शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

पिस्तूल, हत्यारे मिळतात तरी कशी? मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेबाबत वाटू लागली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 07:46 IST

अवैध हत्यारांच्या प्रसाराला आळा घालणे हे पोलिसांसमोरील आव्हान आहे. अवैध हत्यारे पकडल्यानंतर त्याच्या मुळाशी जाऊन हत्यारे बनवणारे, विक्री करणारे अशा अनेक जणांवर कारवाई करावी लागणार आहे. गुप्तचर यंत्रणा अधिक सतर्क करणे आवश्यक आहे.

- संजय मोहिते, माजी सहपोलिस आयुक्त

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्येमागील कारणाचा मुंबई पोलिस शोध घेत आहेत. ही हत्या लॉरेन्स बिश्नोई या कुप्रसिद्ध गँगच्या शूटर्समार्फत केली गेली, असे सांगितले जाते. सत्ताधारी पक्षाच्या बाजूच्या एका प्रभावशाली नेत्याची भर रस्त्यात आणि उघडपणे हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता वाटू लागली आहे.

राजकीय नेत्यांच्या अशा प्रकारे हत्या होऊ लागल्या तर सामान्यांच्या सुरक्षेचे काय, अशीही एक काळजी समाजात पसरत चालली आहे. मुंबईतील गँगवॉरचा काळ संपला आहे, अशी आतापर्यंत धारणा होती. गेल्या १५-२० वर्षांचा काळ हा मुंबईसाठी त्या मानाने गँगवारविरहित काळ समजावा लागेल. मुंबई पोलिस अधिकारी आणि अंमलदारांचे धाडस आणि शौर्य तसेच त्यांनी केलेले अनेक एन्काउंटर्स यामुळे मुंबईतील गँगवॉर बऱ्यापैकी संपुष्टात आले होते. त्यानंतर मोक्कासारखे कठोर कायदे झाल्याने गुन्हेगारी नियंत्रणात येण्यास हातभार लागला. आपल्या देशात हजारोंच्या संख्येने बेकायदा अग्निशस्त्रे दरवर्षी पोलिसांकडून जप्त होतात. न्यायालयात खटले पाठवले जातात. विलंबाने का होईना निकाल लागतात आणि बहुतांशी गुन्हेगार निर्दोष सुटतात किंवा त्यांना अतिशय कमी शिक्षा होते.

सन १८७८ मध्ये मूळ हत्यार कायदा लागू झाला. त्यानंतर १९५९ आणि २०१९ मध्ये मूळ हत्यार कायद्यात सुधारणा झाल्या. हत्यार परवाना नूतनीकरणाची मुदत तीन वर्षांवरून पाच वर्षे केली गेली. एक व्यक्ती दोनपेक्षा जास्त हत्यारे बाळगू शकत नाही, असा नियम केला गेला. किमान शिक्षा ही सहा महिन्यांवर आणली गेली. सन १९६२ चे हत्यार नियम सध्या लागू आहेत. पोलिसांनी जर एखाद्याला बेकायदा हत्यारासह पकडले तर जप्त केलेल्या अग्निशस्त्राची तपासणी ही फॉरेन्सिक लॅबोरेटरीत केली जाते. खटला पाठवण्यापूर्वी जिल्हा दंडाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असते. अशी मंजुरी बहुधा उशिराने मिळते. पोलिस तपासच वर्ष किंवा दोन वर्षे चालतो. तोपर्यंत आरोपी जामिनावर सुटून खुलेआम फिरत असतात. कोर्टात खटला पाठविल्यानंतर निकाल लागायला काही वर्षे लागतात. त्यानंतर अपील. अशी कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यामुळे अवैध हत्यारे बाळगणाऱ्यांवर कायद्याचा विशेष धाक राहिला नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीMumbaiमुंबई