शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हरपलेला संवाद, हरवलेली माणसं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2018 07:58 IST

आत्महत्या. रोज होतायत. विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरदार, महिला...असे समाजातील सगळ्या घटकांमधील व्यक्ती आत्महत्या करताना दिसतात. वय, शिक्षण, आर्थिक गट असा भेदाभेद पण याठिकाणी नाही. आत्महत्येची कारणे वेगवेगळी असतात.

-मिलिंद कुलकर्णी

आत्महत्या. रोज होतायत. विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरदार, महिला...असे समाजातील सगळ्या घटकांमधील व्यक्ती आत्महत्या करताना दिसतात. वय, शिक्षण, आर्थिक गट असा भेदाभेद पण याठिकाणी नाही. आत्महत्येची कारणे वेगवेगळी असतात. पुन्हा जी समोर येतात आणि पडद्याआड राहतात ती, अशी कारणे वेगवेगळी असतात. का होतंय असं, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. उत्तर सापडत नाहीये. तंत्रज्ञानाने जग जवळ आलेय, पण संवाद हरवतोय...हे सगळे सांगत असतात, त्यात तथ्य वाटू लागतेय. अडचणी, समस्या प्रत्येकाला असतात, पण कडेलोट होईल एवढी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा आधाराला मित्र, जोडीदार, नातलग असायला हवा. ही उणीव प्रामुख्याने दिसून येते.दहावी, बारावी परीक्षांचा मोसम आला की, आत्महत्यांचे प्रमाण वाढते. पेपर चांगला गेला नाही, चांगले मार्क मिळणार नाही, चांगल्या कोर्सला प्रवेश मिळणार नाही, ही कारणे त्यामागे असतात. कुटुंबियांच्या पाल्यांकडून असलेल्या वाढत्या अपेक्षा, मार्कांची जीवघेणी स्पर्धा, क्लास, कॉलेज, अभ्यास या धकाधकीतून थकलेले विद्यार्थी असे चित्र सभोवताली दिसते. परीक्षा कालावधीत शिक्षण विभागातर्फे जिल्हापातळीवर समुपदेशकदेखील नियुक्त केले जातात. पण त्याचा कितपत लाभ होतो, हे कळायला मार्ग नाही. मुळात घरातच संवाद वाढला, पाल्यांचा कल ओळखून अभ्यासक्रमाची निवड, अपयशाच्या काळात मानसिक आधार दिला गेला तर मुले या मार्गाला वळणार नाही. बेगडया प्रतिष्ठेपायी आपण मुलांना वेठीला धरु लागलो आहोत, त्याचे परिणाम मग आयुष्यभर त्या कुटुंबाला भोगावे लागतात.

शेतकरी आत्महत्येविषयी मंथन सुरु आहे. स्वामीनाथन आयोग, कर्जमाफी, वीजबिल माफी, कृषिमूल्य आयोगाकडून योग्य दराची हमी असे पर्याय सुचविले जात आहे. आंदोलने होत आहे. परंतु ठोस उपाययोजना होत नसल्याने आत्महत्या सुरुच आहे. शेतकऱ्याचा माल बाजारात पोहोचला की, दर कोसळतात, लागवडीचा खर्च निघत नाही. स्वत: उत्पादित केलेल्या मालाची किंमत ठरवू न शकण्याचे कृषि क्षेत्र हे एकमेव क्षेत्र म्हणावे लागेल. शेतीचं गणित बिघडले आहे, त्याचे परिणाम बळीराजाच्या कुटुंबियांना भोगावे लागत आहे. ६० टक्के लोकसंख्या कृषी क्षेत्राशी निगडीत असताना सरकार, समाज यांच्याकडून गांभीर्याने विचार होत नाही, हे चिंताजनक आहे. जागतिक व भारतीय बाजारपेठेतील घडामोडी, शासनाच्या आर्थिक निर्णयात होणारे बदल, मंदीचे सावट याचा परिणाम व्यापार व उद्योग क्षेत्रावर झाला आहे. परिणामी अभूतपूर्व मंदीच्या चक्रव्युहात व्यापार, व्यवसाय सापडला आहे. याचा फटका छोट्या व्यापारी आणि उद्योजकांना बसला आहे. या क्षेत्रातदेखील आत्महत्यांचे वाढते प्रमाण हे चिंताजनक आहे.

कुटुंबांपासून दुरावलेली माणसे हा आणखी एक चिंतेचा विषय आहे. अहंकार, विक्षिप्तपणा, हेकेखोर वृत्तीमुळे दुरावा निर्माण होतो. सामंजस्य, मनाचा मोठेपणा, क्षमाशील वृत्ती ही गुणवैशिष्टे आपल्यासाठी नाहीच, असा समज करुन माणसे स्वकीयांना दूर लोटतात. माणसांच्या गर्दीतही एकटे उरतात. मध्यंतरी जळगावला घडलेल्या घटनेने समाज सुन्न झाला. निवृत्तीनंतर पत्नीपासून विभक्त राहणारी व्यक्ती निवृत्तीवेतन घेण्यासाठी जळगावात आली. एका लॉजवर मुक्काम केला. तेथेच रात्री हृदयविकाराने निधन झाले. गावात पत्नी असून तिला दुस-यादिवशी ही दु:खद वार्ता कळाली. संवाद किती महत्त्वाचा हे वेगवान संवादमाध्यमांच्या काळात आवर्जून जाणवू लागले आहे.