शहरं
Join us  
Trending Stories
1
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
2
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
3
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
4
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
5
Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं गाडीत बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
6
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
7
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
8
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
9
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
10
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
11
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
12
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
13
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
14
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
15
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
16
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
17
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
18
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
19
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
20
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
Daily Top 2Weekly Top 5

'सुपर ३०' विद्यार्थी कसे घडतील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 21:24 IST

महाराष्ट्र शासनाने सुपर ३० विद्यार्थ्यांची संकल्पना मांडली होती. तशा आशयाची योजना १९६६ मध्ये सुरू झाली होती.

- धर्मराज हल्लाळे सिनेअभिनेता ऋतिक रोशन याची मुख्य भूमिका असलेला सुपर ३० सिनेमा सध्या गाजत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिकलेला विद्यार्थी एक उत्कृष्ट शिक्षक बनतो. आपल्या गतकाळाची जाणीव ठेवून मुलांना घडवतो. ही सत्य घटना घडण्याच्या कितीतरी वर्षे आधी महाराष्ट्र शासनाने सुपर ३० विद्यार्थ्यांची संकल्पना मांडली होती. अर्थातच त्याचे नाव सुपर ३० नव्हते. मात्र त्याच आशयाची योजना १९६६ मध्ये सुरू झाली होती.ग्रामीण भागातील, कष्टकरी पालकांच्या मुलांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे, या उदात्त हेतूने तत्कालीन शिक्षणमंत्री डॉ. मधुकरराव चौधरी यांनी १९६६ मध्ये शासकीय विद्यानिकेतने सुरू केली. ज्यामध्ये ग्रामीण भागातील मुलांना प्रवेश देण्यात आला. सुरुवातीला ही विद्यालये इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी वर्गापर्यंत होती. नंतर शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी वर्गात घेतल्याने आता इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतचे शिक्षण मोफत मिळते. तरीही राज्यातील सर्व विद्यानिकेतनमधील ५० टक्के जागा रिक्त आहेत. दर्जेदार शिक्षण देऊन गुणवान ३० विद्यार्थी निवडणाऱ्या एका उत्तम शिक्षण प्रणालीची झालेली दुरवस्था कशामुळे आहे, हे तपासले पाहिजे. महाराष्ट्रामध्ये अमरावती, औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर या पाच विभागांमध्ये एकूण पाच विद्यानिकेतने आहेत. मात्र आज रोजी निवड होऊनसुद्धा हुशार विद्यार्थी विद्यानिकेतनमध्ये प्रवेश घेण्यास का नकार देत आहेत, हा मोठा प्रश्न आहे. शासनाने प्रत्येक विद्याथ्यार्मागे दर महिन्याला ५०० रुपयांचे अनुदान निर्धारित केलेले आहे, जे की वर्षानुवर्षे वाढलेले नाही. तुटपुंजा अनुदानात निवास, भोजन व इतर खर्च कसा भागवायचा, हा विद्यानिकेतनसमोरचा प्रश्न आहे.१९६६ मध्ये ही विद्यानिकेतन जेव्हा सुरू झाली, तेव्हा शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी प्राचार्य पदे भूषविली. आजही विद्यानिकेतनचे प्राचार्य पद हे वर्ग १ चे आहे. शिवाय इतर जी जितकी मंजूर पदे आहेत, तीही भरली जात नाहीत. विद्यानिकेतनमध्ये आजवर दर्जेदार शिक्षण मिळाले आहे. पहाटे साडेपाच ते रात्री नऊ वाजेपर्यंतचे वेळापत्रक असते. मोफत आरोग्य सुविधा मिळतात. वर्षातून एकदा सहल निघते. परंतु आज या मोफत सुविधा घ्यायला विद्यार्थी का तयार नाहीत, हा प्रश्न आहे. सध्या ३० विद्यार्थ्यांबरोबर आणखी १० विद्यार्थी आदिवासी भागातील घ्यायचे आहेत. ज्यामुळे प्रत्येक वर्गामध्ये ४० याप्रमाणे एका विद्यानिकेतनमध्ये २०० विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचे असतात. इतकी मर्यादित संख्या, त्यासाठी उत्तम सुविधा आणि त्यातून अपेक्षित असणारी गुणवत्ता हे शाळा स्थापनेमागचे विशेष सूत्र आहे.  आता या विद्यानिकेतनांना पुनर्जीवित करायचे असेल तर सरकारने विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सर्वात पहिल्यांदा विद्यार्थ्यामागे ५०० रुपयांचे अनुदान वाढविले पाहिजे. जी मंजूर पदे आहेत ती भरली पाहिजेत. याशिवाय विद्यानिकेतनांंसाठी विशेष कौशल्य आत्मसात केलेल्या गुणवान शिक्षकांची निवड केली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांचे उत्तरदायित्व आहे अशा साऱ्यांनी सातत्यपूर्वक विद्यानिकेतनांकडे लक्ष दिले पाहिजे. जवाहर नवोदय विद्यालयाचे अध्यक्षपद जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे, त्याच धर्तीवर विद्यानिकेतनचे अध्यक्षपद हे जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे दिले पाहिजेत़ मुळातच या विद्यानिकेतनातून ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकत असल्याने शासनाने तात्काळ विद्यानिकेतनांसाठी निधी पुरविला पाहिजे. तसेच केंद्राने सुरू केलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर विद्यानिकेतने पाच विभागात केवळ पाच असे न करता प्रत्येक जिल्ह्यात एक सुरू केले पाहिजे.

टॅग्स :Super 30 Movieसुपर 30Maharashtraमहाराष्ट्रEducationशिक्षण