शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

हरिसालचे वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:36 IST

वातानुकूलित कक्षात बसून डिजिटल व्हिलेजचे प्रारूप तयार करणा-या सरकारी यंत्रणेने मोठा गाजावाजा करीत अमरावती जिल्ह्यातील हरिसाल या गावाला देशातील पहिले डिजिटल व्हिलेज घोषित तर केले मात्र एक वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही मेळघाट व्याघ्र

वातानुकूलित कक्षात बसून डिजिटल व्हिलेजचे प्रारूप तयार करणा-या सरकारी यंत्रणेने मोठा गाजावाजा करीत अमरावती जिल्ह्यातील हरिसाल या गावाला देशातील पहिले डिजिटल व्हिलेज घोषित तर केले मात्र एक वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हे गाव डिजिटल तर सोडा साधे विकासाच्या प्रवाहातही आले नाही. डिजिटल व्हिलेजचे कार्यालय वगळता कुठेही डिजिटायझेशन दिसत नाही. वर्षभरापूर्वी देशात प्रकाशझोतात आलेल्या हरिसालमध्ये सुरुवातीला येणाºया लालदिव्यांच्या गाड्या नंतर बेपत्ता झाल्या. डिजिटायझेशनचे सुरू झालेले काम अवघ्या काही महिन्यातच बंद पडले. या कामांचा पाठपुरावा करण्याची तसदीही कुणी घेतली नाही. मात्र वर्षभरानंतर हरिसालचा उल्लेख स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी सरकारने केला तेव्हा गावकºयांनीच या डिजिटल व्हिलेजची पोलखोल केली. प्रसारमाध्यमांमध्ये हरिसालचे ‘जैसे थे’ रूप प्रसारित होताच अधिकाºयांच्या पायाखालची जमीन सरकली. अधिकाºयांचा नाकर्तेपणा बघून मुख्यमंत्रीही अचंबित झाले. गंभीर दखल घेण्यात आली. बातम्या उमटताच अधिकाºयांची फौज पोहोचली. अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशींनीही हरिसाल गाठले आणि वर्षभरापूर्वी ज्या गावाला डिजिटल व्हिलेज होण्याचा बहुमान मिळाला होता त्याची दैना बघून तेही नि:शब्द झाले. हायटेक कार्यालय असले तरी तेथे काम करणाºयांची वानवा आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात टेलि मेडिसीन सेंटर असले तरी बहुतांश रुग्णांना आजही धारणीला जाण्याचा सल्ला दिला जातो. जिल्हा परिषद शाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांना पुरविण्यात आलेल्या ई-लर्निंग सुविधेचा नेटच्या धीम्या गतीमुळे फज्जा उडाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून स्मार्ट रेशन कार्ड तयार करण्याचे काम थंडबस्त्यात आहे. गावात एटीएम आहे, १६०० खाती आॅनलाईन आहेत, गावातील व्यापाºयांना पीटीएम आणि भीमसारखे अ‍ॅप देण्यात आले. असे असले तरी आॅनलाईनचे सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत. हे खरे वास्तव आहे हरिसालचे. परंतु शासनाच्या जाहिरातीत हेच हरिसाल डिजिटल दाखविण्यात आल्याने गावकºयांची फसवणूक तर होत आहेच शिवाय राज्यातील इतर भागात शासनाचीही नाचक्की झाली, ती वेगळी. आपलं गाव डिजिटल होणार, या भाबड्या आशेवर असलेल्या आदिवासींचा सरकारी यंत्रणेवरील विश्वास उठणार नाही, याची काळजी वेळीच घ्यावी लागणार आहे. अन्यथा ‘खोदा पहाड़, निकली चूहिया’ अशी गत शासनाची झाल्याखेरीज राहणार नाही.

टॅग्स :digitalडिजिटल