शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
3
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
4
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
5
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
6
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
7
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
8
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
9
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
10
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
11
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
12
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
13
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
14
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
15
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
16
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
17
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
18
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
19
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
20
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

नव्या सरकारकडून हवा राज्यहिताचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 06:10 IST

राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल काहींना अपेक्षित, तर बऱ्याच जणांना अनपेक्षित असा लागला आहे.

- अ‍ॅड. उज्ज्वल निकमराज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल काहींना अपेक्षित, तर बऱ्याच जणांना अनपेक्षित असा लागला आहे. जागांच्या आकडेवारीत फरक झाला असला आणि अनेकांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला असला तरी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या हातातच पुन्हा एकदा सत्तेची किल्ली आलेली आहे. ‘तुझं-माझं जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना’ या उक्तीप्रमाणे या दोन्हीही पक्षांचं राजकारण गेल्या पाच वर्षांत पाहायला मिळालं असलं तरी आता येणाºया काळात नव्यानं सत्तेत आल्यानंतर दोन्हीही पक्षांना पक्षहितापलीकडे जाऊन राज्याचं हित लक्षात घेऊन वाटचाल करावी लागणार आहे. राजकीय पक्ष म्हणून एकमेकांच्या महत्त्वाकांक्षा वेगवेगळ्या असतीलही; पण त्यापेक्षा जनहिताला प्राधान्य द्यावं लागेल.

मागील काळात सत्तेत एकत्र असूनही या दोन्हीही पक्षांकडून परस्परांवर टीकाटिप्पणी मोठ्या प्रमाणावर केली गेल्याचे जनतेने पाहिले आहे. आगामी काळात या टीकेपेक्षा राज्याचा विकास केंद्रस्थानी ठेवून त्यादृष्टीने आवश्यक उपाययोजनांना गती देण्यासाठी दोन्ही पक्षांनी विचारमंथन करून कृती करायला हवी. विशेषत:, राज्यामध्ये असलेला बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी उद्योगधंदे वाढीला लागले पाहिजेत. कोणताही उद्योजक कोणत्याही राज्यात गुंतवणूक करताना त्या राज्यात राजकीय आणि सामाजिक स्थैर्य आहे का याचा विचार करत असतो. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी सत्तेत आल्यानंतर आमच्यामध्ये एकवाक्यता आहे, दोघांचेही ध्येय एक आहे, उद्दिष्ट एक आहे, विचार एक आहे हे प्रत्यक्ष कृतीतून दिसून आले पाहिजे. यासाठी दोन्हीही पक्षांना आचारसंहितादेखील ठरवावी लागेल आणि तिचे पालन करावे लागेल. यासाठी समजूतदारपणा दाखवावा लागेल.

निकालांनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे एक्झिट पोलचे काहीही म्हणणे असले तरी जनतेच्या मनात वेगळे होते. पण एक गोष्ट चांगली घडली की वाहणाºया वाºयाला भुलून आयत्या वेळी कुंपणावरून उडी मारणाºया बहुतांश नेत्यांना जनतेने धुडकावून लावले आहे.विशेषत:, एकदा निवडून आल्यानंतरही काही महिन्यांतच त्या पक्षाला रामराम करून पुन्हा निवडणुकीची वेळ आणणाऱ्यांनाही जनतेने योग्य तो संदेश दिला आहे. एक निवडणूक पार पडण्यासाठी सरकारचा बराच पैसा खर्च होत असतो. त्यासाठी बरीच यंत्रणा कामाला लागत असते. हा सर्व खर्च जनतेकडून कररूपातून गोळा केलेल्या पैशातूनच होत असतो. असे असताना केवळ एखाद्या नेत्याच्या निर्णयामुळे पुन्हा निवडणूक लादली जात असेल तर ते योग्य नसून त्यासंदर्भात काही मार्गदर्शक तत्त्वे किंवा कायदेशीर धोरणे ठरवण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स अ‍ॅक्ट अर्थात लोकप्रतिनिधी कायद्यानुसार निवडून येणाºया लोकप्रतिनिधीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. पण हा कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वीच म्हणजे साधारण तीन वर्षांच्या आत जर एखादा उमेदवार संधीसाधू राजकारणासाठी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पक्ष बदलून पुन्हा रिंगणात उतरत असेल तर त्याच्याकडून होणाºया पोटनिवडणुकीचा संपूर्ण खर्च वसूल केला जाणे आवश्यक आहे. यासाठी कायद्यात तरतूद करावी लागेल. जेणेकरून करदात्यांच्या पैशाचा अपव्यय टाळला जाईल आणि स्वत:विषयी असलेल्या अहंकाराला धक्का देता येईल. तसेच हा सामाजिक स्वरूपाचा गंभीर गुन्हा का मानला जाऊ नये, असा प्रश्न कुणी विचारला तर तो गैरलागू म्हणता येणार नाही.

रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स अ‍ॅक्ट अर्थात लोकप्रतिनिधी कायद्यानुसार निवडून येणाºया लोकप्रतिनिधीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. पण हा कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वीच साधारण तीन वर्षांच्या आत जर एखादा उमेदवार संधीसाधू राजकारणासाठी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पक्ष बदलून पुन्हा रिंगणात उतरत असेल तर त्याच्याकडून होणाºया पोटनिवडणुकीचा संपूर्ण खर्च वसूल केला जाणे आवश्यक आहे. (लेखक विशेष सरकारी वकील आहेत.) 

टॅग्स :BJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019