शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

घोडेस्वार तरबेजच हवा, 7 भावी डॉक्टरांच्या मृत्युनंतर अनेक प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 05:38 IST

गडकरींनी देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारत रस्ते महामार्गांनी जोडला. रस्ते विकासाचा हा वेग थक्क करणारा आहे.

मित्राचा वाढदिवस साजरा करून वर्ध्याला परत येत असताना अनियंत्रित कार नदीत कोसळून झालेल्या अपघातात वैद्यकीय अभ्यासक्रम शिकणाऱ्या सात भावी डॉक्टरांचा करुण अंत झाला. या भीषण अपघाताचे वृत्त वाचून अनेक जण हळहळले. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केली. भरधाव असलेल्या कारचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारण काही असो, सात विद्यार्थ्यांचा हकनाक बळी गेला. असे अपघात आता नित्याचीच बाब झाली आहे. गेल्या काही वर्षांत देशातील रस्त्यांचा दर्जा सुधारला. राष्ट्रीय महामार्गाची कामे मोठ्या प्रमाणात झाली. अनेक राज्यमार्ग आता राष्ट्रीय महामार्ग झाले आहेत. दररोज किमान ३५ किलोमीटर या वेगाने रस्त्यांची कामे होत आहेत. दळणवळण प्रचंड वाढले आहे. दोन-अडीचशे किमी अंतर पार करण्यासाठी जिथे पूर्वी किमान सहा-सात तास लागायचे, तिथे आता अवघे तीन-चार तास लागतात. याचे श्रेय अर्थातच, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना द्यावे लागेल.

गडकरींनी देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारत रस्ते महामार्गांनी जोडला. रस्ते विकासाचा हा वेग थक्क करणारा आहे. एकीकडे रस्ते सुधारले आणि दुसरीकडे वेगवान वाहनेही रस्त्यांवर आली. या दुहेरी गतिमुळे प्रवास सुखकर झाला, मात्र त्याच वेळी वाहनांच्या गतीवरील नियंत्रण सुटू लागल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले. राष्ट्रीय क्राईम ब्युरोच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, अंगाचा थरकाप उडेल. दरवर्षी भारतात सुमारे अडीच लाख अपघात होतात आणि त्यात लाखभर लोक जीव गमावतात. जगाच्या तुलनेत आपल्याकडे केवळ एक टक्का वाहने आहेत. मात्र अपघातांची संख्या अधिक आहे. देशभरात दर ताशी ५३ अपघात होतात. प्रति चार मिनिटाला एकाचा मृत्यू होतो. रस्ते अपघातात मृत्यू पावणाऱ्यांमध्ये १८ ते ४५ या वयोगटातील सुमारे ७० टक्के लोक असतात. याचाच अर्थ, रस्ते अपघातात दरवर्षी शेकडो तरुण आपला जीव गमावून बसतात. ही राष्ट्रीय हानी आहे. भारत हा तसा तरुणांचा देश आहे. परंतु ही तरुणाई अतिवेगाचे बळी ठरत असेल तर त्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आपल्यापेक्षा आकाराने लहान असलेल्या थायलंड, श्रीलंकासारख्या देशात रस्ते अपघाताचे प्रमाण नगण्य आहे. युरोप-अमेरिकेत तर त्याहून कमी. २०२४ पर्यंत रस्ते अपघातांचे प्रमाण ५० टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाने ठेवले आहे. त्यासाठी देशभरातील ५० हजार ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित केले आहेत. रस्ते अपघाताची कारणमीमांसा केली तर काही बाबी ठळकपणे समोर येतात. एक म्हणजे, आपल्याकडे असलेला वाहन साक्षरतेचा अभाव. सुरक्षित प्रवासासाठी केवळ वाहन चालविता येणे पुरेसे नसते. सध्याची वाहने अत्याधुनिक आहेत. स्वयंचलित आहेत. नव्या तंत्रज्ञानामुळे वाहनांची गती वाढली आहे. अशा वाहनांच्या तांत्रिक बाबींचे ज्ञान वाहनचालकाला असणे गरजेचे असते. मात्र, त्याबाबतीत कमालीची बेफिकिरी दिसून येते.

रस्त्यांवरच्या चिन्हांची माहिती असणे आणि वाहन मागे-पुढे करता येणे, एवढ्याशा पात्रतेवर आपल्याकडे वाहन चालविण्याचा परवाना मिळतो! शिवाय, रस्त्यांवर वाहने आणणाऱ्या प्रत्येकाकडे परवाना असेलच याचीही शाश्वती नसते. वाहन चालविणाऱ्याने मद्यप्राशन करू नये, या नियमाचे तर सर्रास उल्लंघन होताना दिसते. वर्ध्यातील अपघातातही चालकाने मद्यप्राशन केल्याचा संशय आहेच. साधारणपणे आपल्याकडे मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास अपघातांचे प्रमाण अधिक आहे. चालकावर झोपेचा अंमल असणे, विनाथांबा, विनाविश्रांती गाडी चालविणे अशी कारणेही समोर आली आहेत. रस्ते सुरक्षिततेचे उपाय योजत असताना वाहनचालकांना प्रशिक्षण देणे, महामार्ग पोलिसांकडे अत्याधुनिक यंत्रणा असणे, नियमभंगासाठी कठोर शिक्षा ठोठावणे तितकेच गरजेचे झाले आहे. चांगले रस्ते आणि अत्याधुनिक वाहन असताना वेगावर नियंत्रण कशासाठी? असा प्रश्न अनेकजण उपस्थित करतात. परंतु, घोडेस्वार तरबेज असेल तरच तो बेफाम घोड्याला नियंत्रित ठेवू शकतो. हाच नियम वाहनचालकांना देखील लागू पडतो. लाखो रुपये किमतीचे वाहन आपण कोणाच्याही स्वाधीन करतो आणि वाहनासह लाख मोलाचा जीवही गमावून बसतो. हे टाळायचे असेल तर तरबेज घोडेस्वार तयार करणे हाच उपाय दिसतो.

टॅग्स :Accidentअपघातwardha-acवर्धाdoctorडॉक्टरNitin Gadkariनितीन गडकरी