शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मग कसं.. दादा म्हणतील तसं !.. पण कोणते दादा ? दादागिरी !

By सचिन जवळकोटे | Updated: February 3, 2019 06:51 IST

‘परिवर्तनाचा निर्धार’ करू पाहणाºया ‘घड्याळ’वाल्यांच्या स्टेजवर ‘थोरले दादा अकलूजकर’ बोलण्यासाठी उठू लागले, तेव्हा ‘धाकटे दादा बारामतीकर’ यांनी पटकन् माईक ...

‘परिवर्तनाचा निर्धार’ करू पाहणाºया ‘घड्याळ’वाल्यांच्या स्टेजवर ‘थोरले दादा अकलूजकर’ बोलण्यासाठी उठू लागले, तेव्हा ‘धाकटे दादा बारामतीकर’ यांनी पटकन् माईक ताब्यात घेतला. ‘अकलूजकरांनी बोलू नये’, अशी बारामतीकरांची इच्छा असेल तर ती वर्षानुवर्षे पूर्ण होतच आलेली की... कारण थोरले दादा मनातलं घडाघडा बोलल्याचं कधीच ऐकिवात नाही. मग कदाचित ‘अकलूजकरांनी उभारू नये’, अशी स्ट्रॅटेजीच असेल तर मात्र लगाव बत्ती... याच पार्श्वभूमीवर अकलूजचे विजयदादा अन् माढ्याचे बबनदादा एकत्र आले, परंतु वेळ निघून गेल्यावर... कारण तोपर्यंत साता-याच्या प्रभाकर आॅफिसरांची सोलापुरात एन्ट्री झालेली की हो... त्याच राजकीय ‘दादा’गिरीची ही अनोखी कहाणी !

दोन राजे’ एकत्र येऊ शकतात...... मग दोन ‘दादा’ का नाही येत ?

सोलापूर म्हणजे ‘दादा’ मंडळींचं गाव, अशी एक बाहेर चर्चा. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही ‘दादा’ लोकांनीच राजकारण भरून गेलेलं. भारून गेलेलं, असा एकही तालुका नसावा की, जिथं ‘दादा’ नामक नेत्याचं राजकारण चाललं नसावं. अकलूजच्या ‘थोरल्या दादां’चं साम्राज्य तर जिल्ह्यावर अनेक दशकं राहिलेलं. मात्र, ‘अकलूजची गढी’ सोडून ‘निमगावचा वाडा’ जेव्हा थोरले काका बारामतीकर ‘लाईक’ करू लागले, तेव्हापासून जिल्ह्याच्या राजकारणात वेगवेगळ्या ‘कॉमेंट्स’ पडू लागल्या. त्यानंतर ‘थोरले दादा निमगावकर’ यांचंही बस्तान माढा तालुक्यात मजबूत होत गेलं. आता तर याच ‘बबनदादां’नी मशागत केलेल्या माढा-करमाळ्याच्या रानात ‘संजय मामां’ची ‘साखर’पेरणी सुरू. या दोन्ही साखर सम्राटांना साखर चालत नसली तरी गोड बोलण्यातून त्यांनी जनमानसावर चांगलीच पकड निर्माण केलेली.  घड्याळ पार्टीच्या ‘निर्धार’ यात्रेत ‘विजयदादा’ अन् ‘बबनदादा’ खूप वर्षांनी एकत्र आले, हे ‘परिवर्तन’ही नसे थोडके. आजकाल ‘माण’च्या ‘प्रभाकर आॅफिसरां’पेक्षा ‘माढ्या’चे ‘बबनदादा’ परवडले, असंही असू शकतं कदाचित. दगडापेक्षा वीट मऊ. राजकारणात असंच असतं. चार वर्षे दहा महिने केवळ एकमेकांची पाठच माहीत असणारी नेतेमंडळी शेवटच्या दोन महिन्यांत एकमेकांच्या चष्म्याचा नंबरही ओळखू लागतात. हाही असावा वयोमानानुसार काचेच्या वाढलेल्या अनुभवी नंबरचा परिपाक. खरं तर, तिकडं साता-याचे दोन ‘राजे’ बारामतीकरांच्या गाडीत एकत्र येऊ शकतात, मग इकडं सोलापूरचे दोन ‘दादा’ का नाही, असाही सवाल विचारला जातोय... पण त्यासाठी म्हणे बारामतीकरांच्या गाडीची इच्छाही हवी ना ? लगाव बत्ती... 

  या ‘निर्धार’ यात्रेत दोन दादांचं एकत्र येणं जेवढं चर्चिलं गेलं, त्याहीपेक्षा जास्त ‘प्रभाकर आॅफिसरां’ची स्टेजवरची वर्दळ अधिक लक्षवेधी ठरली. फलटणपासून पंढरपूरपर्यंत लोधवड्याचे देशमुख कसं परळीच्या ‘धनुदादां’सोबत रुबाबात फिरले. मात्र, संध्याकाळी अकलूजच्या कार्यक्रमात यायला त्यांनी पद्धतशीरपणे टाळलं. जंगलभर ढोल पिटविताना सिंहांच्या गुहेत मात्र विनाकारण हात घालायचा नसतो, असाही मुरब्बी विचार त्यांनी केला असावा. बारामतीकरांच्या तालमीत कार्यकर्तेच नव्हे तर अधिकारीही तयार होतात, हा अनुभव नवाच.

फलटणच्या सभेत ‘विजयदादा’ बोलायला उभे राहिले, तेव्हा त्यांना बोलू न देता ‘अजितदादां’नीच माईक ताब्यात घेतला. लगेच समोरच्या ‘मॉब’मध्ये चर्चा रंगली. हे पाहून ‘इस्लामपूरच्या पाटलां’नी शेवटी आभाराचं भाषण ‘विजयदादां’ना दिलं. तिथंही पुन्हा खुसपुस पिकली... कारण माढा मतदारसंघातील मतदारांचे ‘आभार’ मानण्यासाठीच दादांना पद्धतशीरपणे पुढं करण्यात आलं, असंही काही लोकांना वाटलं. जाऊ द्या सोडाऽऽ लोक काय काहीही बोलतात. तिकीट मिळालं तर ओरडतात, नाही मिळालं तर रडतात. फक्त ‘विजयदादां’ची ऐनवेळची भूमिका काय असणार, हे अकलूजच्या जनतेला समजायला हवं... कारण ‘त्यांचा निर्धार पक्का’ असं तेच होमपीचवर म्हणालेले. आता हा कसला नवा निर्धार हे ‘रणजितदादां’नाच विचारायला हवं. कारण ‘विजयदादा’ तर म्हणे कधी मनातलं घडाघडा बोलतच नाहीत.. अन् ऐनवेळी धाडसी निर्णय घ्यायला ‘रणजितदादा’ मागंपुढं पाहत नाहीत. लगाव बत्ती...

दादा’ असतील तर ‘मामा’ उभारणार..... पण देशमुखांशी कोण झगडणार ?

  सध्या सर्वाधिक नेत्यांचं लक्ष माढा मतदारसंघावरच.. कारण ‘थोरले काका बारामतीकर’ जोपर्यंत आपलं गुपित ओपन करत नाहीत, तोपर्यंत विरोधकांनाही आपला हुकुमी पत्ता टाकता येईनासा झालाय. तरीही ‘सुभाषबापूं’नी दोन खमके पर्याय म्हणे तयार केलेत. अकलूजला बारामतीचं तिकीट मिळालं तर ‘संजय मामां’नाच घोड्यावर बसविण्याचा घाट या ‘कमळ’वाल्यांनी घातलाय... अन् ‘प्रभाकर आॅफिसरां’चं नाव निश्चित झालं तर थेट अकलूजकरांनाच कमळांचा गुच्छ देऊन मैदानात उतरविण्याचाही प्लॅन आखला गेलाय... कारण ‘बापूं’ची म्हणे स्वत:साठी पुन्हा माढ्याच्या शिवारात रानोमाळ भटकण्याची बिलकूल इच्छा नाही. त्यांना माढा-माणदेशातल्या माळरानापेक्षा भंडारकवठ्याची साखर गोड वाटतेय. म्हणूनच की काय, त्यांनी ‘दक्षिण’मध्ये हुरडा खात फिरणाºया सुशीलकुमारांना हटकण्याचा प्रयत्न केलाय.

दिलीप मालकां’ऐवजी ‘सुभाषबापूं’नासुशीलकुमारांचा हुरडा का झोंबला ? खरं तर, सुशीलकुमारांची ‘दक्षिण स्वारी’ वडाळ्याच्या ‘सुभाषबापूं’पेक्षा कुमठ्याच्या ‘दिलीप मालकां’ना अधिक अस्वस्थ करणारी. गेल्या दहा वर्षांत या भागात सुशीलकुमारांना घेऊन ते स्वत: कधी फिरल्याचं आम्ही पाहिलं नाही, असं त्यांचेच कार्यकर्ते खासगीत कौतुकानं (!) सांगतात. अशावेळी जुन्या मंडळींसोबत गावोगावी परस्पर हुरड्याचा धुरळा पद्धतशीरपणे उडविला जातोय. त्यात पुन्हा शेळकेंची चटणी, शिवदारेंचं वांगं, म्हेत्रेंचा गूळ अन् हसापुरेंची राजाराणी सोबतीला. पण तोंड कडवट होऊनही बिच्चारे ‘दिलीप मालक’ तरी काय करणार ? ... कारण त्यांना पाठविलंय ‘विजू मालकां’च्या ‘उत्तर’ टापूत राखणीसाठी. तेही कुणाच्या सोबतीला? अक्कलकोटचे ‘सिद्धूअण्णा’, वळसंगचे ‘राजूअण्णा’ अन् कसब्यातले ‘प्रकाशअण्णा’.. आता या तिघांची ‘इग येनू माडादू ?’ ही सांकेतिक भाषा मालकांना समजेपर्यंत ‘दक्षिण’मध्ये सुशीलकुमारांचं ‘नमस्कार रीऽऽ चमत्कार रीऽऽ’ही परस्पर झालेलं. जाता-जाता : शहराध्यक्षपदाची जबाबदारी गळ्यात पडल्यापासून ‘प्रकाशअण्णा’ म्हणे भलतेच भांबावलेत. कारण पक्ष चालवणं हे थेटराजवळचं हॉटेल चालविण्याइतकं सोप्पं नाही, हे त्यांच्या लक्षात आलंय. त्यामुळंच नेहमी गल्ल्यावर बंडलं मोजायची सवय झालेले हे ‘हात’वाले आजकाल ‘जनवात्सल्य’वरही सारखं-सारखं ‘पक्षखर्चा’ची मागणी करू लागलेत. त्यामुळं सध्या सत्तेपासून दूर असलेले त्यांचे नेतेही पुरते कंटाळलेत. पडला का डोक्यात प्रकाश ?..लगाव बत्ती !

- सचिन जवळकोटे,( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेस