शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

हरपलेला संवाद, हरवलेली माणसं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2018 07:58 IST

आत्महत्या. रोज होतायत. विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरदार, महिला...असे समाजातील सगळ्या घटकांमधील व्यक्ती आत्महत्या करताना दिसतात. वय, शिक्षण, आर्थिक गट असा भेदाभेद पण याठिकाणी नाही. आत्महत्येची कारणे वेगवेगळी असतात.

-मिलिंद कुलकर्णी

आत्महत्या. रोज होतायत. विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरदार, महिला...असे समाजातील सगळ्या घटकांमधील व्यक्ती आत्महत्या करताना दिसतात. वय, शिक्षण, आर्थिक गट असा भेदाभेद पण याठिकाणी नाही. आत्महत्येची कारणे वेगवेगळी असतात. पुन्हा जी समोर येतात आणि पडद्याआड राहतात ती, अशी कारणे वेगवेगळी असतात. का होतंय असं, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. उत्तर सापडत नाहीये. तंत्रज्ञानाने जग जवळ आलेय, पण संवाद हरवतोय...हे सगळे सांगत असतात, त्यात तथ्य वाटू लागतेय. अडचणी, समस्या प्रत्येकाला असतात, पण कडेलोट होईल एवढी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा आधाराला मित्र, जोडीदार, नातलग असायला हवा. ही उणीव प्रामुख्याने दिसून येते.दहावी, बारावी परीक्षांचा मोसम आला की, आत्महत्यांचे प्रमाण वाढते. पेपर चांगला गेला नाही, चांगले मार्क मिळणार नाही, चांगल्या कोर्सला प्रवेश मिळणार नाही, ही कारणे त्यामागे असतात. कुटुंबियांच्या पाल्यांकडून असलेल्या वाढत्या अपेक्षा, मार्कांची जीवघेणी स्पर्धा, क्लास, कॉलेज, अभ्यास या धकाधकीतून थकलेले विद्यार्थी असे चित्र सभोवताली दिसते. परीक्षा कालावधीत शिक्षण विभागातर्फे जिल्हापातळीवर समुपदेशकदेखील नियुक्त केले जातात. पण त्याचा कितपत लाभ होतो, हे कळायला मार्ग नाही. मुळात घरातच संवाद वाढला, पाल्यांचा कल ओळखून अभ्यासक्रमाची निवड, अपयशाच्या काळात मानसिक आधार दिला गेला तर मुले या मार्गाला वळणार नाही. बेगडया प्रतिष्ठेपायी आपण मुलांना वेठीला धरु लागलो आहोत, त्याचे परिणाम मग आयुष्यभर त्या कुटुंबाला भोगावे लागतात.

शेतकरी आत्महत्येविषयी मंथन सुरु आहे. स्वामीनाथन आयोग, कर्जमाफी, वीजबिल माफी, कृषिमूल्य आयोगाकडून योग्य दराची हमी असे पर्याय सुचविले जात आहे. आंदोलने होत आहे. परंतु ठोस उपाययोजना होत नसल्याने आत्महत्या सुरुच आहे. शेतकऱ्याचा माल बाजारात पोहोचला की, दर कोसळतात, लागवडीचा खर्च निघत नाही. स्वत: उत्पादित केलेल्या मालाची किंमत ठरवू न शकण्याचे कृषि क्षेत्र हे एकमेव क्षेत्र म्हणावे लागेल. शेतीचं गणित बिघडले आहे, त्याचे परिणाम बळीराजाच्या कुटुंबियांना भोगावे लागत आहे. ६० टक्के लोकसंख्या कृषी क्षेत्राशी निगडीत असताना सरकार, समाज यांच्याकडून गांभीर्याने विचार होत नाही, हे चिंताजनक आहे. जागतिक व भारतीय बाजारपेठेतील घडामोडी, शासनाच्या आर्थिक निर्णयात होणारे बदल, मंदीचे सावट याचा परिणाम व्यापार व उद्योग क्षेत्रावर झाला आहे. परिणामी अभूतपूर्व मंदीच्या चक्रव्युहात व्यापार, व्यवसाय सापडला आहे. याचा फटका छोट्या व्यापारी आणि उद्योजकांना बसला आहे. या क्षेत्रातदेखील आत्महत्यांचे वाढते प्रमाण हे चिंताजनक आहे.

कुटुंबांपासून दुरावलेली माणसे हा आणखी एक चिंतेचा विषय आहे. अहंकार, विक्षिप्तपणा, हेकेखोर वृत्तीमुळे दुरावा निर्माण होतो. सामंजस्य, मनाचा मोठेपणा, क्षमाशील वृत्ती ही गुणवैशिष्टे आपल्यासाठी नाहीच, असा समज करुन माणसे स्वकीयांना दूर लोटतात. माणसांच्या गर्दीतही एकटे उरतात. मध्यंतरी जळगावला घडलेल्या घटनेने समाज सुन्न झाला. निवृत्तीनंतर पत्नीपासून विभक्त राहणारी व्यक्ती निवृत्तीवेतन घेण्यासाठी जळगावात आली. एका लॉजवर मुक्काम केला. तेथेच रात्री हृदयविकाराने निधन झाले. गावात पत्नी असून तिला दुस-यादिवशी ही दु:खद वार्ता कळाली. संवाद किती महत्त्वाचा हे वेगवान संवादमाध्यमांच्या काळात आवर्जून जाणवू लागले आहे.