शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या बाजूला फार बघू नका..., धोका आहे...!", भरसंसदेत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना नेमकं काय म्हणाले खर्गे?
2
सामन्यानंतर विराटला एक प्रश्न विचराला गेला, त्यानं बोलता बोलता BCCI अन् गौतम गंभीरवरच निशाणा साधला, स्पष्टच बोलला
3
पराभवाच्या चर्चेने विरोधक संतप्त, नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेची आठवण करून दिली
4
उघडताच पूर्ण भरला 'हा' IPO; ग्रे मार्केट प्रीमिअमवरुन बंपर लिस्टिंगची शक्यता, पाहा डिटेल्स
5
मोठा निष्काळजीपणा! मध्य प्रदेशात ५० वर्षे जुना पूल कोसळला; १० जण जखमी
6
अर्थव्यवस्थेसाठी 'चिंताजनक' बातमी! रुपया डॉलरपुढे गडगडला, सर्वसामान्यांच्या खिशावर थेट होणार परिणाम!
7
अमेरिकेत भारतीय IT कर्मचाऱ्यांसाठी 'टेन्शन'! H-1B व्हिसा मिळणं ७०% नी घटलं; TCS चाही रिजेक्शन रेट वाढला!
8
अफगाणिस्तानने उघडला नवा मार्ग, पाकिस्तानमध्ये हाहाकार; सीमेवरील व्यापार बंदीचा उलटाच झाला परिणाम
9
डिसेंबरमध्ये शेअर बाजारात ९ दिवस कामकाज बंद! तुमचं ट्रेडिंग प्लॅनिंग आजच करा! ही घ्या सुट्टीची संपूर्ण यादी
10
यशस्वीची 'तेरे नाम' हेअर स्टाइल पाहून विराटमध्ये अवतरला सलमान; "लगन लगी.." स्टेप्सचा व्हिडिओ व्हायरल
11
Nanded Murder Case : "तुझ्या बहिणीचं ज्याच्यासोबत लफडं त्याला मारुन ये....", सक्षमला मारण्याआधी पोलीस चौकीतील घटनाक्रम; आंचलने सांगितली धक्कादायक माहिती
12
एका झटक्यात चांदीची किंमत ९३८१ रुपयांनी वाढली, सोन्यातही जोरदार वाढ; पाहा नवे दर
13
श्रेयस अय्यरसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर अखेर मृणाल ठाकूरने सोडलं मौन; म्हणाली...
14
Samantha Wedding: ना गाजावाजा, ना शाही थाट! अत्यंत साधेपणाने समांथाने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, स्वतःच शेअर केले फोटो
15
पाक लष्कराचा 'बॉस' कोण? COAS मुनीर यांचा कार्यकाळ संपला, पण CDFचे पद रिकामेच! नेमका अडसर कशाचा?
16
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
17
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
18
एअर फोर्स ऑफिसरच्या भूमिकेत दिलजीत दोसांझ, 'बॉर्डर २'मधून अभिनेत्याचा पहिला व्हिडीओ आउट
19
चुकीच्या वेळी दूध प्यायल्याने मुलांच्या वाढीवर परिणाम? सकाळ की संध्याकाळ... 'ही' आहे सर्वोत्तम वेळ
20
लग्नासाठी ऑनलाइन वधू शोधत होता अन् लागला ४९ लाखांचा चुना; पीचडी करण्याऱ्या तरुणासोबत काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

हिन्दुत्वाचे द्वंद्व

By admin | Updated: July 26, 2016 02:15 IST

सत्तेची ऊब कायम ठेवण्यासाठी संघाला असे बंधुभावी, सहिष्णू होणे त्या अर्थाने अगत्याचेही झाले आहे. आपले कट्टरतेचे मूळ नष्ट होऊ द्यायचे नाही पण सहिष्णुताही स्वीकारायची!

- गजानन जानभोरसत्तेची ऊब कायम ठेवण्यासाठी संघाला असे बंधुभावी, सहिष्णू होणे त्या अर्थाने अगत्याचेही झाले आहे. आपले कट्टरतेचे मूळ नष्ट होऊ द्यायचे नाही पण सहिष्णुताही स्वीकारायची! हे संघातील नवे वैचारिक द्वंद्व असेल. हिंदुत्वाचा खरा अर्थ माणुसकी आणि बंधुभाव हाच असल्याचा राग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी परवा नागपुरात पुन्हा एकदा आळवला. संघ परिवारातील माणसे अधूनमधून असे बोलत असतात. लोक आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवतात आणि त्यातून संघाबद्दल समाजात निर्माण झालेला संभ्रम दूर होतो, असे संघ परिवाराला उगाच वाटत असते. पण समाजाचा बुद्धिभेद करण्याची संघाची ही रीत जुनीच असल्याने त्यावर फारसा कुणी विश्वास ठेवीत नाहीत. सरसंघचालकांनी हिंदुत्वाचा खरा अर्थ आधी प्रवीण तोगडिया, योगी आदित्यनाथ, साध्वी प्राची या आपल्याच परिवारातील विखारी हिंदुत्ववाद्यांना सांगण्याची गरज आहे. संघाच्या कथनी आणि करणीत विसंगती आहे. ती असंख्य घटनांमधून प्रतीतही होत असते. सरसंघचालक ‘एक गाव, एक स्मशानभूमी’चा आग्रह धरतात. पण त्याच वेळी आरक्षणाचा फेरविचार करावा अशी मागणीही करतात. उत्तर प्रदेशचा दयाशंकर सिंह हा भाजपा नेता मायावतींचा अश्लाघ्य शब्दात अपमान करतो, त्यावेळी सरसंघचालक निषेधाचा ब्र सुद्धा काढीत नाहीत. शनि शिंगणापूरच्या चौथऱ्यावरील प्रवेशासाठी याच हिंदू धर्मातील माता-भगिनी पोलिसांच्या लाठ्या-काठ्या खातात, त्यावेळी हे सरसंघचालक उपाख्य हिंदू धर्म रक्षक सरकारला खडसावत नाहीत. साईबाबांना हीन लेखणाऱ्या शंकराचार्यांना आणि अल्पसंख्यकांबद्दल गरळ ओकणाऱ्या साक्षी महाराजांना माणुसकी व बंधुभावाची शिकवण देण्याची सद्बुद्धी सरसंघचालकांना त्यावेळी का सुचत नाही? ज्या धर्माचे आपण ठेकेदार असल्याचा आव ही मंडळी आणतात त्याच सामान्य हिंदूंच्या मनातील हे प्रश्न आहेत. महात्मा गांधी संघाला प्रात:स्मरणीय आहेत (किमान ते तसे सांगतात) पण गांधीजींची हत्त्या करणाऱ्या नथुराम गोडसेला हौतात्म्य बहाल करणाऱ्या आपल्याच विकृत माणसांना फटकारण्याची हिंमत सरसंघचालक का दाखवत नाहीत? संघाची प्रतिमा आधुनिक आणि सर्वसमावेशक केल्याशिवाय सामान्य हिंदूंना आपलेसे करता येणार नाही, याची जाणीव भागवतांना आहे. संघ परिवाराच्या अफवांना बळी न पडता उलट त्या हाणून पाडण्याचे काम याच हिंदूंनी केले आहे. हा देश एकसंध ठेवण्यात इतर धर्मातील सूज्ञ नागरिकांप्रमाणे सामान्य हिंदूंचेही तेवढेच मोलाचे योगदान आहे. हा हिंदू मतदार काँग्रेस आणि तत्सम राजकीय पक्षांची वैचारिक बांधिलकी मानणारा आहे. तो तसा नसता तर संघ परिवाराचे या देशातील सर्व हिंदूंवर एव्हाना वर्चस्व राहिले असते. ही जाणीव संघाला आता झाली असल्यानेच या सामान्य हिंदूंना आपलेसे करायचे व नंतर त्यांच्या मदतीने देशावर राजकीय सत्ता गाजवायची, हा संघाचा अजेंडा आहे. त्यासाठीच संघाला ‘माणुसकी’ आणि ‘बंधुभावाचे’ हिंदुत्व खुणावू लागले आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि काही राज्यांतील भाजपा सरकारमध्ये सत्तेची फळे चाखत असलेल्या वाटेकऱ्यांचाही संघावर त्यादृष्टीने अप्रत्यक्ष दबाव असतोच. त्यामुळे सत्तेची ऊब कायम ठेवण्यासाठी संघाला असे बंधुभावी, सहिष्णु होणे त्या अर्थाने अगत्याचेही झाले आहे. पुढच्या काळात याच अंतर्गत वैचारिक द्वंद्वाने संघ ढवळून निघणार आहे. आपले कट्टरतेचे मूळ नष्ट होऊ द्यायचे नाही पण सहिष्णुताही स्वीकारायची! हे ते द्वंद्व असेल. भागवतांच्या भूमिकेबद्दल मतभेद असलेला एक कट्टर वर्ग संघातच आहे. पण संघीय शिस्तीमुळे तो जाहीरपणे मतप्रदर्शन करीत नाही. पण तोगडिया, योगी आदित्यनाथांसारखी मंडळी समाजात विष पेरतात तेव्हा त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटतात. सरसंघचालकांनी अलीकडे सांगितलेला हिंदुत्वाचा खरा अर्थ संघ परिवारातीलच मंडळी कितपत स्वीकारतात, यावरच या हिंदुत्ववादी संघटनेची नवी दिशा ठरणार आहे.