शहरं
Join us  
Trending Stories
1
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
2
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
3
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
4
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
5
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
6
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
7
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
8
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
9
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
10
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
11
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
12
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
13
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
14
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
15
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
16
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
17
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
18
"...तर पाकिस्तानी खेळाडू भारतात खेळू शकतात" सरकारचा मोठा निर्णय!
19
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
20
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
Daily Top 2Weekly Top 5

बरे झाले; टोपेंनी कान टोचले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 00:54 IST

मिलिंद कुलकर्णी  कोरोनासारख्या जागतिक आपत्तीशी मुकाबला करताना प्रशासकीय व वैद्यकीय प्रशासनाची कसोटी लागली आहे.  या काळात सर्वसमावेशक मानसिकता आणि ...


मिलिंद कुलकर्णी 
कोरोनासारख्या जागतिक आपत्तीशी मुकाबला करताना प्रशासकीय व वैद्यकीय प्रशासनाची कसोटी लागली आहे.  या काळात सर्वसमावेशक मानसिकता आणि कठोर प्रशासन असलेल्या अधिकाºयांना यश मिळते, मात्र अधिकारीपदाची झूल अंगावर चढविलेल्या मंडळींना साथ रोग नियंत्रण कायदा म्हणजे सर्वाधिकार हाती आल्याचा आभास होतो आणि ‘हम करेसो कायदा’ अशा वृत्तीने ती काम करु लागतात. परिणामस्वरुप मदतीचे हात थबकतात, अनुभवाच्या चार गोष्टी सांगणाºया लोकांचे पाय अडखळतात आणि परिस्थिती हाताबाहेर जाते. जळगावचे अगदी असेच झाले आहे. २५ मार्च ते २५ एप्रिल दरम्यान कोरोनाचे तुरळक रुग्ण असताना प्रशासकीय व वैद्यकीय प्रशासन बेफिकीर झाले आणि दुसºया महिन्यात विस्फोट झाला. तो एवढा की, देशातील मृत्यूदरापेक्षा जळगावचा मृत्यूदर चौपट झाला. मुंबई, पुण्यानंतर जळगावची मृत्यूसंख्या राज्यात सर्वाधिक राहिली. 
 जिल्हा आरोग्य समन्वय समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त करीत साथ आटोक्यात आणण्याची सूचना केली. परंतु, तरीही प्रशासकीय व वैद्यकीय यंत्रणेवर परिणाम झाला नाही. अखेर राजकीय नेते, प्रसार माध्यमांनी हा विषय अग्रक्रमाने लावून धरला. शासनदरबारी अखेर दखल घेतली गेली आणि आरोग्यमंत्र्यांनी जळगावात येऊन परिस्थितीचा आढावा घेण्याची तयारी दर्शविली. महिनाभर ढिम्म न हालणाºया प्रशासनाला जाग आली. अधिष्ठात्यांच्या बदलीप्रकरणाविषयी मौन बाळगून असलेल्या संचालक डॉ.तात्याराव लहाने यांनी तातडीने वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय अधिकाºयांची आॅनलाईन बैठक घेऊन खरडपट्टी काढली. महिन्याभरापासून साथ आटोक्यात येत नसताना संचालकांनी कधीही दखल घेतल्याचे ऐकिवात नाही. १३६ वैद्यकीय अधिकारी या महाविद्यालयात कार्यरत आहेत. त्या महाविद्यालयातील कोविड रुग्णालयात २०० खाटांची व्यवस्था असताना या अधिकाºयांकडून उपचार होत नसल्याची आणि प्रशिक्षणार्थी अधिकाºयांकडे जबाबदारी सोपविल्याची तक्रार होऊनही संचालकांनी दखल घेतली नाही. गैरहजर राहणाºया वैद्यकीय अधिकाºयांच्या बडतर्फीचे प्रस्ताव अधिष्ठात्यांनी संचालकांकडे पाठवूनदेखील त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. डॉ.चंद्रशेखर डांगे नामक अधिकारी हे अधिष्ठात्यांच्या खूर्चीवर बसून गैरवर्तन करीत असल्याच्या तक्रारी झाल्या. छायाचित्रे प्रसारमाध्यमात आली. त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. मात्र आरोग्यमंत्री येणार म्हटल्यावर संचालकांनी तातडीने आॅनलाईन बैठक घेतली. ही सक्रियता कशाचे द्योतक आहे? 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अनागोंदीविषयी रोज नवनवे प्रकार समोर येत असतानाही प्रशासकीय यंत्रणेकडून उपाययोजना केली जात नव्हती. आरोग्यमंत्री येणार म्हटल्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. त्यांनीही तातडीने कोविड रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. 
बरे झाले आरोग्यमंत्री राजेश टोपे आले. प्रशासकीय यंत्रणा आणि वैद्यकीय यंत्रणेला लोकप्रतिनिधी, जनता आणि प्रसारमाध्यमांचे वावडे आहे. चांगल्या सूचना या तक्रारी वाटतात. अखेर याच मंडळींशी टोपे यांनी संवाद साधला. आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या, अशी सूचना प्रशासकीय व वैद्यकीय यंत्रणेला त्यांनी केली. 
प्रयोगशाळेसाठी उपकरणे दिली आहेत, मग अहवाल येण्यास उशीर कशासाठी असा प्रश्न आरोग्यमंत्र्यांनी विचारला आणि २४ तासात अहवाल देण्याचे आदेश दिले. तरीही अद्याप ७०७ अहवाल प्रलंबित आहेत. 
वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व इतर रिक्त पदे भरण्याचे अधिकार जिल्हाधिकारी व अधिष्ठाता यांना दिल्याची आठवण टोपे यांनी करुन दिली. 
संजीवनी, गणपतीपाठोपाठ गोल्डसिटी व गोदावरी फाउंडेशनच्या १०० खाटांचे अधिग्रहण कोविड रुग्णालय म्हणून करण्याचा निर्णय मंत्र्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.खाजगी रुग्णालये सुरु न झाल्यास परवाने रद्द करण्याचा इशारा देत असतानाच कोविड रुग्णालयात खाजगी डॉक्टरांनी सेवा द्यावी, त्यांना वेतन देऊ. पीपीई कीटसह सुरक्षा उपाययोजना करु. डेथ आॅडिट कमिटीत स्थान देऊ असे म्हणत खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांनी गोंजारले. 
विशेष म्हणजे, जळगाव जिल्ह्यात मंत्री, अनेक माजी मंत्री असतानाही बाहेरुन मंत्री येऊन कान टोचतो, हे याठिकाणच्या नेत्यांचे की, प्रशासकीय यंत्रणेचे अपयश म्हणायचे?

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव