चित्रपट थेट ठेवू नका. डेस्कटॉप असा ‘वजनी’ असला की संगणक सुरू होण्यास जास्त वेळ लागतो. इंटरनेटचा सकारात्मक वापर करून आपणास ऊर्जाबचत व पर्यावरण रक्षणासंबंधीचे अधिक ज्ञान मिळवता येईल व शंका समाधानही करून घेता येईल. ई-कचºयाबाबत जागरूक राहा, त्यासंबंधी इतरांमध्ये विशेषत: शालेय विद्यार्थी आणि युवावर्गामध्ये प्रसार करा.( संगणक साक्षरता प्रसारक)

टॅग्स :electricityवीज