शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

प्राचीन संस्कृती संवर्धनासाठी उत्तम संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 19:38 IST

दोन तास चाललेल्या या सोहळ्याने पाचशे वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली. भारतीय संस्कृतीतील ‘देवा’ला स्वत:चे हक्काचे ‘घर’ मिळाले.

ठळक मुद्देनरेंद्र मोदी, सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या दुर्दम्य इच्छाशक्ती तसेच अथक प्रयत्नांमुळेच बुधवारचा विजय हाती लागला. त्याबद्दल त्या सर्वांचे अभिनंदन! पण...

- भारतकुमार राऊत(ज्येष्ठ पत्रकार व माजी संसद सदस्य)गेल्या बुधवारी देशात सर्वत्र मुसळधार पावसाने कहर केला होता. त्यातच कोरोना विषाणूचा राक्षस डोकावून विकट हास्य करीतच होता. तरीही अवघा भारत देश आनंदात न्हात होता. कारण, उत्तर प्रदेशातील अयोध्या क्षेत्री रामजन्मभूमीवर नियोजित राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत होते. प्रत्येक हिंदू भारतीय दोन डोळ्यांचे प्राण करून प्रत्येक क्षण मनात साठवत होता. अभूतपूर्व म्हणावा असाच हा सोहळा!

दोन तास चाललेल्या या सोहळ्याने पाचशे वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली. भारतीय संस्कृतीतील ‘देवा’ला स्वत:चे हक्काचे ‘घर’ मिळाले. आता दोनेक वर्षांत मंदिराच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल आणि इतका प्रदीर्घ काळ बाबरीच्या दाराशी तिष्ठत खोळंबलेले रामलल्ला पुन्हा दिमाखात गाभाऱ्यात प्रवेश करतील. प्रत्येक भारतीय आता त्या घटकेची मनोमन आतुरतेने वाट पाहात आहे. राम मंदिर वादात गेल्या पाचशे वर्षांत झालेल्या रस्त्यांवरील आणि न्यायालयीन लढायांचे आता पुन:पुन्हा स्मरण करण्याचे कारण नाही; पण अंतिमत: ही लढाई कायद्याच्या चौकटीत रामभक्तांनी जिंकलीच. मात्र, ज्यांचा शेवट गोड ते सारेच गोड, असा पवित्रा इथे घ्यायचे कारण नाही. कारण या लढाईत अनेकांनी आपले प्राण गमावले. घरादाराची राखरांगोळी झाली. अनेक संसार उघड्यावर आले. त्यांच्यापुढं झालेल्या अनन्वित अत्याचारांची व अन्यायाची भरपाई कोण आणि कशी करणार? त्यामुळेच गेल्या पाचशे वर्षांत जे कटू पचविले आणि जे विष प्राशन केले, त्याचे गोड फळ हाती लागले, असेच मानावे लागेल.

नरेंद्र मोदी, सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या दुर्दम्य इच्छाशक्ती तसेच अथक प्रयत्नांमुळेच बुधवारचा विजय हाती लागला. त्याबद्दल त्या सर्वांचे अभिनंदन! पण बाबरी पाडून राम मंदिर बांधणे हाच संघ-भाजपचा अंतिम उद्देशअसेल का? तसे असेल तर आणखी दोन वर्षांत तोही सफल होईल. मग पुढे काय? काँग्रेससमोर स्वातंत्र्य मिळविणे हा उद्देश होता. १९४७ मध्ये तो सफल झाल्यावर पुढे काय? हा प्रश्न आ वासून उभा राहिला. त्यावर महात्मा गांधीजींसह समस्त काँग्रेसजनांसमोर समर्पक उत्तर नव्हते. तेव्हा गांधीजींनी काँग्रेस विसर्जित करण्याची क्रांतिकारी सूचना केली. तोवर सत्तेचीच स्वप्नं पाहणा-या काँग्रेसजनांना ती मान्य होणे शक्यच नव्हते. त्यामुळे काँग्रेस जिवंत राहिली खरी; पण भरसमुद्रात वाट चुकलेल्या जहाजासारखी भरकटत राहिली. म्हणूनच आपल्याला नक्की काय साधायचं आहे, याच्या लघु पल्ल्याच्या आणि दीर्घ पल्ल्याच्या योजना भाजप, संघ आणि पंतप्रधान मोदी यांना आताच आखून त्या मार्गाने चालणे सुरू करावे लागेल. केवळ प्रभू रामाच्या रोज आरत्या ओवाळण्याने काहीच साध्य होणार नाही.

प्रभू राम, श्रीकृष्ण आणि भगवान बुद्ध ही केवळ धार्मिक प्रतीके नसून, या विभूती भारतीय प्राचीन आणि अर्वाचीन संस्कृतीची रूपे आहेत. त्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राम मंदिरासारखे प्रकल्प उत्तम संधी आहेत. प्रभू राम व कृष्ण द्वापार आणि त्रेता युगातील आहेत, असे मानले तरी त्यानंतर मानवजातीत आणि जगात अनेक लक्षणीय स्थित्यंतरे झाली. यांतील काही मानवी प्रयत्नांनी, तर काही परिस्थितीवशात घडत गेली. महायुद्धे, औद्योगिक क्रांती, विविध राज्यक्रांती आणि लढाया यांचेही अपरिहार्य परिणाम जगावर झालेच.त्यांचे आलेख, पडसाद आणि परिणाम यांचे दर्शन या प्रस्तावित राम मंदिरात घडवून देता येईल. तसे जर घडले, तरच तिथे प्रभू रामचंद्रांचा वास आहे, असे मानता येईल. नाही तर गावागावांत एखादे ‘प्राचीन’ देवस्थान असतेच, त्यात आणखी एकाची भर पडेल आणि सकाळ-संध्याकाळी आणखी आरत्या ओवाळल्या जातील, इतकेच. त्यात प्रभू राम कुठे असेल?

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या