शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
2
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
3
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
4
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
5
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
6
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
7
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
8
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
9
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड्स, त्यांना घेऊन जायचा कब्रस्तानात, कारण वाचून व्हाल हैराण
11
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
12
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
13
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
14
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
15
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
16
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
17
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
18
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
19
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
20
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा

हा ‘महाकवी’ असा दुराग्रही कसा?

By गजानन जानभोर | Published: December 26, 2017 12:28 AM

‘देवदूत’कार सुधाकर गायधनी हे मराठी वाङ्मयातील ज्येष्ठ कवी. लोकांनी आपल्याला ‘महाकवी’ म्हणावे असा त्यांचा दुराग्रह असतो.

‘देवदूत’कार सुधाकर गायधनी हे मराठी वाङ्मयातील ज्येष्ठ कवी. लोकांनी आपल्याला ‘महाकवी’ म्हणावे असा त्यांचा दुराग्रह असतो. म्हटले नाही तर ते संतापतात आणि बरळतातही. प्रतिभावंतांमध्ये असे वैगुण्य असतेच आणि समाजही त्याकडे दुर्लक्ष करीत त्याच्या सर्जनशीलतेवर प्रेम करीत असतो. गायधनींचा चाहता वर्ग सर्वत्र आहे. त्यांच्या कवितेने भाषा आणि प्रदेशाच्या सीमा कधीच्याच ओलांडल्या. पण हा श्रेष्ठ कवी माणूस म्हणून ‘वैश्विक’ होऊ शकला नाही, वणी येथे होणाºया विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गायधनींची निवड झाल्याची वार्ता आली तेव्हा साºयांनाच आनंद झाला. त्यात त्यांचे चाहते जसे होते तसेच त्यांच्या तुसडेपणामुळे दुखावलेली माणसेही होती. मराठी कवितेला नवे भान देणाºया या ज्येष्ठ कवीच्या निवडीचे सर्वांनीच मनापासून स्वागत केले. पण, अचानक दुसºया दिवशी गायधनींचा मूळ स्वभाव उफाळून आला. त्यांचे हे रूप यापूर्वीही दिसले पण यावेळी ते जास्तच करपलेले वाटले.ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ, ज्ञानेश वाकुडकर यांना संमेलनात बोलावू नका अशी थेट टोकाची भूमिका गायधनींनी घेतली. गायधनींच्या दृष्टीने वाघ आणि वाकुडकर हे सवंग आहेत. तशी गायधनींची ही ‘सवंग’ यादी त्यांच्या कवितेसारखीच दीर्घ आहे. त्यांच्यादृष्टीने तेच एकमेव कवी, बाकीचे तुच्छ. वाघ, वाकुडकरांना सवंग ठरविण्याचा अधिकार या गायधनींना दिला कुणी? साहित्य संमेलनाध्यक्ष असे कुणाला विरोध करीत नसतात. एखाद्याचे नाव सुचवू शकतात फार तर संबंधिताबद्दल प्रतिकूल मत व्यक्त करू शकतात. पण, त्यांच्या नावांवर आक्षेप घेत थेट राजीनामा देणे, एकूणच हा प्रकार किळसवाणा आहे. गायधनी हे विदर्भ साहित्य संघाचे कठोर विरोधक आहेत. ते स्वाभाविकही आहे. कारण वि.सा.संघाने नेहमीच कंपूशाहीचे राजकारण केले आहे. शेवाळकर-द्वादशीवारांनंतर या संघाची वाटचाल नीतीपेक्षा कूटनीतीच्याच मार्गाने होत आली आहे. संघाचे हे कुटील वर्तमान कायम असतानाही सुधाकर गायधनींना अध्यक्ष करावे असे मनोहर म्हैसाळकरांना वाटणे, ही गोष्ट त्यांच्या मनाचा मोठेपणा दर्शविणारी जशी आहे तसाच तो त्यांच्या प्रायश्चित्ताचाही भाग आहे. म्हैसाळकर आता थकलेले आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी अशी माणसे कमालीची हळवी होतात. आयुष्यात अनवधानाने झालेल्या चुकांचे प्रायश्चित्त शोधण्याचाही ते प्रयत्न करतात. कदाचित याच भावनेतून म्हैसाळकरांनी गायधनींची अध्यक्षपदी निवड केली असावी!गायधनी स्वत: काही वर्षांपूर्वी हृदयरोगाच्या मोठ्या शस्त्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. ‘मी मृत्यूचे दार ठोठावून परत आलो आहे’ असे सांगताना हेच गायधनी अनेकदा भावनिक होतात. अशी पुनर्जन्म मिळालेली माणसे उत्तर आयुष्यात क्षमाशील होतात. त्यांच्या स्वभावात बदल झालेला जाणवतो. तो देखणा आणि प्रसन्न असतो. थोडक्यात काय तर नियतीने त्यांना पूर्वायुष्यातील चुकांचे प्रायश्चित्त घेण्याची संधी एकाच जन्मात दिलेली असते. म्हैसाळकरांनी ती स्वीकारली मात्र गायधनींनी कद्रुपणाने गमावली. यशवंतराव चव्हाण गायधनींच्या कवितेचे भक्त होते. त्यांच्या विजनवासात गायधनींच्याच ‘चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो...’ या कवितेने त्यांना साथ दिली. माणसाच्या आयुष्याचे सार चार शब्दांत सांगणारा हा श्रेष्ठ कवी मात्र आपल्याच शब्दकळांना असा कृतघ्न व्हावा? त्यांच्या प्राक्तनाचा हा शोकात्म भाग क्लेषदायक आहे.ँ्नंल्लंल्ल.्नंल्लुँङ्म१@’ङ्म‘ें३.ूङ्मे