शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

हरिसालचे वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:36 IST

वातानुकूलित कक्षात बसून डिजिटल व्हिलेजचे प्रारूप तयार करणा-या सरकारी यंत्रणेने मोठा गाजावाजा करीत अमरावती जिल्ह्यातील हरिसाल या गावाला देशातील पहिले डिजिटल व्हिलेज घोषित तर केले मात्र एक वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही मेळघाट व्याघ्र

वातानुकूलित कक्षात बसून डिजिटल व्हिलेजचे प्रारूप तयार करणा-या सरकारी यंत्रणेने मोठा गाजावाजा करीत अमरावती जिल्ह्यातील हरिसाल या गावाला देशातील पहिले डिजिटल व्हिलेज घोषित तर केले मात्र एक वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हे गाव डिजिटल तर सोडा साधे विकासाच्या प्रवाहातही आले नाही. डिजिटल व्हिलेजचे कार्यालय वगळता कुठेही डिजिटायझेशन दिसत नाही. वर्षभरापूर्वी देशात प्रकाशझोतात आलेल्या हरिसालमध्ये सुरुवातीला येणाºया लालदिव्यांच्या गाड्या नंतर बेपत्ता झाल्या. डिजिटायझेशनचे सुरू झालेले काम अवघ्या काही महिन्यातच बंद पडले. या कामांचा पाठपुरावा करण्याची तसदीही कुणी घेतली नाही. मात्र वर्षभरानंतर हरिसालचा उल्लेख स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी सरकारने केला तेव्हा गावकºयांनीच या डिजिटल व्हिलेजची पोलखोल केली. प्रसारमाध्यमांमध्ये हरिसालचे ‘जैसे थे’ रूप प्रसारित होताच अधिकाºयांच्या पायाखालची जमीन सरकली. अधिकाºयांचा नाकर्तेपणा बघून मुख्यमंत्रीही अचंबित झाले. गंभीर दखल घेण्यात आली. बातम्या उमटताच अधिकाºयांची फौज पोहोचली. अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशींनीही हरिसाल गाठले आणि वर्षभरापूर्वी ज्या गावाला डिजिटल व्हिलेज होण्याचा बहुमान मिळाला होता त्याची दैना बघून तेही नि:शब्द झाले. हायटेक कार्यालय असले तरी तेथे काम करणाºयांची वानवा आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात टेलि मेडिसीन सेंटर असले तरी बहुतांश रुग्णांना आजही धारणीला जाण्याचा सल्ला दिला जातो. जिल्हा परिषद शाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांना पुरविण्यात आलेल्या ई-लर्निंग सुविधेचा नेटच्या धीम्या गतीमुळे फज्जा उडाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून स्मार्ट रेशन कार्ड तयार करण्याचे काम थंडबस्त्यात आहे. गावात एटीएम आहे, १६०० खाती आॅनलाईन आहेत, गावातील व्यापाºयांना पीटीएम आणि भीमसारखे अ‍ॅप देण्यात आले. असे असले तरी आॅनलाईनचे सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत. हे खरे वास्तव आहे हरिसालचे. परंतु शासनाच्या जाहिरातीत हेच हरिसाल डिजिटल दाखविण्यात आल्याने गावकºयांची फसवणूक तर होत आहेच शिवाय राज्यातील इतर भागात शासनाचीही नाचक्की झाली, ती वेगळी. आपलं गाव डिजिटल होणार, या भाबड्या आशेवर असलेल्या आदिवासींचा सरकारी यंत्रणेवरील विश्वास उठणार नाही, याची काळजी वेळीच घ्यावी लागणार आहे. अन्यथा ‘खोदा पहाड़, निकली चूहिया’ अशी गत शासनाची झाल्याखेरीज राहणार नाही.

टॅग्स :digitalडिजिटल