शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

४६ वर्षात पुण्यातील ‘या’ रस्त्यावर एकही खड्डा कसा नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 10:04 IST

मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईतले रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा नुकतीच केली. पण, त्यांना खड्डेमुक्त रस्त्याचे हे खास पुणेरी रहस्य ठाऊक नसेल!

संजय आवटे

‘रस्ता तयार केल्यानंतर दहा वर्षांत त्यावर एकही खड्डा पडला, तर आम्ही तो विनामूल्य दुरुस्त करून देऊ’, अशी गॅरंटीच मिळाली होती. पण, ती गॅरंटी देताना, रस्ता बांधणाऱ्या कंपनीनं अटीही घातल्या होत्या. टक्केवारी वगैरे भानगडीपोटी कोणत्याही नगरसेवकानं वा राजकीय नेत्यानं यात लुडबूड करायची नाही. दुसरं म्हणजे, कोणत्याही कारणासाठी रस्ता खोदायचा नाही. सगळे अगदी निर्विघ्न पार पडले आणि असा रस्ता तयार झाला की विचारायलाच नको. या रस्त्यानं आजवर एक ना दोन, ४६ पावसाळे पाहिले. पण, हा रस्ता वाकला नाही, थकला नाही. या रस्त्यावर एकही खड्डा आजवर कधी कोणी पाहिला नाही. पाच दशकांत या रस्त्याने अपार पाऊस झेलला, ऊन-वाऱ्याचा, प्रचंड वाहतुकीचा मुकाबला केला. पण, या रस्त्यावर एकही खड्डा मात्र पडला नाही. 

- हाच तो पुण्यातला प्रख्यात जंगली महाराज रस्ता! स. गो. बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौक असा हा रस्ता. अंतर सुमारे दोन किलोमीटर. सद्गुरू जंगली महाराजांची समाधी इथे असल्याने त्यांचेच नाव या रस्त्याला मिळाले आणि योग्याचा वारसा सांगणारा हा रस्ता त्याच ताठ कण्यानं अविचल, पण अव्याहत धावता राहिला. पुण्यात १९व्या शतकात तेव्हाच्या भांबुर्डा आणि आताच्या शिवाजीनगर भागात सद्गुरू जंगली महाराज यांचे वास्तव्य होते. सुफी, वारकरी, दत्त संप्रदाय आणि सत्यशोधक विचारांशी ते जोडले गेले होते. अस्पृश्यता, अंधश्रद्धा आणि जातीभेद यांचे ते कट्टर विरोधक. त्यांचे नाव सांगणारा हा रस्ता. 

या रस्त्याची कथाही ऐतिहासिक. १९७२च्या दुष्काळानंतर १९७३-७४ला राज्यात सर्वत्र प्रचंड पाऊस झाला. या पावसात पुण्यातील सर्वच भागातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली होती. श्रीकांत शिरोळे हे तत्कालीन स्थायी समितीचे सभापती. पावसाने शहरातील मुख्य रस्त्यांची चाळण केल्यावर नागरिक आणि नगरसेवकांनीही महापालिकेकडे तक्रारी सुरू केल्या. अर्थात पालिकेने नेहमीप्रमाणे खड्ड्यांचे खापर पावसावर फोडले.१९७३मध्ये ‘रस्ते’ या विषयावर शहरभर गदारोळ होत असे. माध्यमंही तेव्हा रस्त्यांच्या बातम्या देत असत. ‘सूत्र’ नावाचे प्रकरण अद्याप जन्माला यायचे होते. गुवाहाटीतल्या झाडी, डोंगारपेक्षा आपल्या शहरातले रस्ते महत्त्वाचे, याचे भान होते. एकूण, चित्र बरेच वेगळे होते. अशावेळी पुण्यातल्या रस्त्यांची चाळण असा मुद्दा चर्चेचा होता. बऱ्याच चर्चेनंतर, रस्ते बनविणाऱ्या ‘रेकॉन्डो’ या पारशी बंधूंच्या कंपनीला नमुना म्हणून ‘सद्गुरू जंगली महाराज मंदिर ते डेक्कन’ असा दोन किलोमीटरचा रस्ता बनविण्याचे १५ लाखांचे कंत्राट तेव्हा दिले गेले. तशी नोंद महापालिकेच्या दफ्तरात आहे. १ जानेवारी १९७६ला जंगली महाराज रस्त्याचे काम, हस्तांतरण वगैरे पूर्ण झाले. ३१ डिसेंबर १९८५पर्यंत कंपनीने या रस्त्याच्या मजबुतीची हमी घेतली होती. पण १० वर्षे सोडाच, गेली ४६ वर्षे या रस्त्यावर एकही खड्डा पडलेला नाही! 

अर्थात, सर्वसामान्य माणसांची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची. आपण पुणेकर आहोत, तर पुणे ही आपली जबाबदारी आहे, हे भान तेव्हा होते. त्यामुळेच, पुढची १० वर्षे महापालिकेने मांडव वा खोदकामाला परवानगीच दिली नाही. पण, कोणी त्याविषयी तक्रार केली नाही. गणपतीचे मांडव ड्रममध्ये वाळू ठेवून, त्यात बांबू रोवून उभे केले गेले. पण, रस्त्यावर साधा खिळाही ठोकायचा नाही, हे पथ्य पाळले गेले. हा खड्डेमुक्त रस्ता त्यामुळेच आज जादुई भासतो! रस्ते बांधणी क्षेत्रातील काही जाणकारांनी सांगितले की, याची कारणे रस्त्याच्या बांधणीत आहेत. रस्ता तयार करताना तो प्रथम खोदावा लागतो. तो किती खोलवर खोदायचा, त्यावर कोणत्या आकाराच्या खडीचे किती थर द्यायचे, कोणत्या क्रमाने द्यायचे याचे तंत्र आहे. त्या पद्धतीने काम केले तर रस्त्याची मजबुती कायम राहते. रस्ता, त्यावरून जाणाऱ्या वाहनांची संख्या, त्यांचे प्रकार, वापर किती वेळ आणि कसा होतो यावर खोदाई, खडीकरण, त्यावर दबाव, मग डांबर, मग पुन्हा चर (अगदी बारीक खडी), मग खडीची जवळपास पांढरी पावडर याची गणिते केली जातात. निविदेत तसे स्पष्ट नमूद केले जाते. जंगली महाराज रस्त्याच्या संदर्भात या सर्व गोष्टींचे काटेकोर पालन केले गेले. ठरवून ‘हॉटमिक्स’ पद्धत वापरून हा रस्ता तयार झाला, असे अभ्यासक सांगतात. 

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतले सगळे रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा नुकतीच केली आहे. नव्या मुख्यमंत्र्यांना ‘समृद्धी’चे गुपित ठाऊक आहे. पण, त्यांना पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्याचे हे रहस्य ठाऊक नसेल! या डांबरीकरणावरून एक गंमत आठवली. १९३८च्या दरम्यान आचार्य अत्रे पुणे नगरपालिकेत असताना (तेव्हा महानगरपलिका अद्याप व्हायची होती!) त्यांनी शहरातील ‘भांबुर्डा’ भागाचे शिवाजीनगर आणि ‘रे मार्केट’चे महात्मा फुले मंडई असे नामकरण केले. शहरात पीएमटी सुरू केली आणि महत्त्वाचे म्हणजे स्थायी समितीचे पुण्याचे पहिले अध्यक्ष म्हणून पुण्यातील रस्त्यांचे डांबरीकरण केले. त्यावेळी त्याला विरोध करताना एक नगरसेवक म्हणाले होते, ‘आधीच पुण्याच्या रस्त्यांमध्ये गुडघागुडघा चिखल. त्यात आता डांबर ओतल्यावर चालणाऱ्या माणसाचा पायच वर निघणार नाही.’ नंतर शहरातील सर्वच रस्त्यांचे डांबरीकरण झाले. त्याचे श्रेय जाते, आचार्य अत्रे यांच्याकडे! ‘डांबरी रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडत नसतात, हे मी त्यावेळी पालिकेला ठणकावून सांगितले होते’, असे श्रीकांत शिरोळे आजही सांगत असतात. जंगली महाराज रस्त्याच्या निमित्ताने त्यांनी याचा पुरावाच दिला. हा रस्ता साधा नाही. सत्यशोधक विचारांवर चर्चा करण्यासाठी महात्मा फुले आणि कृष्णराव भालेकर या रस्त्यावरील जंगली महाराजांच्या मठात येत असत. पुण्यातील सामाजिक ऐक्य जोपासण्यातही जंगली महाराज रस्त्याचा वाटा मोठा आहे. मग सांगा, या रस्त्यावर खड्डे कसे पडतील?

(लेखक लोकमत पुणे आवृत्तीचे संपादक आहेत)

sanjay.awate@lokmat.com

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र