शहरं
Join us  
Trending Stories
1
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
2
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
5
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
6
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
7
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
8
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
9
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
10
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
11
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
12
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
13
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
14
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
15
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
16
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
17
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
18
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
19
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
20
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!

प्राचीन संस्कृती संवर्धनासाठी उत्तम संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 19:38 IST

दोन तास चाललेल्या या सोहळ्याने पाचशे वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली. भारतीय संस्कृतीतील ‘देवा’ला स्वत:चे हक्काचे ‘घर’ मिळाले.

ठळक मुद्देनरेंद्र मोदी, सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या दुर्दम्य इच्छाशक्ती तसेच अथक प्रयत्नांमुळेच बुधवारचा विजय हाती लागला. त्याबद्दल त्या सर्वांचे अभिनंदन! पण...

- भारतकुमार राऊत(ज्येष्ठ पत्रकार व माजी संसद सदस्य)गेल्या बुधवारी देशात सर्वत्र मुसळधार पावसाने कहर केला होता. त्यातच कोरोना विषाणूचा राक्षस डोकावून विकट हास्य करीतच होता. तरीही अवघा भारत देश आनंदात न्हात होता. कारण, उत्तर प्रदेशातील अयोध्या क्षेत्री रामजन्मभूमीवर नियोजित राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत होते. प्रत्येक हिंदू भारतीय दोन डोळ्यांचे प्राण करून प्रत्येक क्षण मनात साठवत होता. अभूतपूर्व म्हणावा असाच हा सोहळा!

दोन तास चाललेल्या या सोहळ्याने पाचशे वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली. भारतीय संस्कृतीतील ‘देवा’ला स्वत:चे हक्काचे ‘घर’ मिळाले. आता दोनेक वर्षांत मंदिराच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल आणि इतका प्रदीर्घ काळ बाबरीच्या दाराशी तिष्ठत खोळंबलेले रामलल्ला पुन्हा दिमाखात गाभाऱ्यात प्रवेश करतील. प्रत्येक भारतीय आता त्या घटकेची मनोमन आतुरतेने वाट पाहात आहे. राम मंदिर वादात गेल्या पाचशे वर्षांत झालेल्या रस्त्यांवरील आणि न्यायालयीन लढायांचे आता पुन:पुन्हा स्मरण करण्याचे कारण नाही; पण अंतिमत: ही लढाई कायद्याच्या चौकटीत रामभक्तांनी जिंकलीच. मात्र, ज्यांचा शेवट गोड ते सारेच गोड, असा पवित्रा इथे घ्यायचे कारण नाही. कारण या लढाईत अनेकांनी आपले प्राण गमावले. घरादाराची राखरांगोळी झाली. अनेक संसार उघड्यावर आले. त्यांच्यापुढं झालेल्या अनन्वित अत्याचारांची व अन्यायाची भरपाई कोण आणि कशी करणार? त्यामुळेच गेल्या पाचशे वर्षांत जे कटू पचविले आणि जे विष प्राशन केले, त्याचे गोड फळ हाती लागले, असेच मानावे लागेल.

नरेंद्र मोदी, सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या दुर्दम्य इच्छाशक्ती तसेच अथक प्रयत्नांमुळेच बुधवारचा विजय हाती लागला. त्याबद्दल त्या सर्वांचे अभिनंदन! पण बाबरी पाडून राम मंदिर बांधणे हाच संघ-भाजपचा अंतिम उद्देशअसेल का? तसे असेल तर आणखी दोन वर्षांत तोही सफल होईल. मग पुढे काय? काँग्रेससमोर स्वातंत्र्य मिळविणे हा उद्देश होता. १९४७ मध्ये तो सफल झाल्यावर पुढे काय? हा प्रश्न आ वासून उभा राहिला. त्यावर महात्मा गांधीजींसह समस्त काँग्रेसजनांसमोर समर्पक उत्तर नव्हते. तेव्हा गांधीजींनी काँग्रेस विसर्जित करण्याची क्रांतिकारी सूचना केली. तोवर सत्तेचीच स्वप्नं पाहणा-या काँग्रेसजनांना ती मान्य होणे शक्यच नव्हते. त्यामुळे काँग्रेस जिवंत राहिली खरी; पण भरसमुद्रात वाट चुकलेल्या जहाजासारखी भरकटत राहिली. म्हणूनच आपल्याला नक्की काय साधायचं आहे, याच्या लघु पल्ल्याच्या आणि दीर्घ पल्ल्याच्या योजना भाजप, संघ आणि पंतप्रधान मोदी यांना आताच आखून त्या मार्गाने चालणे सुरू करावे लागेल. केवळ प्रभू रामाच्या रोज आरत्या ओवाळण्याने काहीच साध्य होणार नाही.

प्रभू राम, श्रीकृष्ण आणि भगवान बुद्ध ही केवळ धार्मिक प्रतीके नसून, या विभूती भारतीय प्राचीन आणि अर्वाचीन संस्कृतीची रूपे आहेत. त्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राम मंदिरासारखे प्रकल्प उत्तम संधी आहेत. प्रभू राम व कृष्ण द्वापार आणि त्रेता युगातील आहेत, असे मानले तरी त्यानंतर मानवजातीत आणि जगात अनेक लक्षणीय स्थित्यंतरे झाली. यांतील काही मानवी प्रयत्नांनी, तर काही परिस्थितीवशात घडत गेली. महायुद्धे, औद्योगिक क्रांती, विविध राज्यक्रांती आणि लढाया यांचेही अपरिहार्य परिणाम जगावर झालेच.त्यांचे आलेख, पडसाद आणि परिणाम यांचे दर्शन या प्रस्तावित राम मंदिरात घडवून देता येईल. तसे जर घडले, तरच तिथे प्रभू रामचंद्रांचा वास आहे, असे मानता येईल. नाही तर गावागावांत एखादे ‘प्राचीन’ देवस्थान असतेच, त्यात आणखी एकाची भर पडेल आणि सकाळ-संध्याकाळी आणखी आरत्या ओवाळल्या जातील, इतकेच. त्यात प्रभू राम कुठे असेल?

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या