शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

खिदमतगार!

By admin | Updated: December 29, 2015 02:39 IST

हुजरेगिरी करणारे खुशमस्करे समाजात सर्वत्र असतात. सत्तेच्या अवतीभवती ते दाटीवाटीने आढळतात. त्यांना कुठलेही क्षेत्र वर्ज्य नसते. साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रात ते जसे दिसतात

- गजानन जानभोरहुजरेगिरी करणारे खुशमस्करे समाजात सर्वत्र असतात. सत्तेच्या अवतीभवती ते दाटीवाटीने आढळतात. त्यांना कुठलेही क्षेत्र वर्ज्य नसते. साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रात ते जसे दिसतात तसाच त्यांचा माध्यमातही मुक्तसंचार असतो. राजकारणात तर त्यांचे वारुळ असते. चापलुसीच्या मार्गाने आपला मतलब साध्य करणे हीच त्यांच्या आयुष्याची इतिकर्तव्यता असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा नागपुरातील राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात या चाटुगारांचे कान टोचले हे एका अर्थाने चांगलेच झाले. ‘साहित्यिकांनी राजसत्तेचे कधीही खिदमतगार होऊ नये, ज्या दिवशी साहित्यिक सत्तेची खिदमत करतील, त्या दिवशी साहित्य संपून जाईल’, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांच्या या विधानामागे कुठलीतरी पार्श्वभूमी असावी. पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांना आलेले असे काही तऱ्हेवाईक अनुभव बहुधा त्यांच्याही वाट्याला आले असावेत. मुख्यमंत्री सभ्य आणि सुसंस्कृत आहेत. आपली ‘एकनाथी’ व्याधीही स्मितहास्यातून व्यक्त करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे असेल कदाचित, त्यांनी ‘हुजरेगिरी, खुशमस्करी’ असे कठोर शब्द न वापरता ‘खिदमत’ या आतिथ्यशील शब्दाचा वापर केला. साहित्यिक मात्र ‘खिदमत’ या शब्दाचा अर्थ आपापल्या कुवती आणि मतलबानुसार लावत आहेत. खरे तर या शब्दाचा अन्वयार्थ शब्दकोशातच लावायला हवा. पण तसे न करता ते आपल्या सग्यासोयऱ्यांच्या खिदमती वर्तनात तो शोधत आहेत.‘खिदमत’ (मुख्यमंत्र्यांनी ध्वनीत केलेला अर्थ) अर्थात खुशमस्करी, चाटुगिरी हे शब्द आता मराठी साहित्यिकांच्या वर्तुळात परवलीचे मानले जातात. काही साहित्यिकांच्या पोटापाण्याची ती सोय आहे. पुरस्कार मिळविण्यासाठी साहित्य सेवेपेक्षा सत्ताधाऱ्यांची चापलुसी म्हणजेच खिदमत करण्याकडे यातील काहींची चढाओढ असते. या खिदमतीच्या वळणवाटा थेट साहित्य अकादमीपर्यंत जाऊन पोहोचतात. यावर्षी महाराष्ट्र सरकारच्या साहित्य-संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी निवड झालेल्या सदस्यांपैकी काहीजण पूर्णवेळ खिदमतगार आहेत. त्यांचा साहित्याशी संबंध शालेय अभ्यासक्रमातील धडे गिरवताना आला तेवढाच मर्यादित. भाजपा-संघ परिवाराची वर्षानुवर्षांपासून ते इमाने-इतबारे खिदमत करीत आहेत, हीच त्यांची गुणवत्ता आणि पात्रताही. काँग्रेसच्या काळातही असे खिदमती साहित्यिक होते. परंतु अशा नियुक्त्या करताना साहित्यमूल्य हा किमान निकष तरी असायचा. पूर्वी साहित्य संमेलनात सारे राजकारणी श्रोत्यांमध्ये बसायचे. पण आता ते संमेलनांच्या व्यासपीठावर, विशेष आसनावर दिसतात. त्यांनी स्वागताध्यक्षपद स्वीकारुन संमेलनाचा आर्थिक भार उचलावा यासाठी हे खिदमतगार त्यांच्यासमोर लाचारासारखे हात जोडून उभे असतात. विश्व साहित्य संंमेलनाच्या विमान प्रवासाचे अनुदान मिळविण्यासाठी साहित्य महामंडळाने सरकारपुढे घातलेले लोटांगण मग त्यातलाच एक घृणास्पद भाग ठरतो. काही राजकारणी साहित्यिकांकडून स्वत:चे चरित्र लिहून घेतात. पीएच.डी. लिहून देणे हे तर काहींच्या उदरनिर्वाहाचे साधन झाले आहे. ज्या नेत्यांच्या शिक्षण संस्था आहेत, त्यातील प्राध्यापक साहित्यिकांच्या खिदमतीला बारोमास पीक आलेले असते. असहिष्णुतेच्या निषेधार्थ पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांची निंदानालस्ती करणे हाही काहींच्या सरकारी खिदमतीचा अलीकडचा उद्योग. ‘मी पुरस्कार परत करणार नाही’ असे ते उगाच जाहीरपणे पीळ देऊन ओरडून सांगतात, तेव्हा त्या खिदमतीचे अर्थ भविष्यातील सरकारी नियुक्त्यांमध्ये दडलेले असतात. मराठी सारस्वतात खिदमतगारांचा पंथ पूर्वीही होता, पण आता त्याच्या झुंडी झाल्या आहेत. त्या एकदा संघटित झाल्या की अधिक आक्रस्ताळ्या होतात. सरकारी पुरस्कार आणि सरकारी समित्या, मंडळांवरील नियुक्त्यांमुळे त्यांना चिथावणी मिळत असते. मराठी साहित्य सृष्टीला खरा धोका या टोळीबाज खिदमतगारांकडून आहे. मुख्यमंत्र्यांनाही कदाचित तेच सांगायचे असावे!