शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

प्राचीन संस्कृती संवर्धनासाठी उत्तम संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 19:38 IST

दोन तास चाललेल्या या सोहळ्याने पाचशे वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली. भारतीय संस्कृतीतील ‘देवा’ला स्वत:चे हक्काचे ‘घर’ मिळाले.

ठळक मुद्देनरेंद्र मोदी, सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या दुर्दम्य इच्छाशक्ती तसेच अथक प्रयत्नांमुळेच बुधवारचा विजय हाती लागला. त्याबद्दल त्या सर्वांचे अभिनंदन! पण...

- भारतकुमार राऊत(ज्येष्ठ पत्रकार व माजी संसद सदस्य)गेल्या बुधवारी देशात सर्वत्र मुसळधार पावसाने कहर केला होता. त्यातच कोरोना विषाणूचा राक्षस डोकावून विकट हास्य करीतच होता. तरीही अवघा भारत देश आनंदात न्हात होता. कारण, उत्तर प्रदेशातील अयोध्या क्षेत्री रामजन्मभूमीवर नियोजित राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत होते. प्रत्येक हिंदू भारतीय दोन डोळ्यांचे प्राण करून प्रत्येक क्षण मनात साठवत होता. अभूतपूर्व म्हणावा असाच हा सोहळा!

दोन तास चाललेल्या या सोहळ्याने पाचशे वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली. भारतीय संस्कृतीतील ‘देवा’ला स्वत:चे हक्काचे ‘घर’ मिळाले. आता दोनेक वर्षांत मंदिराच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल आणि इतका प्रदीर्घ काळ बाबरीच्या दाराशी तिष्ठत खोळंबलेले रामलल्ला पुन्हा दिमाखात गाभाऱ्यात प्रवेश करतील. प्रत्येक भारतीय आता त्या घटकेची मनोमन आतुरतेने वाट पाहात आहे. राम मंदिर वादात गेल्या पाचशे वर्षांत झालेल्या रस्त्यांवरील आणि न्यायालयीन लढायांचे आता पुन:पुन्हा स्मरण करण्याचे कारण नाही; पण अंतिमत: ही लढाई कायद्याच्या चौकटीत रामभक्तांनी जिंकलीच. मात्र, ज्यांचा शेवट गोड ते सारेच गोड, असा पवित्रा इथे घ्यायचे कारण नाही. कारण या लढाईत अनेकांनी आपले प्राण गमावले. घरादाराची राखरांगोळी झाली. अनेक संसार उघड्यावर आले. त्यांच्यापुढं झालेल्या अनन्वित अत्याचारांची व अन्यायाची भरपाई कोण आणि कशी करणार? त्यामुळेच गेल्या पाचशे वर्षांत जे कटू पचविले आणि जे विष प्राशन केले, त्याचे गोड फळ हाती लागले, असेच मानावे लागेल.

नरेंद्र मोदी, सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या दुर्दम्य इच्छाशक्ती तसेच अथक प्रयत्नांमुळेच बुधवारचा विजय हाती लागला. त्याबद्दल त्या सर्वांचे अभिनंदन! पण बाबरी पाडून राम मंदिर बांधणे हाच संघ-भाजपचा अंतिम उद्देशअसेल का? तसे असेल तर आणखी दोन वर्षांत तोही सफल होईल. मग पुढे काय? काँग्रेससमोर स्वातंत्र्य मिळविणे हा उद्देश होता. १९४७ मध्ये तो सफल झाल्यावर पुढे काय? हा प्रश्न आ वासून उभा राहिला. त्यावर महात्मा गांधीजींसह समस्त काँग्रेसजनांसमोर समर्पक उत्तर नव्हते. तेव्हा गांधीजींनी काँग्रेस विसर्जित करण्याची क्रांतिकारी सूचना केली. तोवर सत्तेचीच स्वप्नं पाहणा-या काँग्रेसजनांना ती मान्य होणे शक्यच नव्हते. त्यामुळे काँग्रेस जिवंत राहिली खरी; पण भरसमुद्रात वाट चुकलेल्या जहाजासारखी भरकटत राहिली. म्हणूनच आपल्याला नक्की काय साधायचं आहे, याच्या लघु पल्ल्याच्या आणि दीर्घ पल्ल्याच्या योजना भाजप, संघ आणि पंतप्रधान मोदी यांना आताच आखून त्या मार्गाने चालणे सुरू करावे लागेल. केवळ प्रभू रामाच्या रोज आरत्या ओवाळण्याने काहीच साध्य होणार नाही.

प्रभू राम, श्रीकृष्ण आणि भगवान बुद्ध ही केवळ धार्मिक प्रतीके नसून, या विभूती भारतीय प्राचीन आणि अर्वाचीन संस्कृतीची रूपे आहेत. त्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राम मंदिरासारखे प्रकल्प उत्तम संधी आहेत. प्रभू राम व कृष्ण द्वापार आणि त्रेता युगातील आहेत, असे मानले तरी त्यानंतर मानवजातीत आणि जगात अनेक लक्षणीय स्थित्यंतरे झाली. यांतील काही मानवी प्रयत्नांनी, तर काही परिस्थितीवशात घडत गेली. महायुद्धे, औद्योगिक क्रांती, विविध राज्यक्रांती आणि लढाया यांचेही अपरिहार्य परिणाम जगावर झालेच.त्यांचे आलेख, पडसाद आणि परिणाम यांचे दर्शन या प्रस्तावित राम मंदिरात घडवून देता येईल. तसे जर घडले, तरच तिथे प्रभू रामचंद्रांचा वास आहे, असे मानता येईल. नाही तर गावागावांत एखादे ‘प्राचीन’ देवस्थान असतेच, त्यात आणखी एकाची भर पडेल आणि सकाळ-संध्याकाळी आणखी आरत्या ओवाळल्या जातील, इतकेच. त्यात प्रभू राम कुठे असेल?

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या