शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस सेनानींनी दक्षिण दिग्विजय कसा साधला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 10:02 IST

कर्नाटक ही खरगे यांच्यासाठी अग्निपरीक्षा होती. राष्ट्रीय पातळीवर अस्तित्व दाखविण्यासाठी त्यांनी विविध गट एकत्र आणले आणि कठोर निर्णयही घेतले.

हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

कर्नाटक विधानसभेचे निकाल यायला सुरूवात झाली आणि सोनिया, राहुल, प्रियांका हे गांधी त्रिकूट टीव्हीकडे डोळे लावून बसले. ८० वर्षे वयाचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या परिश्रमाची सोनिया गांधी यांनी प्रशंसा केली. तब्बल ३६ प्रचारसभा त्यांनी घेतल्या होत्या. १० जनपथ येथून मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवायचा झाला तर प्रियांका गांधी यांनी खरगेंच्या रूपाने योग्य अध्यक्ष निवडल्याबद्दल आपल्या आईचे अभिनंदन केले. प्रियांका यांचे बरोबरही होते, कारण खरगे आल्यानंतर दोन राज्ये पक्षाला जिंकता आली. पक्षाध्यक्षपद स्वीकारल्यानंतरच्या आठ महिन्यांत एकापाठोपाठ एक असे दोनदा यश मिळाले. खरगे यांनी २६ ऑक्टोबर २०२२ रोजी सूत्रे हाती घेतली आणि हिमाचल प्रदेशमध्ये पक्षाला यश मिळाले. ८ डिसेंबर २०२२ रोजी मिळालेले हे यश पक्षाला बराच काळ वाट पाहायला लावल्यानंतर मिळाले होते. त्यानंतर पाचच महिन्यांनी १३ मे २०२३ रोजी खरगे यांनी कर्नाटकमधील मोठे यश गांधी मंडळींना नजर केले. कर्नाटक ही खरगे यांच्यासाठी अग्निपरीक्षा होती. कारण खरगे कर्नाटकातील आहेत. दुसरे म्हणजे २०१९ साली त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला.

तो त्यांना खूपच लागला होता. राष्ट्रीय पातळीवर आपले अस्तित्व दाखविण्यासाठी त्यांना कर्नाटक ही मोठी संधी होती. विविध गट एकत्र आणण्यासाठी त्यांनी बरेच कष्ट घेतले आणि काही कठोर निर्णयही.

कर्नाटकमध्ये दलित आणि मुस्लिमांना एकत्र आणण्यासाठी खरगे उपयुक्त ठरू शकतात, हे भाजप नेतृत्वाच्या थोडे उशिराच लक्षात आले आणि हेच भाजपला झटका देऊन गेले. मागासवर्गीय (पक्षी - सिद्धरामय्या) आणि डी. के. शिवकुमार यांच्या रूपाने वोक्कलिंग भाजपला महागात पडले. देवेगौडा यांचा तीन दशकांपासूनचा बालेकिल्ला भुईसपाट करण्यात डी. के. शिवकुमार यांना यश आले. खरगे यांचा आता दलितांचे नेते म्हणून उदय झाला असून, तेच भाजपसाठी घातक ठरले. गेल्या ३०-३५ वर्षांत पक्षापासून दूर गेलेले दलित लोक खरगे यांच्यामुळे परत जोडले जाऊ शकतात. दुसरीकडे मायावती आणि ओवेसी यांच्यासारख्यांच्या मागे गेलेले मुस्लिम पुन्हा काॅंग्रेसला मतदान करतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. अर्थात त्या मतदारसंघात काॅंग्रेस उमेदवार भाजपला मात देण्याच्या परिस्थितीत असायला हवा.

मुंबई मनपा निवडणुकीवरून संभ्रमकर्नाटकमधील मानहानीकारक पराभवाचा परिणाम भाजपवर स्पष्टपणे दिसत आहे. कर्नाटक निवडणूक आटोपताच बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर करण्याचे भाजपच्या मनात होते. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात आक्रमकरित्या कामाला सुरूवात करा, असे या मंडळींना शाह यांनी सांगितले होते. ठाकरे गटाच्या हातातून महापालिका हिसकावून घेण्यासाठी शाह यांनी त्यांना सात कलमी कार्यक्रमही दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे शिंदे गटाच्या सत्तेला राज्यात पुढे चाल मिळाली. परंतु, सर्वोच्च न्यायालयातील तसेच इतर आघाड्यांवरची लढाई पुढे चालूच राहणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी मुंबईला भेट देऊन राज्याला तीन इंजिनांची गरज असल्याचे सांगितले होते. परंतु, कर्नाटकातील निकालांनी या सगळ्या तयारीवर काहीसे पाणी फिरवले आहे. 

जालंधर पोटनिवडणुकीत भाजपची अनामत जप्तभाजपची हार केवळ कर्नाटकात झालेली नाही, पंजाबमध्येही झाली. जालंधर लोकसभा मतदारसंघात पक्षाच्या उमेदवाराची अनामत जप्त झाली. या लोकसभा मतदार संघातील विधानसभा क्षेत्रामध्ये अलीकडेच झालेल्या निवडणुकीपेक्षा या पोटनिवडणुकीत भाजपची मतसंख्या चार टक्क्यांनी वाढली हे खरे असले तरी पक्षाचे उमेदवार इक्बालसिंग अटवाल केवळ चौथ्या क्रमांकावर फेकले गेले नाहीत तर त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली. अनामत रक्कम वाचवायची असेल तर उमेदवाराला एकूण मतदानाच्या १/६ मते मिळवावी लागतात. भाजप उमेदवाराला ती मिळाली नाहीत. २०२२ साली झालेल्या निवडणुकीत जबरी हार पत्करावी लागल्यानंतर भाजपला पंजाबमध्ये हा दुसरा फटका होता. या भगव्या पक्षाने शेतीविषयक तीन कायद्यांच्या मुद्द्यावरून तीन दशकांपासून साथीदार असलेल्या अकाली दलाशी फारकत घेतली. आता लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना कदाचित भाजप पुन्हा एकदा अकाली दलाला जवळ करेल. अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल शांतपणे सगळ्या घडामोडींवर नजर ठेवून आहेत. अर्थात त्यांचाही उमेदवार या निवडणुकीत हरला. मात्र, काँग्रेस आणि आपच्यानंतर अकाली दलाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर आला, याचे समाधान त्यांना आहे. शिरोमणी अकाली दल आणि भाजप युती पंजाबमधील चित्र बदलू शकते, यात शंका नाही. परंतु, बादल इतक्यात हा जुगार खेळायला इच्छुक नाहीत. ते पुरेसा वेळ घेतील, असे दिसते. काँग्रेस आणि इतर पक्षांतून नेते आयात करण्याचा भाजपचा प्रयोग मात्र या राज्यात सपशेल फसला आहे. 

जल्लोष पुढे ढकललाकर्नाटकातील पराभवाने भाजपचे फारसे काही बिघडणार नाही, असे म्हणणाऱ्या नेत्यांची पक्षात कमी नाही. मात्र, पक्षाचे नेतृत्व भीतीग्रस्त झाले आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होऊन नऊ वर्षे झाली ही गोष्ट साजरी करण्याची योजना आधी आखण्यात आली होती. परंतु, कर्नाटकातील निकाल आल्यानंतर तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसKarnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूक