शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
2
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
3
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
4
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
5
IND vs SA: विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? रांची एकदिवसीय सामन्यानंतर केलं मोठं विधान!
6
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
7
जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
8
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
9
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
10
अंबरनाथची संपूर्ण, तर बदलापूरमध्ये ६ प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली
11
आजपासून संसदेचे अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखु महागणार; सरकार विधेयक सादर करणार
12
Nepal Earthquake: भारताच्या शेजारी देशात ४.४ तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट!
13
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
14
Bigg Boss Marathi: रितेश देशमुखच असणार 'बिग बॉस मराठी'चा होस्ट, सलमान खान म्हणाला- "भाऊ तुम्ही..."
15
आजचे राशीभविष्य, १ डिसेंबर २०२५: भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल
16
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
17
अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?
18
फोनमध्ये सिम नसल्यास ॲप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सॲप्स वेब थेट लॉगआउट होणार!
19
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
20
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
Daily Top 2Weekly Top 5

ऐसे कैसे झाले...!

By admin | Updated: April 13, 2016 03:41 IST

राजकारणात उतरलेला प्रत्येकजणच मोठा देवभोळा आणि मंत्र-तंत्र-ज्योतिष-बाबा-महाराज यांना शरण जाणारा असल्याने त्या सर्वांचा आता स्वामी स्वरुपानंद नामे करुन द्वारका-शारदापीठाचे

राजकारणात उतरलेला प्रत्येकजणच मोठा देवभोळा आणि मंत्र-तंत्र-ज्योतिष-बाबा-महाराज यांना शरण जाणारा असल्याने त्या सर्वांचा आता स्वामी स्वरुपानंद नामे करुन द्वारका-शारदापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांच्या निरुपणावर विश्वास बसायला हरकत नाही आणि म्हणूनच आता त्यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या आणि याही आधी पडून गेलेल्या व न जाणो कदाचित भविष्यातही पडू शकणाऱ्या दुष्काळाबाबत परस्परांची उणीदुणी थांबवायला हरकत नाही. तसे झाले तर कदाचित वृत्तपत्रांची आणि अन्य प्रसार माध्यमांची चटकदार बातम्यांच्या अपुऱ्या पुरवठ्यापायी थोडी कुचंबणा होईल पण बाकीचे व्यवहार तर सुरळीत पार पडू शकतील. राज्याला आज जाणवणाऱ्या भीषण पाणी टंचाईला ना पूर्वीच्या युतीचे, ना त्यानंतरच्या आघाडीचे, ना सध्याच्या युतीचे सरकार जबाबदार आहे. जबाबदार आहेत ते शिर्डीस्थित साईबाबा! साईबाबांची मंदिरे उभारुन व त्यांना देव मानून त्यांची पूजा करणे आणि त्यांच्या चरणापाशी हनुमंताला स्थान देणे असल्या प्रकारांमुळेच महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत लोटला गेल्याची धर्मशास्त्रीय मीमांसा स्वामी स्वरुपानंदांनी केली आहे. स्वामीजी हिन्दू धर्माचे मोठे अधिकारी आणि भाष्यकार असल्याची अनेकांची श्रद्धा असल्याने व हिन्दू धर्मात पूर्वीचा जन्म आणि पुनर्जन्म या संकल्पनांना मान्यता असल्याने स्वरुपानंद यांचे मागील जन्मात साईबाबांशी काही तरी भांडण असले पाहिजे. अन्यथा त्यांनी गेल्या कित्येक दिवसांपासून एकट्या साईबाबांच्या मागे लागण्याचे कोणतेही तार्किक कारण दिसत नाही. याच शंकराचार्यांनी राज्याचे गृहमंत्रिपद सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांना एक भयसूचक इशाराही अप्रत्यक्षरीत्या देऊन ठेवला आहे. ज्या हिन्दू देवालयांमध्ये महिलाना परंपरागत प्रवेशबंदी होती त्यापैकी काही मोजक्या देवालयांनी या महान परंपरेला छेद देत महिलाना प्रवेशाची मुक्त मुभा दिल्याने या मोकळीकीचा लाभ जसजसा वाढत जाईल तसतसे संबंधित महिलांवरील बलात्काराचे प्रमाण वाढत जाईल हाच तो स्वामीजींचा भयसूचक इशारा असल्याने आता स्वाभाविकच राज्याच्या गृह खात्यावरील ताणात मोठ्या प्रमाणावर वृद्धी होऊ शकते!