शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

मानवतेला काळीमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 13:03 IST

मिलिंद कुलकर्णीपुरोगामी महाराष्टÑाला काळीमा फासणारी घटना जळगाव जिल्ह्यातील वाकडी या गावात घडली. विहिरीत पोहले या क्षुल्लक कारणावरुन मातंग समाजातील दोन तरुणांना नग्न करुन बेदम मारहाणीसह गावातून धिंड काढण्याचा अघोरी प्रकार करण्यात आला. या घटनेमुळे महाराष्टÑाच्या ग्रामीण भागात अद्यापही जातीपातीचे विष, आर्थिक स्थिती, शेतजमीन, विहिरींची मालकी यासंबंधी वर्चस्वाची भावना किती खोलवर ...

मिलिंद कुलकर्णीपुरोगामी महाराष्टÑाला काळीमा फासणारी घटना जळगाव जिल्ह्यातील वाकडी या गावात घडली. विहिरीत पोहले या क्षुल्लक कारणावरुन मातंग समाजातील दोन तरुणांना नग्न करुन बेदम मारहाणीसह गावातून धिंड काढण्याचा अघोरी प्रकार करण्यात आला. या घटनेमुळे महाराष्टÑाच्या ग्रामीण भागात अद्यापही जातीपातीचे विष, आर्थिक स्थिती, शेतजमीन, विहिरींची मालकी यासंबंधी वर्चस्वाची भावना किती खोलवर रुजलेली आहे, हे अधोरेखित होते. जग एकविसाव्या शतकात पोहोचले आहे; माहिती-तंत्रज्ञानाने क्रांती केली आहे, असे म्हणत असताना आमच्या मनातून जात, श्रेष्ठ-कनिष्ठतेचे भेद जात नाही. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांना आदर्श मानणाऱ्या आणि संविधानानुसार चालणाºया या देशात अशा घटनांचे प्रमाण वाढणे सामाजिकदृष्टया निरोगी नसल्याचे लक्षण आहे. ‘सबका साथ सबका विकास’ हा मूलमंत्र जपून सरकार काम करीत असेल तर त्याचे परिणाम ग्रामीण भागात असे का दिसतात, याचाही विचार करण्याची वेळ आली आहे. समाजातील शोषित, पीडित, वंचित घटकांना विकासाची समान संधी मिळत असल्याचा दावा शासन आणि प्रशासन करीत असले तरी ग्रामीण महाराष्टÑातील भयावह स्थितीचे दर्शन या घटनेने घडविले आहे. स्पृश्यास्पृश्यतेचा भेद मिटविण्यासाठी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी यांच्यासारख्या महात्म्यांनी प्रयत्न केले. देशाला समतेचा संदेश देण्यात महाराष्टÑ अग्रभागी असल्याचा अभिमान आम्ही बाळगत असताना अशा घटना ही काळाची चक्र उलटे फिरविण्याचा काही शक्तींचा प्रयत्न असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. वाकडीसारख्या छोट्या गावात भयंकर प्रकार घडूनही तीन दिवस त्याची वाच्यता होऊ नये, यावरुन त्याठिकाणी किती दहशतीत पीडित कुटुंब राहत असेल त्याची कल्पना येते. विहिरीत पोहण्यास मज्जाव केल्यानंतरही ते पोहल्याबद्दल जाब विचारताना त्यांना नग्न करुन मारहाण केली जात असताना त्याचा व्हीडिओ बनविणे, त्यात या तरुणांना हीन लेखणारी उद्दाम भाषा वापरणे यावरुन ही प्रवृत्ती किती बेमुर्वतखोर, आढ्यताखोर, वर्चस्ववादी आहे हे ठळकपणे जाणवते. अशा प्रवृत्तींना कठोर शिक्षा व्हायला हवी, तरच अशा प्रकारांना पायबंद बसू शकेल. मंत्री, शासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या आलेल्या प्रतिक्रियांमधून या घटनेविषयी संताप व्यक्त झाला. तो रास्त आहे. पण केवळ तेथे न थांबता अशी हिंमत समाजातील कुठलाही घटक करणार नाही, अशा पध्दतीने गावपातळीवर प्रशासकीय यंत्रणा मजबूत करण्याची आवश्यकता आहे. रविवारी घटना घडल्यानंतर तेथील पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी या शासकीय घटकांनी तीन दिवस ही घटना दडपून ठेवली, असाच याचा अर्थ आहे. हे कच्चे दुवे हेरुन ते मजबूत करण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव