शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
3
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
4
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
5
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
6
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
7
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर!
9
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
10
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
11
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
13
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
14
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
15
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
16
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
17
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
18
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
19
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
20
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला

महामार्गावर रक्षक हवेत तसेच देवदूतही हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:27 IST

भारत सरकारच्या रस्ता वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वाहतूक संशोधन शाखेच्या अहवालानुसार भारतीय रस्त्यांवर दररोज रस्ते अपघातात ४१० लोकांचा मृत्यू होत असतो. न्यूज चॅनेल्सच्या नावाखाली नाट्य आणि सिनेमातील दृश्ये बघण्याची सवय लागलेल्या दर्शकांना या अपघातांवर उपाय शोधण्याचा विचार करण्यासाठी वेळच मिळत नाही.

- डॉ. एस.एस. मंठा(माजी चेअरमन, एआयसीटीईएडीजे. प्रोफेसर, एनआयएएस बंगळुरू)भारत सरकारच्या रस्ता वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वाहतूक संशोधन शाखेच्या अहवालानुसार भारतीय रस्त्यांवर दररोज रस्ते अपघातात ४१० लोकांचा मृत्यू होत असतो. न्यूज चॅनेल्सच्या नावाखाली नाट्य आणि सिनेमातील दृश्ये बघण्याची सवय लागलेल्या दर्शकांना या अपघातांवर उपाय शोधण्याचा विचार करण्यासाठी वेळच मिळत नाही. त्या अपघातांवर निव्वळ प्रतिक्रिया व्यक्त होत असतात पण त्याबाबत सकारात्मक कृती करण्यासाठी कुणालाच वेळ नसतो.भारतात एकूण १,६५,००० किलोमीटर लांबीचे महामार्ग असून राज्य महामार्गाची लांबीसुद्धा १,८०,०० किमी इतकी आहे. या सर्व महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या २२ कोटी इतकी असून त्यात दरवर्षी २९ लाख वाहनांची भर पडत असते. याचा अर्थ प्रत्येक किलोमीटर अंतरात ८५ वाहने धावत असतात. मोटारकार विकत घेण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा भारतीय खरेदीदार मोटारीच्या किमतीचा विचार करू लागतो. त्यामुळे टाटा मोटार्स, मारुती सुझुकी, रेनॉल्ड, ह्युंडाई मोटार्स यांच्या कमी किमतीच्या मोटारी मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. त्यांची किंमतही चार ते पाच लाख इतकीच असते.इंग्लंडच्या ग्लोबल एनसीएपी या संस्थेने गुणवत्तापूर्ण मोटारींच्या गुणवत्तेचे परीक्षण करून भारतातील छोट्या मोटारींना झीरो स्टार रेटींग दिले आहे! या मोटारी ताशी ४० मैल या वेगाने धावत राहूनही जिवाला धोका निर्माण करणारे अपघात करू शकतात असे निरीक्षण या संस्थेने नोंदवले आहे. रस्त्यावरील वाहतूक सुरक्षित असावी यासाठी केलेल्या प्रयत्नांना अद्याप गती मिळालेली नाही. त्या दृष्टीने जे कायदे प्रस्तावित केले आहेत त्यांचे यश त्या कायद्यांच्या कठोर अंमलबजावणीवर अवलंबून राहणार आहे. नव्या कायद्यामुळे कारची निर्मिती करणाºया उद्योग समूहांना त्यांनी उत्पादित केलेल्या मोटारींमध्ये एअर बॅग्ज, वेगाची सूचना देणारी यंत्रणा, लॉक तोडणे कठीण करणारी यंत्रणा बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे मोटारींच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.रस्ते अपघातात मरण पावणाºयांमध्ये चालक आणि प्रवासी यांची संख्या जास्त आहे. त्यानंतर पादचाºयांची संख्या आहे. दुचाकी चालविणाºयांचे रस्ता अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण एकूण मृत्यूंच्या ३४.८ टक्के आहे. (२०१६ ची आकडेवारी). १७.९ टक्के अपघाती मृत्यू ट्रक्समुळे होतात तर ११.२ टक्के मृत्यू हे पादचाºयांच्या चुकांमुळे होतात. बसेसमुळे १०.५ टक्के, आॅटोरिक्षामुळे ६.६ टक्के आणि अन्य मोटारींमुळे ४.७ टक्के मृत्यू होतात. कोणत्याही कारणाने का होईना पण रस्ता अपघातात नागरिकांचा मृत्यू होणे ही चिंतेची बाब असते. शहरातील प्रवासी वाहतूक, मालवाहतूक सुरळीत चालावी म्हणून रस्त्यांची निर्मिती करण्यात येते. अशा स्थितीत वाहतूक सुरक्षेला महत्त्व मिळायला हवे. तसेच रस्ते अपघात कमी कसे होतील याकडे अधिक लक्ष पुरवायला हवे.भविष्यात रस्ते अपघातात मरण पावणाºयांची नोंद घेणेसुद्धा न्यूजचॅनेलकडून टाळले जाऊ शकते. अशा स्थितीत आपण या अपघातातूनही नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याकडे लक्ष पुरवायला हवे. नवे उत्पादन तयार करणे किंवा उत्पादनाची नवीन पद्धत विकसित करणे म्हणजेच नवीनता नव्हे. नवीनतेने नव्या बाजारपेठांची निर्मितीही करायला हवी.मी नुकताच गुंटूर ते बेरहामपूर हा ६५० किमी लांब प्रवास रस्तामार्गे केला. हा रस्ता फारच सुंदर आहे. पण संपूर्ण प्रवासात वाटेत खायला पदार्थ आणि प्यायला पाणी काही मला मिळाले नाही. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात गोदामांची निर्मिती करण्यात आली आहे. पण खाण्याच्या चांगल्या सोयी जशा दिल्ली अंबाला मार्गावर आढळतात, तशा या रस्त्यावर मला कुठेच पहावयास मिळाल्या नाहीत. तेव्हा प्रत्येक महामार्गावर दर तीन किलोमीटर अंतरावर एखादी टपरी उघडावी. तेथे मोटारीतील बिघाड दुरुस्त करण्याची तसेच अपघातग्रस्तांना प्रथमोपचार करण्याची सोय असावी. याशिवाय चहा, कॉफी अन्य वस्तूसुद्धा तेथे उपलब्ध असाव्यात. त्यामुळे एका टपरीवर किमान पाच जणांना रोजगार मिळू शकेल. भारतातील महामार्गावर यातºहेच्या एक लाख टपºयांची साखळी निर्माण केली जाऊ शकते. या टपºया उभारण्यासाठी जाहिरात कंपन्यांची मदत घ्यावी. कॅडबरी किंवा पतंजली उद्योग ही जबाबदारी उचलू शकतील. एका टपरीचे मासिक उत्पन्न दहा हजार धरले तर एक लाख टपºयांपासून वर्षाला बाराशे कोटी उत्पन्न मिळेल. या टपºया वाहतुकीसाठी दीपगृहाचे काम करतील.जर्मनीच्या आॅटोमोबाईल क्लबने ज्याप्रमाणे अ‍ॅडॅकची निर्मिती केली आहे त्याच धर्तीवर भारतात व्हर्सा (व्हेईकल आॅफ इंडियन रोड सेफ्टी असोसिएशन) ची स्थापना करता येईल. तेथे चोवीस तास अपघातग्रस्तांना मदत मिळू शकेल. त्यासाठी पिवळ्या पोशाखातील मोटार मेकॅनिक्स नेमण्यात येतील. त्यांच्यापाशी तात्काळ घटनास्थळी पोहचता यावे यासाठी पिवळ्या रंगाच्या मोटारी असतील. हे मेकॅनिक एकप्रकारे ‘पिवळे देवदूत’ असतील. त्यांच्यासाठी साध्या मोटार व्हॅन्सचे रूपांतर चालत्याफिरत्या गॅरेजमध्ये करता येईल. व्हर्साचे सदस्यत्व अनिवासी भारतीयांना उपलब्ध केल्यास त्यांना जगात कुठेही मेकॅनिकची सेवा मिळू शकेल. अपघाताचे फोटोकाढल्यास एफआयआर. दाखल करताना त्या फोटोचा उपयोग होऊ शकेल. तो फोटो मोबाईलच्या माध्यमातून जवळच्या पोलीस चौकीला तसेच हॉस्पिटलला पाठविल्यास अपघातग्रस्तांवर वैद्यकीय इलाज करणे सोपे जाईल. त्यामुळे रस्ते अपघातात मृत्यू पावणाºयांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होईल. आधुनिक तंत्रज्ञान जसे जीपीएस बायोमेट्रिक नोंदी इ. चा वापर करून रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित होऊ शकेल. रस्ता वाहतूक सुरक्षेसाठी अशा मॉडेलचा वापर करून अधिक रोजगार निर्मितीबरोबरच अधिक महसूलही मिळवता येईल.ही कल्पना स्टार्टअपला प्रेरणा देणारी ठरेल आणि ती मोठ्या प्रमाणात विकसित झाल्यास ती जुन्या अकार्यक्षम ठरलेल्या यंत्रणेची जागासुद्धा घेऊ शकेल. प्रत्येक दोन चाकी व चार चाकी वाहनांच्या विक्रीच्या वेळी सेसची आकारणी करून त्याचा उपयोग रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने उभारण्यात येणाºया व्हर्सासाठी होऊ शकेल. दोन चाकी वाहनांना हा सेस रु.५०० असावा तर चारचाकी वाहनांना, वाहनांच्या स्वरूपानुसार रु. ५००० पर्यंत सेस आकारण्यात यावा. त्यातून किमान रु. १००० कोटी इतका निधी जमा होऊ शकतो. त्यातून सुरुवातीला दर दहा किलोमीटर अंतरावर एक टपरी उभारण्यात यावी. मातीपासून निर्माण होणाºया घड्याचा उपयोग अनेक तºहेने करता येतो, त्याचप्रमाणे या सेसचा उपयोगही रस्ता सुरक्षेच्या विविध पैलूंवर करता येईल. माझी ही कल्पना वाहतूक मंत्र्यांपर्यंत पोचू शकली तर आपल्याला किमान पाच लाख प्रत्यक्ष आणि त्याहून कितीतरी अधिक अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करता येतील!

टॅग्स :AccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या