शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

मग कसं.. दादा म्हणतील तसं !.. पण कोणते दादा ? दादागिरी !

By सचिन जवळकोटे | Updated: February 3, 2019 06:51 IST

‘परिवर्तनाचा निर्धार’ करू पाहणाºया ‘घड्याळ’वाल्यांच्या स्टेजवर ‘थोरले दादा अकलूजकर’ बोलण्यासाठी उठू लागले, तेव्हा ‘धाकटे दादा बारामतीकर’ यांनी पटकन् माईक ...

‘परिवर्तनाचा निर्धार’ करू पाहणाºया ‘घड्याळ’वाल्यांच्या स्टेजवर ‘थोरले दादा अकलूजकर’ बोलण्यासाठी उठू लागले, तेव्हा ‘धाकटे दादा बारामतीकर’ यांनी पटकन् माईक ताब्यात घेतला. ‘अकलूजकरांनी बोलू नये’, अशी बारामतीकरांची इच्छा असेल तर ती वर्षानुवर्षे पूर्ण होतच आलेली की... कारण थोरले दादा मनातलं घडाघडा बोलल्याचं कधीच ऐकिवात नाही. मग कदाचित ‘अकलूजकरांनी उभारू नये’, अशी स्ट्रॅटेजीच असेल तर मात्र लगाव बत्ती... याच पार्श्वभूमीवर अकलूजचे विजयदादा अन् माढ्याचे बबनदादा एकत्र आले, परंतु वेळ निघून गेल्यावर... कारण तोपर्यंत साता-याच्या प्रभाकर आॅफिसरांची सोलापुरात एन्ट्री झालेली की हो... त्याच राजकीय ‘दादा’गिरीची ही अनोखी कहाणी !

दोन राजे’ एकत्र येऊ शकतात...... मग दोन ‘दादा’ का नाही येत ?

सोलापूर म्हणजे ‘दादा’ मंडळींचं गाव, अशी एक बाहेर चर्चा. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही ‘दादा’ लोकांनीच राजकारण भरून गेलेलं. भारून गेलेलं, असा एकही तालुका नसावा की, जिथं ‘दादा’ नामक नेत्याचं राजकारण चाललं नसावं. अकलूजच्या ‘थोरल्या दादां’चं साम्राज्य तर जिल्ह्यावर अनेक दशकं राहिलेलं. मात्र, ‘अकलूजची गढी’ सोडून ‘निमगावचा वाडा’ जेव्हा थोरले काका बारामतीकर ‘लाईक’ करू लागले, तेव्हापासून जिल्ह्याच्या राजकारणात वेगवेगळ्या ‘कॉमेंट्स’ पडू लागल्या. त्यानंतर ‘थोरले दादा निमगावकर’ यांचंही बस्तान माढा तालुक्यात मजबूत होत गेलं. आता तर याच ‘बबनदादां’नी मशागत केलेल्या माढा-करमाळ्याच्या रानात ‘संजय मामां’ची ‘साखर’पेरणी सुरू. या दोन्ही साखर सम्राटांना साखर चालत नसली तरी गोड बोलण्यातून त्यांनी जनमानसावर चांगलीच पकड निर्माण केलेली.  घड्याळ पार्टीच्या ‘निर्धार’ यात्रेत ‘विजयदादा’ अन् ‘बबनदादा’ खूप वर्षांनी एकत्र आले, हे ‘परिवर्तन’ही नसे थोडके. आजकाल ‘माण’च्या ‘प्रभाकर आॅफिसरां’पेक्षा ‘माढ्या’चे ‘बबनदादा’ परवडले, असंही असू शकतं कदाचित. दगडापेक्षा वीट मऊ. राजकारणात असंच असतं. चार वर्षे दहा महिने केवळ एकमेकांची पाठच माहीत असणारी नेतेमंडळी शेवटच्या दोन महिन्यांत एकमेकांच्या चष्म्याचा नंबरही ओळखू लागतात. हाही असावा वयोमानानुसार काचेच्या वाढलेल्या अनुभवी नंबरचा परिपाक. खरं तर, तिकडं साता-याचे दोन ‘राजे’ बारामतीकरांच्या गाडीत एकत्र येऊ शकतात, मग इकडं सोलापूरचे दोन ‘दादा’ का नाही, असाही सवाल विचारला जातोय... पण त्यासाठी म्हणे बारामतीकरांच्या गाडीची इच्छाही हवी ना ? लगाव बत्ती... 

  या ‘निर्धार’ यात्रेत दोन दादांचं एकत्र येणं जेवढं चर्चिलं गेलं, त्याहीपेक्षा जास्त ‘प्रभाकर आॅफिसरां’ची स्टेजवरची वर्दळ अधिक लक्षवेधी ठरली. फलटणपासून पंढरपूरपर्यंत लोधवड्याचे देशमुख कसं परळीच्या ‘धनुदादां’सोबत रुबाबात फिरले. मात्र, संध्याकाळी अकलूजच्या कार्यक्रमात यायला त्यांनी पद्धतशीरपणे टाळलं. जंगलभर ढोल पिटविताना सिंहांच्या गुहेत मात्र विनाकारण हात घालायचा नसतो, असाही मुरब्बी विचार त्यांनी केला असावा. बारामतीकरांच्या तालमीत कार्यकर्तेच नव्हे तर अधिकारीही तयार होतात, हा अनुभव नवाच.

फलटणच्या सभेत ‘विजयदादा’ बोलायला उभे राहिले, तेव्हा त्यांना बोलू न देता ‘अजितदादां’नीच माईक ताब्यात घेतला. लगेच समोरच्या ‘मॉब’मध्ये चर्चा रंगली. हे पाहून ‘इस्लामपूरच्या पाटलां’नी शेवटी आभाराचं भाषण ‘विजयदादां’ना दिलं. तिथंही पुन्हा खुसपुस पिकली... कारण माढा मतदारसंघातील मतदारांचे ‘आभार’ मानण्यासाठीच दादांना पद्धतशीरपणे पुढं करण्यात आलं, असंही काही लोकांना वाटलं. जाऊ द्या सोडाऽऽ लोक काय काहीही बोलतात. तिकीट मिळालं तर ओरडतात, नाही मिळालं तर रडतात. फक्त ‘विजयदादां’ची ऐनवेळची भूमिका काय असणार, हे अकलूजच्या जनतेला समजायला हवं... कारण ‘त्यांचा निर्धार पक्का’ असं तेच होमपीचवर म्हणालेले. आता हा कसला नवा निर्धार हे ‘रणजितदादां’नाच विचारायला हवं. कारण ‘विजयदादा’ तर म्हणे कधी मनातलं घडाघडा बोलतच नाहीत.. अन् ऐनवेळी धाडसी निर्णय घ्यायला ‘रणजितदादा’ मागंपुढं पाहत नाहीत. लगाव बत्ती...

दादा’ असतील तर ‘मामा’ उभारणार..... पण देशमुखांशी कोण झगडणार ?

  सध्या सर्वाधिक नेत्यांचं लक्ष माढा मतदारसंघावरच.. कारण ‘थोरले काका बारामतीकर’ जोपर्यंत आपलं गुपित ओपन करत नाहीत, तोपर्यंत विरोधकांनाही आपला हुकुमी पत्ता टाकता येईनासा झालाय. तरीही ‘सुभाषबापूं’नी दोन खमके पर्याय म्हणे तयार केलेत. अकलूजला बारामतीचं तिकीट मिळालं तर ‘संजय मामां’नाच घोड्यावर बसविण्याचा घाट या ‘कमळ’वाल्यांनी घातलाय... अन् ‘प्रभाकर आॅफिसरां’चं नाव निश्चित झालं तर थेट अकलूजकरांनाच कमळांचा गुच्छ देऊन मैदानात उतरविण्याचाही प्लॅन आखला गेलाय... कारण ‘बापूं’ची म्हणे स्वत:साठी पुन्हा माढ्याच्या शिवारात रानोमाळ भटकण्याची बिलकूल इच्छा नाही. त्यांना माढा-माणदेशातल्या माळरानापेक्षा भंडारकवठ्याची साखर गोड वाटतेय. म्हणूनच की काय, त्यांनी ‘दक्षिण’मध्ये हुरडा खात फिरणाºया सुशीलकुमारांना हटकण्याचा प्रयत्न केलाय.

दिलीप मालकां’ऐवजी ‘सुभाषबापूं’नासुशीलकुमारांचा हुरडा का झोंबला ? खरं तर, सुशीलकुमारांची ‘दक्षिण स्वारी’ वडाळ्याच्या ‘सुभाषबापूं’पेक्षा कुमठ्याच्या ‘दिलीप मालकां’ना अधिक अस्वस्थ करणारी. गेल्या दहा वर्षांत या भागात सुशीलकुमारांना घेऊन ते स्वत: कधी फिरल्याचं आम्ही पाहिलं नाही, असं त्यांचेच कार्यकर्ते खासगीत कौतुकानं (!) सांगतात. अशावेळी जुन्या मंडळींसोबत गावोगावी परस्पर हुरड्याचा धुरळा पद्धतशीरपणे उडविला जातोय. त्यात पुन्हा शेळकेंची चटणी, शिवदारेंचं वांगं, म्हेत्रेंचा गूळ अन् हसापुरेंची राजाराणी सोबतीला. पण तोंड कडवट होऊनही बिच्चारे ‘दिलीप मालक’ तरी काय करणार ? ... कारण त्यांना पाठविलंय ‘विजू मालकां’च्या ‘उत्तर’ टापूत राखणीसाठी. तेही कुणाच्या सोबतीला? अक्कलकोटचे ‘सिद्धूअण्णा’, वळसंगचे ‘राजूअण्णा’ अन् कसब्यातले ‘प्रकाशअण्णा’.. आता या तिघांची ‘इग येनू माडादू ?’ ही सांकेतिक भाषा मालकांना समजेपर्यंत ‘दक्षिण’मध्ये सुशीलकुमारांचं ‘नमस्कार रीऽऽ चमत्कार रीऽऽ’ही परस्पर झालेलं. जाता-जाता : शहराध्यक्षपदाची जबाबदारी गळ्यात पडल्यापासून ‘प्रकाशअण्णा’ म्हणे भलतेच भांबावलेत. कारण पक्ष चालवणं हे थेटराजवळचं हॉटेल चालविण्याइतकं सोप्पं नाही, हे त्यांच्या लक्षात आलंय. त्यामुळंच नेहमी गल्ल्यावर बंडलं मोजायची सवय झालेले हे ‘हात’वाले आजकाल ‘जनवात्सल्य’वरही सारखं-सारखं ‘पक्षखर्चा’ची मागणी करू लागलेत. त्यामुळं सध्या सत्तेपासून दूर असलेले त्यांचे नेतेही पुरते कंटाळलेत. पडला का डोक्यात प्रकाश ?..लगाव बत्ती !

- सचिन जवळकोटे,( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :SolapurसोलापूरPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेस