शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

आदर्श लोकोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:25 IST

गणेशोत्सवाला लोकोत्सवाचे रूप देण्यासाठी प्रशासनासोबतच स्वयंसेवी व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आणि त्याचे दृश्य परिणाम दिसून आले.

गणेशोत्सवाला लोकोत्सवाचे रूप देण्यासाठी प्रशासनासोबतच स्वयंसेवी व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आणि त्याचे दृश्य परिणाम दिसून आले. शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था कायम राहिली, पण त्यासोबतच स्वच्छता व सौंदर्य प्राप्त झाले.गणेशोत्सव हा लोकोत्सव बनावा, ही अपेक्षा या उत्सवाच्या शताब्दीमध्ये पूर्णत्वाला गेल्याचा आनंद आहे. अलीकडे सण-उत्सव म्हटला की, प्रशासनावर ताण येतो. कायदा व सुव्यवस्था राखणे हे मोठे आव्हान असते. केवळ शांतता समितीच्या बैठका घेऊन सण शांततेत साजरे होतील, ही शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे काही प्रशासकीय अधिका-यांनी वेगळी वाट चोखाळत या उत्सवात स्वत: सक्रिय सहभाग घेतला तसेच लोकसहभाग मोठ्या प्रमाणात वाढविला. त्याचे दृश्य परिणाम खान्देशात दिसून आले. किरकोळ अपवाद वगळता बकरी ईद आणि गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरे झाले.नंदूरबार जिल्ह्यात या उत्सवाला यंदा नोव्हेंबरमध्ये होणाºया पालिका निवडणुकांची पार्श्वभूमी होती. नंदुरबार, नवापूर आणि तळोदा या शहरात सर्वपक्षीय इच्छुकांनी गणेशोत्सव धडाक्यात साजरा केला. मोठ्या वर्गणीमुळे उत्सवामध्ये रंगत आली आणि कार्यकर्तेदेखील सुखावले. नंदुरबार शहरात वर्षभरात झालेल्या दंगलीच्या दोन-तीन घटनांमुळे चिंतेचे सावट होते. राज्य सरकारनेदेखील त्याची दखल घेत गणेशोत्सवाच्या तोंडावर जिल्हा पोलीस अधीक्षकांची बदली करून संजय पाटील या खान्देशपुत्राला पाठविले. त्यांनी परिस्थिती कुशलतेने हाताळली. तशीच अवस्था धुळ्यात होती. कुख्यात गुंड गुड्ड्याच्या खुनाचे सावट अजून कायम आहे. एक-दोन आरोपी फरार असल्याने पोलीस दलावर ताण कायम आहे. या प्रकरणावरून राजकीय धुळवड कायम असताना प्रशासनाने त्याचा परिणाम गणेशोत्सवावर होऊ दिला नाही.जळगावात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर व पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी सकारात्मक भूमिका घेत गणेशोत्सव महामंडळ, स्वयंसेवी व सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते यांच्याशी सुसंवाद साधत गणेशोत्सवाला लोकोत्सवाचे रूप दिले. जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्याकडे महापालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त प्रभार असल्याने त्यांनी कायदा व सुव्यवस्थेसोबतच स्वच्छता मोहिमेची जोड दिली. गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाºयांसोबत वेळोवेळी बैठका घेऊन अडचणी समजून घेतल्या. वेळेपूर्वी एक खिडकी योजना सुरू करून सर्व परवानगी तात्काळ देण्यात आल्या. हद्दपारी व प्रतिबंधात्मक नोटिसा हे हत्यार आवश्यक त्या व्यक्तींविरुध्दच वापरण्यात आले. विसर्जन मार्ग, अतिक्रमणे यासंबंधी महामंडळ कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर उतरून समस्या जाणून घेतली आणि तातडीने उपाययोजना केल्या. त्याचा परिणाम असा झाला की, गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी, अडचणी उरल्या नाहीत. त्यापाठोपाठ प्रशासनाने स्वच्छता मोहिमेमध्ये स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, युवक मंडळे यांना सहभागी करून घेतले. स्थापनेनंतर विक्री केंद्रांजवळ पडलेला कचरा दुसºया दिवशी सकाळी उचलून घेण्यात आला. त्यात चक्क मूर्तीविक्रेत्यांनी सहभाग दिला. दीड, तीन, पाच व सात दिवसांच्या मूर्ती विसर्जनानंतर मेहरुण तलावाजवळ निर्माल्य अस्ताव्यस्त पडले होते. तेथे सफाई मोहीम राबविण्यात आली. १२ व्या दिवसाच्या विसर्जनानंतर शाळकरी मुले, महाविद्यालयीन तरुणांच्या सहकार्याने पुन्हा एकदा तलाव आणि शहरातील विसर्जन मार्ग पूर्ववत करण्यात आला. एवढ्या मोठ्या संख्येने जळगावकर स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्याचे हे पहिले उदाहरण ठरले.१९८० च्या दंगलीनंतर जळगावातील गणेशोत्सवाचा उत्साह ओसरला होता. दंगलीची भीती आणि पोलीस दलाचे कारवाईचे भूत मानगुटीवर असल्याने तरुणांचा सहभाग कमी झाला होता. सुसंस्कृत आणि निकोप वातावरणासाठी हे योग्य नाही, असे समाजमनाला जाणवत होते. प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ आणि तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते डॉ.अविनाश आचार्य यांनी पुढाकार घेऊन एक चमू तयार केली आणि रस्त्यावर उतरून समाजात विश्वास आणि उत्साह पुन्हा निर्माण केला. तो उत्साह अजूनही कायम असून प्रशासनाच्या पुढाकाराने त्याला विधायक वळण देण्यात आले, हे यंदाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. सज्जनशक्ती सक्रिय झाल्यास बदल निश्चित होणार, हा विश्वास निर्माण झाला.- मिलिंद कुलकर्णी

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव