शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

हाँगकाँगची वाटचाल कडेलोटाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 05:25 IST

हाँगकाँगमधील चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाविरुद्ध सुरू असलेले आंदोलन चार महिने झाले तरी शांत होताना दिसत नाही.

- अनय जोगळेकरहाँगकाँगमधील चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाविरुद्ध सुरू असलेले आंदोलन चार महिने झाले तरी शांत होताना दिसत नाही. १६ जूनला हाँगकाँगच्या ७५ लाख लोकसंख्येपैकी सुमारे २० लाख लोक रस्त्यावर उतरले. त्यानंतर त्यात खंड पडलेला नाही. आता या आंदोलनाचे लोण विद्यापीठात पोहोचले आहे. हाँगकाँग विद्यापीठ जगातील सर्वोत्तम ३० विद्यापीठांत गणले जाते. गेल्या आठवड्यात आंदोलन करणाऱ्या एका विद्यार्थ्याचा गॅरेजवरून पडून मृत्यू झाला. सुरक्षा दलांनी एका आंदोलकाला गोळी घातली, तर एका ठिकाणी आंदोलकांनी त्यांना विरोध करणाºया माणसाला पेटवून दिले. आजवर विद्यापीठात सशस्त्र पोलीस आले नव्हते. पण आता विद्यापीठांनाही छावणीचे स्वरूप आले आहे. सध्याची परिस्थिती पाहता विद्यापीठांनी पहिले सेमिस्टर लवकर गुंडाळून टाकले. या आंदोलनाचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असून गेल्या तिमाहीत ती ३.२ टक्क्यांनी आकुंचन पावली. हाँगकाँगमध्ये येणाºया चिनी पर्यटकांच्या संख्येत ५५ टक्के घट झाली आहे.या आंदोलनाला अमेरिका आणि अन्य पाश्चिमात्य देशांची फूस असल्याचा आरोप चीनच्या सरकारी नियंत्रणाखालील चिनी वर्तमानपत्रांनी केला आहे. ग्लोबल टाइम्स या वर्तमानपत्राने म्हटले आहे की, काही आंदोलक मार्च ते मे २०१९ च्या दरम्यान ब्रिटन, कॅनडा, जर्मनी आणि अमेरिकेला जाऊन आले. चायना डेलीने म्हटले आहे की, हाँगकाँगमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण करून चीनला कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे. हे आंदोलन चीनच्या अन्य भागांत होत असते तर याची दखलही घेतली गेली नसती. पण हाँगकाँग हे जगातील सर्वात महत्त्वाच्या आर्थिक आणि व्यापारी केंद्रांपैकी एक असून सर्वात महागड्या शहरांपैकीही एक आहे. चीनमध्ये गुंतवणूक करणाºया अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये हाँगकाँगमध्ये आहेत.

आंदोलनाच्या मुळाशी एक वादग्रस्त विधेयक आहे. त्याचे कायद्यात रूपांतर झाल्यास हाँगकाँगमधील संशयित गुन्हेगारांचे चीनमध्ये हस्तांतर शक्य होणार आहे. साम्यवादी चीनमधील न्यायव्यवस्थेत पारदर्शकता नाही. या विधेयकाचा दुरुपयोग होऊन चीनवर टीका करणाऱ्यांना राजद्रोहाच्या किंवा अन्य खोट्या गुन्ह्यांत गोवून त्यांना शिक्षा करण्यात येईल, अशी भीती हाँगकाँगवासीयांना वाटते.१ जुलै १९९७ ला चीन आणि ब्रिटिशांतील ९९ वर्षांच्या भाडेकराराच्या समाप्तीनंतर ब्रिटिशांनी मुंबईच्या दुप्पट आकाराच्या टापूचा ताबा काही अटींवर चीनकडे सुपुर्द केला. सुमारे १५० वर्षांच्या ब्रिटिश राजवटीत हाँगकाँगच्या जनतेने लोकशाही, कायद्याचे राज्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अनुभवले होते. हाँगकाँग साम्यवादी चीनचा भाग असला तरी ब्रिटिशांच्या माघारीनंतर २०४७ सालापर्यंत तेथे वेगळी व्यवस्था राहील, याची तजवीज केली गेली होती. त्यामुळे चीनचे कायदे हाँगकाँगमध्ये लागू होत नाहीत.हा करार झाला तेव्हा चीन जगात स्वत:चे स्थान निर्माण करू पाहणारा गरीब-विकसनशील देश होता. पण त्यापुढील तीस वर्षांमध्ये चीन प्रबळ आर्थिक आणि लष्करी सत्ता म्हणून पुढे आला. लोकसंख्येवर नियंत्रण, किफायतशीर उत्पादन आणि निर्यातीच्या जोरावर साधलेला सरासरी १० टक्क्यांहून अधिक आर्थिक विकास, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात केलेली गुंतवणूक आणि सैन्यदलांचे आधुनिकीकरण यांच्या जोरावर चीनने अमेरिकेलाही आव्हान दिले असून जगातील मध्यवर्ती सत्ता होण्याच्या दृष्टीने चीनची वाटचाल सुरू आहे. अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या कार्यकाळात चीनमध्ये सत्तेचे अधिकाधिक केंद्रीकरण होत आहे. शी जिनपिंग यांनी डेंग शाओपिंगनंतर पाळली जात असलेली १० वर्षांची अध्यक्षीय कालमर्यादा तोडून स्वत:ला तहहयात अध्यक्ष करण्याच्या दृष्टीने व्यवस्थेत बदल केले आहेत. हाँगकाँगची स्वायत्तता कमी करून त्याला चीनच्या मुख्य भूमीच्या कह्यात आणण्यासाठीही त्यांचे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी वेळोवेळी लोकशाहीवादी नेत्यांना अटक करण्यात आली.
हाँगकाँगमध्ये नियंत्रित लोकशाही व्यवस्था आहे. ११९४ प्रतिनिधींची निवड समिती हाँगकाँगचा मुख्याधिकारी निवडते. ते औद्योगिक, व्यावसायिक, कामगार, धार्मिक आणि सामाजिक सेवा आणि लोकनिर्वाचित सदस्यांमधून निवडले जातात. विधिमंडळात ७० जागा असून त्यातील ३५ जागांसाठी निवडणूक होते. उर्वरित ३५ जागा विविध उद्योगांच्या प्रतिनिधींसाठी राखीव आहेत. येथील राजकीय पक्षांमध्ये चीनच्या बाजूचे आणि विरोधातील अशी विभागणी झाली आहे. चीनविरोधातील पक्षांना जास्त लोकांचा पाठिंबा असला तरी थेट निवडून न आलेल्या प्रतिनिधींच्या पाठिंब्यामुळे तेथील प्रशासन चीनच्या बाजूला कललेले असते. कॅरी लाम या चौथ्या मुख्याधिकारी चीनधार्जिण्या असल्याने आंदोलकांचा त्यांच्याविरोधात विशेष राग आहे.चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने दोन आठवड्यांपूर्वी हाँगकाँगमधील सुरक्षेची परिस्थिती ढासळू न देण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात येतील, अशी संभ्रम निर्माण करणारी घोषणा केली. हे आंदोलन असेच चालू राहिले तर चीन आपल्या मुख्य भूमीतून सैन्य पाठवून ते चिरडून टाकेल, अशी भीती आहे. त्यामुळे सध्या तरी हाँगकाँगमधील परिस्थिती कडेलोटाकडे झुकलेली आहे.(आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक)