शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

गुरुदेवभक्ताची नि:स्पृह सेवा उपेक्षित राहिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 3:46 AM

लक्ष्मणदादा नारखेडे परवा गेले. कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्यांचे ते सहकारी. त्यांना अनुयायी किंवा भक्त यासाठी म्हणता येणार नाही कारण, तुकारामदादांच्याही कार्याकडे ते तटस्थतेने बघायचे.

-  गजानन जानभोर

लक्ष्मणदादा नारखेडे परवा गेले. कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्यांचे ते सहकारी. त्यांना अनुयायी किंवा भक्त यासाठी म्हणता येणार नाही कारण, तुकारामदादांच्याही कार्याकडे ते तटस्थतेने बघायचे. जिथे उणिवा राहायच्या तिथे स्पष्टपणे सांगायचे. म्हणूनच त्यांना दादांनी आपले उत्तराधिकारी नेमले. लक्ष्मणदादा प्रसिद्धीपराङमुख होते. आपले सामान्यपण ढळू न देता त्यांनी राष्ट्रसंतांच्या कार्यासाठी आयुष्य दिले. तुकारामदादांनी उभारलेल्या अड्याळ टेकडीवर ग्रामस्वराज्याचे अनेक प्रयोग सतत सुरू असतात. दादा गेल्यानंतर या कामाचे पुढे काय होईल, असा प्रश्न कार्यकर्त्यांना अस्वस्थ करायचा. दादांची असंख्य कामे अपुरी राहिली होती. त्यांनी ज्यांना आधार दिला ती माणसे आत्मनिर्भर व्हायची होती. आपण १०० वर्षांचे होईपर्यंत कार्यरत राहू, या दादांंच्या आश्वासनामुळे कार्यकर्त्यांना बळ आले होते. पण, १२ वर्षांपूर्वी तुकारामदादांनी अचानक या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांना आलेले अनाथपण लक्ष्मणदादांनी कधी जाणवू दिले नाही. आपले घरदार, शेतीवाडी गुरुदेवाच्या कार्यासाठी समर्पित करून या कार्यकर्त्याने तुकारामदादांची सोबत धरली. लक्ष्मणदादा तसे बुलडाणा जिल्ह्यातील नांदुऱ्याचे. पण, संपूर्ण आयुष्य त्यांनी सेवाकार्यातच घालवले. ग्रामस्वराज्याच्या चळवळीसाठी लक्ष्मणदादा सतत भ्रमंतीवर असायचे. तुकारामदादा गेल्यानंतर अड्याळ टेकडीच लक्ष्मणदादांचे कार्यक्षेत्र झाले. तुकारामदादा हे तपपूत जीवन जगणारे किंवा ईश्वर चिंतनात गढून राहणारे साधू नव्हते. ते समाजाच्या प्रश्नांशी नाते राखणारे, त्याच्यावरील संकटाविरुद्ध लढणारे कार्यकर्ते होते. लक्ष्मणदादांचा स्वभाव मात्र काहीसा शांत. कुठलेही वलय आपल्याभोवती निर्माण होणार नाही याची काळजी ते सतत घ्यायचे.कुठल्याही क्षेत्रातील माणसाच्या कार्याची दखल समाज घेऊ लागतो तेव्हा त्याच्याभोवती आपसूकच एक वलय निर्माण होत असते. त्याच्या कीर्तीत आणि लोकप्रियतेत हे असे वलयांकित असणे आवश्यक ठरते. पण, लक्ष्मणदादांनी असे कुठलेही वलय स्वत:भोवती निर्माण होऊ दिले नाही. त्यामुळे गुरुदेव सेवा परिवारात ते दुर्लक्षित राहिले आणि त्यांच्या नि:स्पृह सेवेची समाजाने म्हणावी तशी दखलही घेतली नाही. एरवी आयुष्याच्या संध्याकाळी असे कार्यकर्ते निराश होत असतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यात एक वैषम्य जाणवत असते. पण, लक्ष्मणदादांच्या चेहºयावरचे समाधानाचे भाव अखेरपर्यंत कायम होते.पुरस्कार, प्रसिद्धीमुळे आपल्यात अहंकार तर निर्माण होणार नाही, असे भिडस्त स्वभावाच्या या ज्येष्ठ कार्यकर्त्याला नेहमी वाटायचे. जाहीर भाषणात मला मान-सन्मानाची अपेक्षा नाही, असे म्हणायचे व नंतर मंत्र्या-संत्र्यांकडे लॉबिंग करून ते मिळवून घ्यायचे अशा लबाड्या म्हणूनच लक्ष्मणदादांना कधी जमल्या नाहीत. राष्ट्रसंतांच्या स्वप्नातील खरा आणि प्रामाणिक गुरुदेवभक्त ते होते. आपण गेल्यानंतर समाजाचे, देशाचे आणि आपल्या कामाचे पुढे काय होईल, अशी चिंता काही सामाजिक कार्यकर्त्यांना उगाच लागून असते. त्या काळजीतून मग ते इच्छा असो नसो आपल्या मुलांवर सामाजिक कार्याचे ओझे लादत असतात. हा सेवेचा पिढीजात वारसा उपजत नसल्याने ते कार्य पुढे व्यावसायिक आणि प्रचारी पद्धतीने रेटले जाते. त्यातूनच त्या कामातील सेवा हळूहळू नष्ट होते आणि प्रसिद्धी व प्रतिष्ठेलाच सामाजिक कार्याचा मापदंड ठरवला जातो. लक्ष्मणदादांशी बोलताना त्यांना अशी चिंता असल्याचे जाणवले नाही. आपल्या पश्चात हे कार्य समाजच पुढे नेईल असे ते सांगायचे. त्यामुळे ते नसताना गुरुदेवभक्तांची जबाबदारी आणखी वाढणारी आहे.