शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

महिला आरक्षणाचा नव्याने एल्गार, मंजूर झाल्यास नवा अध्यायच होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 05:36 IST

सव्वाशे कोटीवर लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात जेथे ५० टक्के महिला आहेत पण १६ व्या लोकसभेत केवळ ६२ महिला निवडून आल्या आणि ही संख्या एकूण सदस्यांच्या अवघी ११ टक्के आहे.

सव्वाशे कोटीवर लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात जेथे ५० टक्के महिला आहेत पण १६ व्या लोकसभेत केवळ ६२ महिला निवडून आल्या आणि ही संख्या एकूण सदस्यांच्या अवघी ११ टक्के आहे. आमचे राजकीय पुढारी महिला सबलीकरण आणि त्यांच्या अधिकारांबाबत किती ‘सकारात्मक’ विचार करतात हे या आकड्यांवरून अधोरेखित होते.काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून लोकसभेतील बहुमताचा लाभ घेत बहुप्रतीक्षित महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर करून घेण्याचा आग्रह धरला आहे. त्यांच्या या पत्रामुळे महिला आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लोकसभा व राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी एकतृतीयांश जागा राखीव ठेवण्याची तरतूद असलेले १०८ वे घटना दुरुस्ती विधेयक २०१० साली राज्यसभेने मंजूर केले होते. परंतु बहुमताअभावी ते लोकसभेत अडकले.विशेष म्हणजे त्यावेळी भाजपाने या विधेयकाला पाठिंबा दिला होता आणि २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीतील आपल्या जाहीरनाम्यातही महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याबाबत कटिबद्धता जाहीर केली होती. सोनिया गांधी यांनी या पत्राद्वारे कदाचित त्याचीच आठवण करून दिली असावी. भाजपाला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न असल्याचा अर्थ यातून काढला जाऊ शकतो. पण सोनियाजींच्या या सकारात्मक पावलाने महिला आरक्षणासाठी पुन्हा एकदा अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. अशात मोदींनी त्यांना योग्य प्रतिसाद दिला तर देशाच्या इतिहासात आणखी एक सोनेरी पान लिहिले जाऊ शकते. अर्थात या दोघांची इच्छा आहे म्हणून सहजासहजी हे घडेल असेही नाही. यासाठी भाजपातील इतर नेत्यांसोबतच विविध पक्षांचीही साथ असावी लागणार आहे. परंतु दुर्दैवाने एरवी महिला सबलीकरणावर लांबलचक भाषणे ठोकणारे अनेक राजकीय पुढारी वेळ आली की महिलांच्या आरक्षणाला किती तीव्र विरोध करतात याचा अनुभव संसदेने आणि या देशातील जनतेनेही यापूर्वी घेतला आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्षांची तात्त्विक सहमती असतानाही त्यांचे पुरुष नेतृत्व महिलांसाठी आपल्या जागा सोडायला तयार नाही, हे वास्तव आहे. अन्यथा हे विधेयक २० वर्षांपासून लटकून राहण्याचे काही कारण नव्हते.आताही मोदी सरकारला सत्तेत येऊन तीन वर्षे झालीत. पण या काळात महिला आरक्षण विधेयकावर कुठलीही चर्चा झाली नाही. या देशातील महिलांना समान मताधिकार प्राप्त करून घेण्यासाठीही फार मोठा संघर्ष करावा लागला होता. आता तो प्रतिनिधित्वासाठी करावा लागतोय. स्वातंत्र्यानंतर पहिल्या लोकसभेपासून आतापर्यंत महिलांचे प्रतिनिधित्व वाढले असले तरी ते फारच अत्यल्प अणि संथगतीने आहे. १९५२ साली हे प्रमाण ४.५० टक्के होते आणि २०१४ मध्ये ते ११ टक्के आहे. जागतिक क्रमवारीतही आपण १४९ व्या क्रमांकावर फेकले गेले आहोत.जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या या देशाच्या संसदेत महिलांना समान प्रतिनिधित्व मिळू शकले नाही हे दुर्दैवच म्हणायचे. या देशाची विद्यमान लोकसभा अध्यक्ष महिला आहे. एवढेच नाहीतर देशात प्रथमच सरकारमध्ये संरक्षण आणि परराष्टÑ मंत्रालयासह सहा महत्त्वाची मंत्रालये महिला सांभाळत आहेत. अशात महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यास महिला सबलीकरणाचा नवा अध्यायच लिहिला जाईल.