शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

खिदमतगार!

By admin | Updated: December 29, 2015 02:39 IST

हुजरेगिरी करणारे खुशमस्करे समाजात सर्वत्र असतात. सत्तेच्या अवतीभवती ते दाटीवाटीने आढळतात. त्यांना कुठलेही क्षेत्र वर्ज्य नसते. साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रात ते जसे दिसतात

- गजानन जानभोरहुजरेगिरी करणारे खुशमस्करे समाजात सर्वत्र असतात. सत्तेच्या अवतीभवती ते दाटीवाटीने आढळतात. त्यांना कुठलेही क्षेत्र वर्ज्य नसते. साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रात ते जसे दिसतात तसाच त्यांचा माध्यमातही मुक्तसंचार असतो. राजकारणात तर त्यांचे वारुळ असते. चापलुसीच्या मार्गाने आपला मतलब साध्य करणे हीच त्यांच्या आयुष्याची इतिकर्तव्यता असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा नागपुरातील राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात या चाटुगारांचे कान टोचले हे एका अर्थाने चांगलेच झाले. ‘साहित्यिकांनी राजसत्तेचे कधीही खिदमतगार होऊ नये, ज्या दिवशी साहित्यिक सत्तेची खिदमत करतील, त्या दिवशी साहित्य संपून जाईल’, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांच्या या विधानामागे कुठलीतरी पार्श्वभूमी असावी. पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांना आलेले असे काही तऱ्हेवाईक अनुभव बहुधा त्यांच्याही वाट्याला आले असावेत. मुख्यमंत्री सभ्य आणि सुसंस्कृत आहेत. आपली ‘एकनाथी’ व्याधीही स्मितहास्यातून व्यक्त करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे असेल कदाचित, त्यांनी ‘हुजरेगिरी, खुशमस्करी’ असे कठोर शब्द न वापरता ‘खिदमत’ या आतिथ्यशील शब्दाचा वापर केला. साहित्यिक मात्र ‘खिदमत’ या शब्दाचा अर्थ आपापल्या कुवती आणि मतलबानुसार लावत आहेत. खरे तर या शब्दाचा अन्वयार्थ शब्दकोशातच लावायला हवा. पण तसे न करता ते आपल्या सग्यासोयऱ्यांच्या खिदमती वर्तनात तो शोधत आहेत.‘खिदमत’ (मुख्यमंत्र्यांनी ध्वनीत केलेला अर्थ) अर्थात खुशमस्करी, चाटुगिरी हे शब्द आता मराठी साहित्यिकांच्या वर्तुळात परवलीचे मानले जातात. काही साहित्यिकांच्या पोटापाण्याची ती सोय आहे. पुरस्कार मिळविण्यासाठी साहित्य सेवेपेक्षा सत्ताधाऱ्यांची चापलुसी म्हणजेच खिदमत करण्याकडे यातील काहींची चढाओढ असते. या खिदमतीच्या वळणवाटा थेट साहित्य अकादमीपर्यंत जाऊन पोहोचतात. यावर्षी महाराष्ट्र सरकारच्या साहित्य-संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी निवड झालेल्या सदस्यांपैकी काहीजण पूर्णवेळ खिदमतगार आहेत. त्यांचा साहित्याशी संबंध शालेय अभ्यासक्रमातील धडे गिरवताना आला तेवढाच मर्यादित. भाजपा-संघ परिवाराची वर्षानुवर्षांपासून ते इमाने-इतबारे खिदमत करीत आहेत, हीच त्यांची गुणवत्ता आणि पात्रताही. काँग्रेसच्या काळातही असे खिदमती साहित्यिक होते. परंतु अशा नियुक्त्या करताना साहित्यमूल्य हा किमान निकष तरी असायचा. पूर्वी साहित्य संमेलनात सारे राजकारणी श्रोत्यांमध्ये बसायचे. पण आता ते संमेलनांच्या व्यासपीठावर, विशेष आसनावर दिसतात. त्यांनी स्वागताध्यक्षपद स्वीकारुन संमेलनाचा आर्थिक भार उचलावा यासाठी हे खिदमतगार त्यांच्यासमोर लाचारासारखे हात जोडून उभे असतात. विश्व साहित्य संंमेलनाच्या विमान प्रवासाचे अनुदान मिळविण्यासाठी साहित्य महामंडळाने सरकारपुढे घातलेले लोटांगण मग त्यातलाच एक घृणास्पद भाग ठरतो. काही राजकारणी साहित्यिकांकडून स्वत:चे चरित्र लिहून घेतात. पीएच.डी. लिहून देणे हे तर काहींच्या उदरनिर्वाहाचे साधन झाले आहे. ज्या नेत्यांच्या शिक्षण संस्था आहेत, त्यातील प्राध्यापक साहित्यिकांच्या खिदमतीला बारोमास पीक आलेले असते. असहिष्णुतेच्या निषेधार्थ पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांची निंदानालस्ती करणे हाही काहींच्या सरकारी खिदमतीचा अलीकडचा उद्योग. ‘मी पुरस्कार परत करणार नाही’ असे ते उगाच जाहीरपणे पीळ देऊन ओरडून सांगतात, तेव्हा त्या खिदमतीचे अर्थ भविष्यातील सरकारी नियुक्त्यांमध्ये दडलेले असतात. मराठी सारस्वतात खिदमतगारांचा पंथ पूर्वीही होता, पण आता त्याच्या झुंडी झाल्या आहेत. त्या एकदा संघटित झाल्या की अधिक आक्रस्ताळ्या होतात. सरकारी पुरस्कार आणि सरकारी समित्या, मंडळांवरील नियुक्त्यांमुळे त्यांना चिथावणी मिळत असते. मराठी साहित्य सृष्टीला खरा धोका या टोळीबाज खिदमतगारांकडून आहे. मुख्यमंत्र्यांनाही कदाचित तेच सांगायचे असावे!